Raj Thackeray : छत्रपतींचे नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आता रायगड आठवला!

  89

जोरदार टोला लगावत राज ठाकरेंनी सांगितला 'तो' किस्सा


ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Cogress Party) व घड्याळ हे चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मिळाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांना 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार' हे नाव व 'तुतारी वाजवणारा माणूस' हे चिन्ह देण्यात आले. या चिन्हाचे अनावरण व प्रचार करण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) आज स्वतः रायगडावर पोहोचले होते. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शरद पवारांना जोरदार टोला लगावला. 'छत्रपतींचे नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आता रायगड आठवला!', असं राज ठाकरे म्हणाले. डोंबिवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.



राज ठाकरे म्हणाले, आपल्याकडील महापुरुष हे आपण जातीत विभागून टाकले आहेत. या महापुरुषांवरच राजकारण सध्या आता सुरू आहे. त्यामुळे कधीही छत्रपतींचे नाव न घेणारे आमचे शरद पवार आज त्यांना रायगड आठवला. असं म्हणत राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.


पुढे राज ठाकरे म्हणाले, ठाण्यात जाहीर सभेत मी सांगितलं होतं, त्यांची मुलाखत मी घेतली होती. तेव्हाही त्यांना प्रश्न विचारला होता की, तुम्ही शाहू, फुले, आंबेडकर सर्व बोलता पण छत्रपतींचे नाव कधी घेत नाही. शिवछत्रपतींचे नाव घेतल्यामुळे मुसलमानांची मतं जातात अशा काहीतरी संभ्रमावस्थेमध्ये इतकी वर्ष त्यांनी काढली आणि आता त्यांना फुंकू दे असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

Comments
Add Comment

आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी होणार- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या

पडळकरांनी सांगितलेलं 'ते' कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे का?

पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रथमच डिजिटल क्रांती ; AI तंत्रज्ञानासाठी ऐतिहासिक करार

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा पहिला करार! मंत्री

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

वारीदरम्यान ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक

11th Admission: अकरावीच्या पहिल्या फेरीत सहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले, कारण...

योग्य कागदपत्रे सादर न केल्याने, तसेच अर्जामध्ये चुका करण्यात आल्याने प्रवेश नाकारला मुंबई: राज्यात अकरावी