मुंबई: भारतीय कुटुंब आपल्या कमाईतील बराचसा भाग आपल्या खाण्यापिण्यावर खर्च करतात. गेल्या काही वर्षात भारतीयांच्या खर्च करण्याच्या पद्धतीत मोठे बदल झाले आहेत. खास बाब म्हणजे हे बदल शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांमध्ये पाहायला मिळत आहे. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशातील कुटुंबांची आपल्या घरगुती खर्चासाठीचा ताजा रिपोर्ट जारी केला आहे. या रिपोर्टवरून समजते की आजही भारतीय कुटुंबे आपल्या कमाईतील सर्वाधिक भाग खाण्यापिण्यावर खर्च करतात.
NSSOने जारी केलेल्या आकडेवारीनुसार शहरी भागात राहणारे भारतीय कुटुंब १०० पैकी ३९.७ रूपये केवळ खाण्यापिण्यावर खर्च करतात. तर ग्रामीण भागातील कुटुंब १०० पैकी ४७ रूपये खाण्यापिण्यावर खर्च करतात. या सर्वेक्षणात हे ही आढळले की गेल्या काही वर्षात भारतीयांनी धान्यावर होणारा खर्च कमी केला तर दूध आणि पॅकेज्ड फूडवर अधिक खर्च करत आहेत.
या सर्वेक्षणात हे ही आढळले की भले भारतीय आपल्या कमाईतील एक मोठा भाग खाण्या-पिण्यावर खर्च करत आहेत. मात्र या खर्चामध्ये गेल्या २० वर्षात घट झाली आहे.
दूध आणि पॅकेज्ड फूडवर होणाऱ्या खर्चामध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. दूध आणि पॅकेज्ड फूडवर होणाऱ्या खर्चात ४.२ टक्के वाढ झाली आहे. तर धान्यावर होणाऱ्या खर्चामध्ये ७.९ टक्के घसरण झाली आहे.
NSSOच्या माहितीनुसार भारतीय एंटरटेनमेंटवर आपल्या कमाईतील ६.५ टक्के भाग खर्च करत आहे. तर कपड्यांवर भारतीय कुटुंब आपल्या कमाईतील ५.४ टक्के भाग खर्च करत आहे. मेडिकल खर्चावर कमाईतील ५.९ टक्के भाग खर्च होत आहे. तर वाहनावर भारतीय कुटुंब ८.५ टक्के भाग खर्च करत आहे. तर अभ्यासावर भारतीय कुटुंब आपल्या कमाईतील ५.७ टक्के भाग खर्च करत आहेत.
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…