LPG Price Hike: मार्चच्या पहिल्याच दिवशीच झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ

नवी दिल्ली: मार्च महिन्याची सुरूवात झाली आहे आणि महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच १ मार्चला एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. म्हणजेच १ मार्च २०२४ ला सिलेंडर महाग झाला आहे. दरम्यान, ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी किंमतीतील ही वाढ कर्मशियल गॅस सिलेंडरच्या दरात केली आहे. दिल्लीमध्ये २५ रूपये तर मुंबईमध्ये सिलेंडरच्या किंमतीत २६ रूपयांनी वाढ झाली आहे.

ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी सलग दुसऱ्या महिन्यात १९ किलोच्या सिलेंडरच्या किंमतीत वाढ करत महागाईचा आणखी एक झटका दिला आहे. गेल्या महिन्यात बजेटच्या दिवशी १ फेब्रुवारी २०२४ला १४ रूपयांची वाढ केली होती. त्यानंतर आता २५ रूपयांची वाढ करण्यात आली आहे. IOCL च्या वेबसाईटवर बदललेले दर जाहीर करण्यात आले आहेत. १ मार्च २०२४ म्हणजेच आजपासून हे नवे दर लागू आहेत.

नव्या दरानुसार राजधानी दिल्लीत कर्मशियल सिलेंडर १७९५रूपयांना मिळेल. तर कोलकातामध्ये हा सिलेंडर १९११ रूपयांना मिळेल. मुंबईमध्ये कमर्शियल सिलेंडरची किंमत वाढून १७४९ रूपये तर चेन्नईमध्ये १९६०.५० रूपये झाली आहे.

फेब्रुवारीमध्ये होती इतकी किंमत


याआधी या बदलाआधी दिल्लीमध्ये १९किलोच्या कमर्शियल गॅस सिलेंडरची किंमत १७५५.५० रूपयांनी वाढून १७६९.५० रूपये झाली होती. इतर महानगरांमध्ये बोलायचे झाल्यास कोलकातामध्ये एका सिलेंडरची १८६९ वरून १८८७ रूपये झाली होती. मुंबईमध्ये आधी जो कमर्शियल सिलेंडर १७०८ रूपयांना मिळत होता तो १७२३ रूपये झाला होता. तर चेन्नईमध्ये याची किंमत १९२४.५० रूपयांवरून १९३७ रूपये झाली होती.
Comments
Add Comment

Bank Holiday Today : आज देशातील 'या' राज्यांमध्ये बँका बंद; RBI Holiday List तपासा

नवी दिल्ली : बँकेच्या शाखेत जाऊन महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी आज बँका सुरू आहेत की बंद हे तपासून

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू