Airtel युजर्सला लागणार झटका! लवकरच महाग होणार आहेत रिचार्ज प्लान

मुंबई: एअरटेल भारतातील दुसरी मोठी टेलिकॉम कंपनी आहे आणि भारतात लवकरच याचे टॅरिफ प्लान महाग होत आहेत. ही माहिती एअरटेलचे चेअरमन सुनील मित्तल यांनी नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान दिली. त्यांनी सांगितले की भारतात लववकरच टेलिकॉम रेट्स वाढणार आहेत.


दरम्यान, मित्तल यांनी कोणतीही तारीख सांगितलेली नाही की ही वाढ कधी होणार आहे. काही रिपोर्ट्सनुसार ही वाढ जुलैनंतर होऊ शकते.



२०२१नंतर नाही झालेत बदल


खरंतर, भारतीय टेलिकॉम सेक्टरमध्ये डिसेंबर २०२१नंतर किंमतीमध्ये कोणतेही मोठे बदल झालेले नाहीत. देशात ४जी सुरू झाल्यानंतर दर २-३ वर्षांनी टॅरिफ वाढवण्याची एक सायकल सुरू झाली आहे.


भारतीय टेलिकॉम सेक्टरमध्ये तीन मोठे खेळाडू आहेत. यांची नावे जिओ, एअरटेल आणि व्हीआय आहेत. दरम्यान यात बीएसएनएलला सामील केले जाऊ शकते. मात्र चार शहरांमध्ये बीएसएनएल नाही तेथे एमटीएनएल काम करते.



जिओ आणि व्हीआयही महाग करू शकतात का रिचार्ज?


अशातच असा सवाल केला जात आहे की जिओ आणि व्हीआयही आपले रिचार्ज प्लान महाग करू शकतात. खरंतर, प्रत्येक कंपनी आपल्या प्लान्सच्या किंमती वाढवत असेल तर इतर कंपन्याही त्यांचे दर वाढवतात.

Comments
Add Comment

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ३३ लाख पूरग्रस्त शेतकऱ्यांना ३ हजार कोटींची मदत

मुंबई : यंदा सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्र्रात पावसाने थैमान घातले. शेतीपासून लोकांची घरंदारं सगळंच पावसात

सायन, कुर्ला बीकेसीतील प्रवाशांना मिळणार नवा पूल, वाहतूक कोंडी होणार दूर

मुंबई : मिठी नदीवर नवा पूल बांधण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या कामासाठी मुंबई महापालिकेने

महापालिका आयुक्तांनी, अमित साटम यांच्या पत्राची दखल घेतली नाही आणि आता घडले असे...

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेतील अभियंत्याच्या बदलीत मोठ्याप्रमाणात गैरप्रकार होत असल्याने याबाबत

महाविकास आघाडीचे आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळले

मतदारयाद्या सदोष मुद्द्यांवर तपशीलवार खुलासा मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या

दादरमधील वाढत्या फटाक्यांच्या दुकानांना कुणाचे अभय? दुकानदारांसह नागरिकांचा जीव धोक्यात

मुंबई (खास प्रतिनिधी) : दीपावलीच्या सणा निमित्त केल्या जाणाऱ्या आतषबाजींकरता मुंबईतील काही प्रमुख दुकानांमध्ये

मालाड पूर्वेत भीषण आग! लाकडी गोदामात लागलेल्या आगीने घेतले रौद्ररूप: नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

मुंबई : मुंबईतील वर्दळीच्या आणि दाट लोकवस्ती असलेल्या मालाड पूर्व भागात आज दुपारी भीषण आगीची घटना घडली.