CM Eknath Shinde : 'एक पूरक असा अर्थसंकल्प' म्हणत मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

अंतरिम अर्थसंकल्पाबद्दल काय म्हणाले एकनाथ शिंदे?


मुंबई : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Legislative Budget session) दुसर्‍या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget) सादर केला. राज्याच्या २०२४-२५ वर्षाच्या एकूण खर्चासाठी ६ लाख ५२२ कोटी रुपयांची तरतूद असलेला हा अर्थसंकल्प आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अजितदादांचे भरभरुन कौतुक केले. 'एक पूरक असा हा अर्थसंकल्प आहे', असं मुख्यमंत्री म्हणाले.


मुख्यमंत्री म्हणाले, या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर दुर्बल घटक, महिला, शेतकरी, कामगार, तरुण, ज्येष्ठ सगळ्यांचाच समावेश केलेला आहे. मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा म्हणजे कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी इ. साठी या अर्थसंकल्पामध्ये निधी ठेवलेला आहे. एक पूरक असा हा अर्थसंकल्प आहे


रस्ते, ग्रामीण रस्ते, शहरी रस्ते या सर्वांना प्राधान्य दिले आहे. रेल्वे मार्गांना प्राधान्य दिलं आहे. आपले जे एअरपोर्ट आहेत त्यांची एयर कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे, यासाठी आपण तरतूद केली आहे. पोर्ट आहेत ते डेव्हलपमेंट करण्यासाठी आपण प्राधान्य देत आहे. कारण पायाभूत सुविधेमध्ये जे राज्य पुढे असते त्याचा विकास आणि प्रगती वेगाने होत असते. म्हणून पायाभूत सुविधांना देखील मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले आहे.


दरम्यान, 'निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मांडलेला हा अर्थसंकल्प आहे' अशी टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. यावर 'विरोधकांकडे बोलण्याचे मुद्दे नाहीत, निवडणुका आहेत म्हणून बजेट मांडायचं नाही काय?', असा सवाल उपस्थित करत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना चपराक लगावली.

Comments
Add Comment

Satara Accident : पालखीचे दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; नेमकं काय घडलं?

सातारा : सातारा-पुसेगाव मार्गावर (Satara-Pusegaon Road) शुक्रवारी (१७ जुलै) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फॉर्च्युनर

Maharashtra Election : मतदार यादी पुनरीक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम यादी १९ ऑक्टोबरला

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाचे

Firoz Baba Case : फिरोज बाबा प्रकरणात तपासाची गती; ठाणे पोलिसांकडून पाच जणांना समजपत्र

ठाणे : फिरोज बाबा प्रकरणातील तपासाला वेग आला असून, ठाकरे शिवसेनेचे (Shevsena) माजी खासदार विनायक राऊत यांच्या सून

Kalidas Maharaj : कालीदास महाराजांचे अपघाती निधन, ४० वर्षांत उच्चारला नव्हता एकही शब्द

परभणी : मराठवाड्यातील एक अध्यात्मिक गुरु अशी ख्याती असलेल्या आणि मागील चार दशकांपासून एकही शब्द न बोलता केवळ

Dhule Crime News : कंपनीवर 'हा' मोठा आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ बनवत म्हणाला...

Dhule Crime News : धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळील गिधाडे तापी नदीच्या पुलावरून उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला

Tribal Reservation : धर्मांतर केलेल्या आदिवासींच्या सवलती बंद होणार?

- राज्य सरकार ऍक्शन मोडवर; सर्वसमावेशक धोरणासाठी २७ जणांची समिती मुंबई : धर्मांतरानंतरही अनुसूचित जमातीचे