Ashish Shelar : पत्रकार पोपटलाल यांचा अग्रलेख की हग्रलेख?

आमच्या कामांचं श्रेय घेण्यासाठी आवाज करणार्‍या राजकीय बगळ्यांना मुंबईकरच बाजूला करतील!


भाजपा आमदार आशिष शेलार यांचे उबाठाच्या संजय राऊत व आदित्य ठाकरेंना जबरदस्त टोले


मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सामनाच्या अग्रलेखातून खालच्या पातळीची भाषा वापरत सत्ताधारी पक्षांवर टीका करतात. काल सामनाच्या अग्रलेखात त्यांनी भाजपा पक्ष (BJP Party) आणि चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावर टीका केली. यावर काल भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी 'स्वतःचा पक्ष संपलेल्या लोकांनी भाजपा संपवण्याची भाषा करु नये. संजय राऊतच्या दहा पिढ्या देखील भाजपाला संपवू शकणार नाहीत', अशी टीका केली होती. यानंतर आता भाजपा आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी देखील संजय राऊतांचा चांगलाच समाचार घेतला आहे. राऊतांचा 'पत्रकार पोपटलाल' असा उल्लेख करत आशिष शेलारांनी त्यांना चपराक लगावली आहे.


आशिष शेलार म्हणाले की, पत्रकार पोपटलाल यांचा अग्रलेख आज सामनामध्ये आला आहे. तो अग्रलेख आहे की हग्रलेख आहे? ते रात्री बसतात आणि सकाळी लिहितात. या बांडगुळ पक्षांना दिल्ली भाजपने जागा दाखवली आहे. संजय राऊत आता तुमच्या पक्षाला बैठकीसाठी नॅनो गाडी लागेल, अशी जहरी टीका त्यांनी संजय राऊतांवर केली आहे.



आदित्य ठाकरेंनाही लगावला टोला


आशिष शेलार म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या सरकारने बाजू नीट लावली नाही. त्यामुळे मराठा आरक्षण गेले होते. मराठा समाजाच्या प्रत्येक मागणीचा सरकार विचार करेल, असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी काही राजकीय बगळे आवाज काढत आहेत. अशांना बाजूला सारण्यासाठी मुंबईकर तयार आहेत, असा टोला त्यांनी आदित्य ठाकरेंना (Aaditya Thackeray) लगावला आहे.



...त्यावेळी मनोज जरांगे गप्प का?


मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले. यावर आशिष शेलार म्हणाले की, 'मराठा समाजाला हे मान्य नाही, ते मान्य नाही, अशी भाषा मराठा समाजाला मान्य नाही. जे बोलतात त्या मागे स्क्रिप्ट कोणाची आहे? मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आहे. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) काळात आरक्षण गेले त्यावेळी तुम्ही गप्प का बसला? शरद पवार (Sharad Pawar) इतकी वर्षे आरक्षण देऊ शकले नाही त्यावेळी गप्प का बसला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.


Comments
Add Comment

Minister Adv. Ashish Shelar : पुन्हा अतिक्रमणे वाढून देऊ नका; मुंबई उपनगर पालकमंत्री अँड आशिष शेलार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेत आज उपनगर जिल्ह्यातील शासकीय

Cyber Police : बदलत्या काळातील गुन्ह्यांचे आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज होत काम करण्याची गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

३६ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२६ चा समारोप मुंबई  : महाराष्ट्र पोलीस दलाने बदलत्या काळातील

Legislature's security system : विधिमंडळाच्या सुरक्षा यंत्रणेत होणार मोठे बदल

सभापती राम शिंदेंनी दिले निर्देश; संसदीय आयुधांचा गैरवापर टाळण्यासाठी विशेष उपाययोजना मुंबई : विधिमंडळ

Shree Kshetra Chondi Development Plan : चोंडीच्या नियोजनबद्ध विकासातून पर्यटनाला चालना मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• पर्यटकांसाठी दर्जेदार सुविधा उभाराव्यात • श्री क्षेत्र चोंडी विकास आराखडा आढावा बैठक मुंबई  : पुण्यश्लोक

Central Railway News : मध्य रेल्वे मार्गावर कोणताही व्यत्यय न आणता मेट्रो लाईन 2ब वरील महत्त्वपूर्ण स्टील स्पॅन उभारणी पूर्ण

कुर्ला ते टिळक नगर रेल्वे ट्रॅक दरम्यान 41.5 मीटर लांबीचा, 178 टन वजनाचा स्ट्रक्चर मुंबई :  मुंबई महानगर प्रदेश विकास

Thane Zilla Parishad : ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलं आता अवकाशाच्या दिशेने; ‘मिशन भरारी’ उपक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवला हिरवा झेंडा

59 ग्रामीण विद्यार्थ्यांची 'इस्रो' सफर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘ग्रामीण ते अवकाश’ व्हिजन ठाणे जिल्हा