Raj Thackeray : छत्रपतींचे नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आता रायगड आठवला!

जोरदार टोला लगावत राज ठाकरेंनी सांगितला 'तो' किस्सा


ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Cogress Party) व घड्याळ हे चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मिळाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांना 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार' हे नाव व 'तुतारी वाजवणारा माणूस' हे चिन्ह देण्यात आले. या चिन्हाचे अनावरण व प्रचार करण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) आज स्वतः रायगडावर पोहोचले होते. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शरद पवारांना जोरदार टोला लगावला. 'छत्रपतींचे नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आता रायगड आठवला!', असं राज ठाकरे म्हणाले. डोंबिवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.



राज ठाकरे म्हणाले, आपल्याकडील महापुरुष हे आपण जातीत विभागून टाकले आहेत. या महापुरुषांवरच राजकारण सध्या आता सुरू आहे. त्यामुळे कधीही छत्रपतींचे नाव न घेणारे आमचे शरद पवार आज त्यांना रायगड आठवला. असं म्हणत राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.


पुढे राज ठाकरे म्हणाले, ठाण्यात जाहीर सभेत मी सांगितलं होतं, त्यांची मुलाखत मी घेतली होती. तेव्हाही त्यांना प्रश्न विचारला होता की, तुम्ही शाहू, फुले, आंबेडकर सर्व बोलता पण छत्रपतींचे नाव कधी घेत नाही. शिवछत्रपतींचे नाव घेतल्यामुळे मुसलमानांची मतं जातात अशा काहीतरी संभ्रमावस्थेमध्ये इतकी वर्ष त्यांनी काढली आणि आता त्यांना फुंकू दे असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

Comments
Add Comment

पुणेकरांसाठी मनपाचा उपक्रम; 'क्यूआर' स्कॅन करा अन विकासकामे सुचवा

पुणे :  पुणे महापालिकेच्या २०२६-२७ च्या वार्षिक अर्थसंकल्पात पुणेकरांना थेट सहभाग घेता येणार आहे. शहराच्या

'ई-चलान' वसुलीसाठी सक्ती केल्यास पोलिसांवरच होणार कारवाई; पोलीस महासंचालकांचे निर्देश

मुंबई : रस्त्यावरील वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर आकारल्या जाणाऱ्या ‘ई-चलान’च्या दंडाची वसुली करताना

जळगावात मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष दाखवून...

जळगाव: जळगावमध्ये एका मयत ग्राहकाच्या पत्नीला पैशाचं आमिष देऊन अपघाताचं प्रकरण बनवलं आणि विम्याचे ५० लाख

सरकारने १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांसंदर्भातील दिली मोठी बातमी, काय सांगितलं?

नवी दिल्ली: देशातील चलनात १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांचा तुटवडा आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रोखीचे

जेएनपीए बंदरात कंटेनर अडकलेल्या फळे व भाजीपाला निर्यातदारांना मोठा दिलासा; पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील फळे व भाजीपाला उत्पादक शेतकरी व निर्यातदार यांचे हित लक्षात घेता केंद्र सरकारच्या

लोकनेते बाळासाहेब देसाई यांना ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन; मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

मुंबई: लोकनेते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या ११६व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम मुंबई येथील मेघदूत