मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांचे रिमेक (Bollywood Remakes) होत असतात. मात्र, यावेळेस बॉलिवूडमधील एका हिट चित्रपटाचा थेट हॉलिवूडमध्ये (Hollywood) रिमेक होणार आहे. तसेच या चित्रपटाचा कोरिअनमध्येही रिमेक करण्याची तयारी सुरु आहे. हा चित्रपट म्हणजे अजय देवगण आणि तब्बू यांची प्रमुख भूमिका असलेला ‘दृश्यम’ (Drishyam). हा चित्रपट मूळ मल्याळम (Malayalam) इंडस्ट्रीत पहिल्यांदा प्रदर्शित झाला, ज्यात मोहनलाल (Mohanlal) या दाक्षिणात्य सुपरस्टारने प्रमुख भूमिका साकारली होती.
ट्रेड ॲनालिस्ट रमेश बाला यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून हॉलिवूड रिमेकविषयी माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, ‘पॅनोरमा स्टुडिओ ‘दृश्यम’ फ्रँचायझी हॉलिवूडमध्ये नेण्यासाठी तयार आहे. भारत आणि चीनमध्ये बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्यानंतर निर्माता कुमार मंगत पाठक आणि पॅनोरमा स्टुडिओने ‘दृश्यम’ हॉलिवूडमध्ये बनवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी गल्फस्ट्रीम पिक्चर्स आणि जोट फिल्म्सशी हातमिळवणी केली आहे.
रमेश बाला यांनी सांगितले की पॅनोरमा स्टुडिओने मूळ निर्माता असलेल्या आशीर्वाद सिनेमाकडून मल्याळम चित्रपटाचे आंतरराष्ट्रीय रिमेक हक्क विकत घेतले आहेत. हॉलिवूडबरोबरच ‘दृश्यम’ फ्रँचायझीच्या कोरियन व्हर्जनवरही काम सुरू आहे. मल्याळम चित्रपट ‘दृश्यम’ चे रिमेक हिंदी, कन्नड, तेलुगू, तमिळ, सिंहली आणि चीनी अशा विविध भाषांमध्ये रिमेक झाले आहेत.
‘दृश्यम’ व ‘दृश्यम २’ असे दोन्ही भाग प्रचंड गाजले. बॉलिवूडमधील ‘दृश्यम’ ३१ जुलै २०१५ रोजी प्रदर्शित झाला होता. आज जवळजवळ नऊ वर्षे उलटल्यानंतरही २ ऑक्टोबर या दिवशी विजय साळगांवकर आणि सत्संगचे मीम्स हमखास व्हायरल होतात. ज्यांनी चित्रपट पाहिला असेल त्यांच्या ही गोष्ट लगेच लक्षात येईल.
या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचेही प्रचंड कौतुक झाले. मूळ मल्याळम सिनेमात जीतू जोसेफ (Jeethu Joseph) यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तर, बॉलिवूड रिमेकचे दिगदर्शन निशिकांत कामंत (Nishikant Kamat) या मराठी दिग्दर्शकाने केले होते. ‘दृश्यम ३’ च्या कथानकाची जुळवाजुळव सुरू असल्याचे वृत्त होते. या सिक्वेलमध्ये मोहनलाल आणि अजय देवगण एकत्र झळकणार असल्याचे म्हटले जात आहे.
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…
मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…
मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…
मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…
मुंबई: टीम इंडिया(team india) विक्ट्री परेडसाठी मुंबईत पोहोचले आहेत. भारतीय संघाचे मुंबई एअरपोर्टवर दिमाखात स्वागत…