Green Tea: एका दिवसात किती ग्रीन टी प्यावी, घ्या जाणून

मुंबई: आजकाल ग्री टी आपल्या किचनमधील महत्त्वाचा घटक बनली आहे. खासकरून ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी. यामुळे केवळ फ्रेशच वाटत नाही तर आपले शरीर आतून साफ होण्यास मदत होते. ग्रीन टीमध्ये पोषक गुण आपल्या शरीराला स्वस्थ राखण्यासोबतच वजन घटवण्यातही मदत करतात.


आरोग्य तज्ञांच्या मते संपूर्ण दिवसभरात २ ते ३ कप ग्रीन टी पिणे आरोग्यासाठी चांगले असते. इतक्या प्रमाणात ग्रीन टी प्यायल्याने त्याचे फायदे मिळतात आणि नुकसान होत नाही. ग्रीन टीमध्ये अनेक प्रकारचे चांगले तत्व असतात जे आपल्या शरीराला स्वस्थ राखतात.


यामुळे हृदय मजबूत बनते. वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच यामुळे फ्रेशही वाटते. यामुळे दररोज प्रमाणात ग्रीन टी प्यावी. ज्यामुळे आरोग्य चांगले राहील. अधिक प्रमाणात ग्रीन टीचे सेवन केल्यास याचे नुकसानही होऊ शकते. सगळ्यात आधी ग्रीन टीमध्ये कॅफेन असते. आपण जर अधिक प्रमाणात ग्रीन टीचे सेवन केले तर शरीरात कॅफेनचे प्रमाण वाढते. यामुळे झोप न येणे, चिडचिडेपणा, डोकेदुखी, तसेच हृदयाचे ठोके वाढतात.


दुसरा म्हणजे ग्रीन टीमध्ये टॅनिन असते जे आयर्नचे शोषण कमी करते. याचा अर्थ जर आपण जेवणानंतर लगेचच ग्रीन टी प्यायलो कर शरीरात जेवणातून मिळणारे आर्यन योग्य प्रमाणात मिळत नाही. यामुळे रक्ताची कमतरता होऊ शकते.


ग्रीन टी अधिक प्यायल्याने पोटदुखी तसेच अपचनाची समस्या जाणवू शकते. कारण ग्रीन टी अॅसिडिटी वाढवू शकते. यामुळे पोटात जळजळ होऊ शकते.

Comments
Add Comment

International Yoga Day 2026 : 'Yoga for Healthy Ageing' या संकल्पनेतून निरोगी आयुष्याचा मंत्र

२१ जून हा दिवस संपूर्ण जगासाठी आरोग्याचा उत्सव म्हणून ओळखला जातो. 'आंतरराष्ट्रीय योग दिन' जवळ येत असताना,

Magic of Science : आता 'मेंढीची लोकर' जोडणार मानवाची तुटलेली हाडे; संशोधनाला मोठे यश

LONDON: स्वेटर किंवा शालीसाठी वापरली जाणारी मेंढीची लोकर आता मानवी शरीराच्या उपचारासाठी वापरली जाणार आहे, हे ऐकून

शहरी जीवनातील वाढता मानसिक तणाव: ८२ टक्के नागरिक विळख्यात; अहवालातून धक्कादायक वास्तव समोर

आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात प्रगतीची शर्यत जिंकण्याच्या नादात माणूस स्वतःच्या आरोग्याकडे

JAMUN : हवामान बदलाचा 'गोड' साक्षीदार: उन्हाळ्याचा निरोप घेताना जांभळाचा मनसोक्त आनंद घ्या!

कडक उन्हाचा तडाखा आता ओसरू लागला असून, पावसाळ्याच्या पहिल्या सरींची चाहूल लागली आहे. ऋतू बदलाच्या या काळात

EAT GOOD : तुम्ही तुमच्या अन्नामुळेच आजारी पडत आहात का? जाणून घ्या सुरक्षित आहाराचे महत्त्व!

अन्न हे केवळ भूक भागवण्याचे साधन नसून ते आपल्या आरोग्याचा मुख्य आधार आहे. निरोगी जीवनासाठी सुरक्षित, पौष्टिक आणि

Thyroid : थायरॉईडच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका ; वेळीच लक्ष द्या !

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत थकवा किंवा वजनातील बदल या गोष्टी सामान्य मानल्या जातात. मात्र अनेकदा ही लक्षणे