मुंबई : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Legislative Budget session) दुसर्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget) सादर केला. राज्याच्या २०२४-२५ वर्षाच्या एकूण खर्चासाठी ६ लाख ५२२ कोटी रुपयांची तरतूद असलेला हा अर्थसंकल्प आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अजितदादांचे भरभरुन कौतुक केले. ‘एक पूरक असा हा अर्थसंकल्प आहे’, असं मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले, या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर दुर्बल घटक, महिला, शेतकरी, कामगार, तरुण, ज्येष्ठ सगळ्यांचाच समावेश केलेला आहे. मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा म्हणजे कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी इ. साठी या अर्थसंकल्पामध्ये निधी ठेवलेला आहे. एक पूरक असा हा अर्थसंकल्प आहे
रस्ते, ग्रामीण रस्ते, शहरी रस्ते या सर्वांना प्राधान्य दिले आहे. रेल्वे मार्गांना प्राधान्य दिलं आहे. आपले जे एअरपोर्ट आहेत त्यांची एयर कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे, यासाठी आपण तरतूद केली आहे. पोर्ट आहेत ते डेव्हलपमेंट करण्यासाठी आपण प्राधान्य देत आहे. कारण पायाभूत सुविधेमध्ये जे राज्य पुढे असते त्याचा विकास आणि प्रगती वेगाने होत असते. म्हणून पायाभूत सुविधांना देखील मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले आहे.
दरम्यान, ‘निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मांडलेला हा अर्थसंकल्प आहे’ अशी टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. यावर ‘विरोधकांकडे बोलण्याचे मुद्दे नाहीत, निवडणुका आहेत म्हणून बजेट मांडायचं नाही काय?’, असा सवाल उपस्थित करत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना चपराक लगावली.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…