Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी आमरण उपोषण घेतलं मागे; उद्यापासून साखळी उपोषण

सरकारने अद्याप काही निर्णय न घेताच उपोषण मागे...


मुंबई : मराठा आरक्षणासंबंधी (Maratha Reservation) जीआर काढल्यानंतर असमाधानी असलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी १० फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाची (Hunger strike) घोषणा केली होती. यानंतर सरकारने मराठा समाजाला (Maratha Samaj) १० टक्के आरक्षण देऊनही मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला. याउलट ते अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) उलटसुलट आरोप केले. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी जरांगेंना चांगलेच धारेवर धरले. यानंतर आज उपोषणाच्या सतराव्या दिवशी जरांगेंनी आपलं आमरण उपोषण मागे घेण्याची घोषणा केली आहे. तर उद्यापासून धरणे आणि साखळी उपोषण करण्याचं आवाहन त्यांनी मराठा बांधवांना केलं आहे.


मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेण्याची तयारी दाखवली आहे. हॉस्पिटलमध्ये दोन दिवस उपचार घेऊन त्यानंतर दोन-तीन दिवसांनी ते पुन्हा महाराष्ट्र दौरा करणार आहेत. सरकारने काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी यासाठी ते पुन्हा एकदा उपोषणाला बसले होते. मात्र, सरकारने अद्याप काही निर्णय न घेताच त्यांनी आंदोलन मागे घेतले आहे.


अंबडमध्ये संचारबंदी लागू केल्याने लोकांना त्यांना भेटणे कठीण झाले आहे. त्यामुळे आता मराठा बांधवांच्या भेटी घेण्यासाठी ते स्वतः जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यासाठीच त्यांनी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली. गावातील मराठा भगिनींच्या हातून रस पिऊन ते उपोषण मागे घेणार आहेत. आंदोलनाची पुढची दिशा ते लवकरच जाहीर करणार आहेत.



काल नेमकं काय घडलं?


मनोज जरांगे काल अत्यंत आक्रमक झाले होते व त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले होते. सरकारचा मला मारण्याचा प्रयत्न आहे, माझा बळी घ्यायचा असेल तर मी सागर बंगल्यावर येतो, तिथे घ्या, असं जरांगे म्हणाले होते. त्यांच्या या आक्रमकपणामुळे मराठा बांधवांनीही त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे राज्यात एसटी जाळण्याचे प्रकार घडले. त्यामुळे अंबडमध्ये रात्री १ वाजता संचारबंदी लागू करण्यात आली होती. शिवाय छ. संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यांमध्ये इंटरनेट, एसटी सेवा बंद करण्यात आली. अखेर जरांगे पाटील यांनी सामोपचाराची भूमिका घेतली आणि फडणवीसांच्या सागर बंगल्याकडे जाण्याचं टाळलं. त्यानंतर ते अंतरवली सराटी गावामध्ये परत आले होते.

Comments
Add Comment

Jalna : कॉलेजचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू आणि चौघे जखमी

जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये एका कॉलेजच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम सुरू असताना

Ahilyanagar Crime News : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार, मुकादमाच्या मुलावर गुन्हा दाखल

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एक संतापजनक घटना घडली आहे. पाथर्डी तालुक्यातील एका गावातील

Pune News : पुणे स्थानकातून प्रवाशांची अजब हातसफाई : ५ वर्षांत ३ कोटींचे बेडशीट अन् टॉवेल लंपास; रेल्वेने ठेकेदाराकडून वसूल केली भरपाई!

पुणे : रेल्वेच्या वातानुकूलित (AC) डब्यातून प्रवास करताना प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वे

Pratap Sarnaik : गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस धावणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबई :  श्री गणरायाचे आगमन १४ सप्टेंबर रोजी होत असून, बाप्पाच्या स्वागतासाठी

Devendra Fadnavis : तिसऱ्या मुंबईसाठी ३२४ चौ.कि.मी. क्षेत्राचा 'मास्टर प्लॅन'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये 'मॅपलट्री'कडून १.१ अब्ज डॉलरची गुंतवणूक अपेक्षित मुंबई :

Nandurbar : नंदुरबार हादरलं ! अल्पवयीन मुलांसह तरुणांचे लैंगिक शोषण, दोनशेपेक्षा अधिक आक्षेपार्ह चित्रफिती

Nandurbar : नंदुरबारमध्ये एक हादरवणारा प्रकार उघडकीस आला आहे. नंदुरबारमध्ये अल्पवयीन बालकांसह काही तरुणांचे लैंगिक