Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी नाकारलं शरद पवारांचं जेवणाचं निमंत्रण

  123

काय आहे कारण?


मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) नमो रोजगार मेळाव्याच्या (Namo Rojgar Melava) निमित्ताने बारामतीमध्ये (Baramati) येणार आहेत. यावेळेस शरद पवारांनी (Sharad Pawar) तिघांनाही जेवणाचं निमंत्रण दिलं होतं, पण व्यस्ततेच्या कारणामुळे आपल्याला हे शक्य होणार नसल्याचं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निमंत्रण नाकारलं आहे. त्या संबंधित त्यांनी एक पत्रही शरद पवारांना लिहिलं असून त्यांचे आभारही मानले आहेत.


शनिवारी, २ मार्च रोजी बारामतीमध्ये नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. बारामतीमध्ये शरद पवारांचे निवासस्थान असल्याने त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचे निमंत्रण दिलं होतं. पण व्यस्त कार्यक्रमांमुळे आपण या जेवणासाठी हजर राहू शकणार नाही असं देवेंद्र फडणवीसांनी नम्रपणे सांगितलं आहे.



काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?


'आपले पत्र मिळाले. भोजनासाठी आपण निमंत्रित केल्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. आपण जाणताच की, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या पुढाकारातून बारामती येथे नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. बारामतीतील भरगच्च कार्यक्रम लक्षात घेता आणि तदनंतर वढू बुद्रुक आणि तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकांचे भूमिपूजन, त्यानंतर लगेचच आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन असे आणखी दोन मोठे कार्यक्रम लागोपाठ असल्याने उद्याचा संपूर्ण दिवस अत्यंत व्यस्ततेचा असणार आहे. त्यामुळे आपल्या आग्रही निमंत्रणाला मान देणे यावेळी तरी शक्य होणार नाही. पुनश्चः एकदा आपले आभार', असं देवेंद्र फडणवीसांनी पत्रात म्हटलं आहे.

Comments
Add Comment

नांदेडमध्ये हृदयद्रावक घटना: विहिरीत पोहताना विजेचा धक्का लागून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. वन्नाळी येथील २१ वर्षीय मंगेश

Monsoon Update : मुसळधार पावसानं अनेक ठिकाणांना झोडपलं; २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून पावसाने राज्यात अनेक ठिकाणांना झोडपल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, गुरुवारी (दि.१९)

अवैध धंद्यांवर गार्‍हाणी कारवाईचा इशारा!

प्रभारी अधिकाऱ्यांना SP घार्गेंचा सज्जड दम; दुर्लक्ष केल्यास शिस्तभंग अटळ नगर - जिल्ह्यात कोणत्याही परिस्थितीत

सात तोळे सोन्याचे चोरी झालेले दागिने पोलिसांकडून परत

नेवासा : तालुक्यातील सौदाळा येथे तीन ठिकाणी चोरी करण्यात आली होती. यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी तीन लाख ३९ हजार

‘गणरचनेचा बिगुल’: जि. प. निवडणुकांच्या रणशिंगाला सुरुवात

प्रभागांची आखणी सुरू : राजकीय पक्ष मैदानात उतरले ! अ.नगर : ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद आणि

Maruti Chittampalli Passes Away: जंगल प्रत्यक्ष जगलेला माणूस काळाच्या पडद्याआड

अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांचं 93 व्या वर्षी निधन अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे वृद्धापकाळामुळे निधन