Nagpur Crime News : धक्कादायक! नागपुरात प्रेस फोटोग्राफरची गोळ्या झाडून हत्या

भरदिवसा घरात घुसून झाडल्या गोळ्या


नागपूर : नागपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर (Nagpur crime) आला आहे. सदर पोलीस स्टेशन हद्दीत राजनगर येथे एका व्यक्तीची बंदुकीच्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. ही मृत व्यक्ती जुने प्रेस फोटोग्राफर (Press photographer) असल्याची माहिती मिळत आहे. विनय उर्फ बबलू पूनेकर असं मृतकाचं नाव आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, विनय पूनेकर घरात एकटे असताना एक व्यक्ती आला आणि सायलेन्सर लावलेल्या पिस्तुलने त्यांच्यावर गोळी झाडून पळून गेला.


मृत पूनेकर यांना प्रेस फोटोग्राफर म्हणून काम सोडून अनेक वर्षे झाली आहेत. दरम्यान त्यांच्या घरात घुसून काहींनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस घटनेचा तपास करत आहेत.


गेल्या काही दिवसांत राज्यात हत्येच्या घटनांमध्ये आणि गुन्हेगारींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या २४ दिवसांतील ही हत्येची १३वी घटना आहे. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Comments
Add Comment

युद्धामुळे वाढली शेणाच्या गोवऱ्यांची किंमत

मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता इंधन पुरवठ्यावरही दिसू लागले आहेत. इराण,

उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना दिलासा: मुंबई, पुणे, सोलापूरसह अनेक मार्गांवर उन्हाळी धावणार स्पेशल ट्रेन

पुणे : उन्हाळ्याचे दिवस म्हणजेच सुट्टीचे दिवस, वर्षभर अभ्यास करून दमलेल्या मुलांच्या उन्हाळ्यात परीक्षा संपतात

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली