Airtel युजर्सला लागणार झटका! लवकरच महाग होणार आहेत रिचार्ज प्लान

  107

मुंबई: एअरटेल भारतातील दुसरी मोठी टेलिकॉम कंपनी आहे आणि भारतात लवकरच याचे टॅरिफ प्लान महाग होत आहेत. ही माहिती एअरटेलचे चेअरमन सुनील मित्तल यांनी नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान दिली. त्यांनी सांगितले की भारतात लववकरच टेलिकॉम रेट्स वाढणार आहेत.


दरम्यान, मित्तल यांनी कोणतीही तारीख सांगितलेली नाही की ही वाढ कधी होणार आहे. काही रिपोर्ट्सनुसार ही वाढ जुलैनंतर होऊ शकते.



२०२१नंतर नाही झालेत बदल


खरंतर, भारतीय टेलिकॉम सेक्टरमध्ये डिसेंबर २०२१नंतर किंमतीमध्ये कोणतेही मोठे बदल झालेले नाहीत. देशात ४जी सुरू झाल्यानंतर दर २-३ वर्षांनी टॅरिफ वाढवण्याची एक सायकल सुरू झाली आहे.


भारतीय टेलिकॉम सेक्टरमध्ये तीन मोठे खेळाडू आहेत. यांची नावे जिओ, एअरटेल आणि व्हीआय आहेत. दरम्यान यात बीएसएनएलला सामील केले जाऊ शकते. मात्र चार शहरांमध्ये बीएसएनएल नाही तेथे एमटीएनएल काम करते.



जिओ आणि व्हीआयही महाग करू शकतात का रिचार्ज?


अशातच असा सवाल केला जात आहे की जिओ आणि व्हीआयही आपले रिचार्ज प्लान महाग करू शकतात. खरंतर, प्रत्येक कंपनी आपल्या प्लान्सच्या किंमती वाढवत असेल तर इतर कंपन्याही त्यांचे दर वाढवतात.

Comments
Add Comment

Gold Silver Rate: गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात घट चांदीच्या दरात मात्र वाढ 'ही' आहेत कारणे

प्रतिनिधी: आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घट झाली आहे. सतत चार दिवस सातत्यपूर्ण सोन्याच्या दरात भाववाढ

Rapido News: रॅपिड झोमॅटो व स्विगीला थेट टक्कर ! कंपनी झोमॅट स्विगीची मक्तेदारी 'अशी' संपवणार

प्रतिनिधी: रॅपिडो कंपनीने आता झोमॅटो (Zomato),स्विगी (Swiggy) या आपल्या स्पर्धक फूड डिलिव्हरी व्यासपीठांना (Food Delivery Aggregators)

Mumbai Railway Accident: अपघातानंतर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; लोकल ट्रेनला ऑटोमॅटिक दरवाजे बसवणार

मुंबई उपनगरीय लोकलच्या डब्यांचे केले जाणार रीडिझाईनिंग ठाणे: मध्य रेल्वेमार्गावर आज सकाळी झालेल्या भीषण

Bob and HDFC Bank : पीएनबीसह बँक ऑफ बडोदा व एचडीएफसी बँकेने केली कर्जदारात कपात 'या' टक्क्यांवर घसरले आहेत व्याजदर !

प्रतिनिधी: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी रेपो दरात (Repo Rate ) दरात कपात केल्यानंतर आता त्याचा परिणाम बँकेच्या

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: लवकरच वरुणराजा बरसणार!

मुंबई : राज्यात मान्सूनपूर्व पावसाने सुरुवातीला चांगलाच जोर दाखवला होता, मात्र मागील आठवड्यापासून काही भागांत

सांडपाणीमुक्त पवई तलावासाठी लढा सुरूच

मूक साखळी रद्द, मात्र नागरिकांचा निर्धार कायम मुंबई : पवई तलावात सांडपाणी मिसळण्याच्या विरोधात रविवारी आयोजित