CM Eknath Shinde : 'एक पूरक असा अर्थसंकल्प' म्हणत मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

अंतरिम अर्थसंकल्पाबद्दल काय म्हणाले एकनाथ शिंदे?


मुंबई : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Legislative Budget session) दुसर्‍या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget) सादर केला. राज्याच्या २०२४-२५ वर्षाच्या एकूण खर्चासाठी ६ लाख ५२२ कोटी रुपयांची तरतूद असलेला हा अर्थसंकल्प आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अजितदादांचे भरभरुन कौतुक केले. 'एक पूरक असा हा अर्थसंकल्प आहे', असं मुख्यमंत्री म्हणाले.


मुख्यमंत्री म्हणाले, या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर दुर्बल घटक, महिला, शेतकरी, कामगार, तरुण, ज्येष्ठ सगळ्यांचाच समावेश केलेला आहे. मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा म्हणजे कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी इ. साठी या अर्थसंकल्पामध्ये निधी ठेवलेला आहे. एक पूरक असा हा अर्थसंकल्प आहे


रस्ते, ग्रामीण रस्ते, शहरी रस्ते या सर्वांना प्राधान्य दिले आहे. रेल्वे मार्गांना प्राधान्य दिलं आहे. आपले जे एअरपोर्ट आहेत त्यांची एयर कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे, यासाठी आपण तरतूद केली आहे. पोर्ट आहेत ते डेव्हलपमेंट करण्यासाठी आपण प्राधान्य देत आहे. कारण पायाभूत सुविधेमध्ये जे राज्य पुढे असते त्याचा विकास आणि प्रगती वेगाने होत असते. म्हणून पायाभूत सुविधांना देखील मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले आहे.


दरम्यान, 'निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मांडलेला हा अर्थसंकल्प आहे' अशी टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. यावर 'विरोधकांकडे बोलण्याचे मुद्दे नाहीत, निवडणुका आहेत म्हणून बजेट मांडायचं नाही काय?', असा सवाल उपस्थित करत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना चपराक लगावली.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा