Airtel युजर्सला लागणार झटका! लवकरच महाग होणार आहेत रिचार्ज प्लान

मुंबई: एअरटेल भारतातील दुसरी मोठी टेलिकॉम कंपनी आहे आणि भारतात लवकरच याचे टॅरिफ प्लान महाग होत आहेत. ही माहिती एअरटेलचे चेअरमन सुनील मित्तल यांनी नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान दिली. त्यांनी सांगितले की भारतात लववकरच टेलिकॉम रेट्स वाढणार आहेत.


दरम्यान, मित्तल यांनी कोणतीही तारीख सांगितलेली नाही की ही वाढ कधी होणार आहे. काही रिपोर्ट्सनुसार ही वाढ जुलैनंतर होऊ शकते.



२०२१नंतर नाही झालेत बदल


खरंतर, भारतीय टेलिकॉम सेक्टरमध्ये डिसेंबर २०२१नंतर किंमतीमध्ये कोणतेही मोठे बदल झालेले नाहीत. देशात ४जी सुरू झाल्यानंतर दर २-३ वर्षांनी टॅरिफ वाढवण्याची एक सायकल सुरू झाली आहे.


भारतीय टेलिकॉम सेक्टरमध्ये तीन मोठे खेळाडू आहेत. यांची नावे जिओ, एअरटेल आणि व्हीआय आहेत. दरम्यान यात बीएसएनएलला सामील केले जाऊ शकते. मात्र चार शहरांमध्ये बीएसएनएल नाही तेथे एमटीएनएल काम करते.



जिओ आणि व्हीआयही महाग करू शकतात का रिचार्ज?


अशातच असा सवाल केला जात आहे की जिओ आणि व्हीआयही आपले रिचार्ज प्लान महाग करू शकतात. खरंतर, प्रत्येक कंपनी आपल्या प्लान्सच्या किंमती वाढवत असेल तर इतर कंपन्याही त्यांचे दर वाढवतात.

Comments
Add Comment

राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या चौपदरीकरणामुळे वाशी APMC ला फायदा होणार, मुंबईकरांना दूध भाजीपाला आणखी ताजा मिळणार

मुंबई : दररोज मुंबईला प्रामुख्याने कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन दूध आणि

मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवरही उपलब्ध

तिकीट खरेदीचा लागणारा वेळ होणार कमी मुंबई : आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर प्रवास अधिक

वडाळ्यात उबाठासाठी कठिण परिस्थती; ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला जागा कुठे सोडायची हा प्रश्न

मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु

गोव्यातील नाईटी क्लबला आग, मुंबई अग्निशमन झाले सतर्क

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हॉटेल्स्,

कचरा खासगीकरणाची फेरनिविदा की वाटाघाटी? अंदाजित दरापेक्षा ३९ ते ६३ टक्के अधिक दराने लावली कंपन्यांनी बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलून वाहून नेण्यासाठी वाहन आणि मनुष्यबळ पुरवण्याकरता

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही