मुंबई : एअर मॉरिशस कंपनीचे मुंबईतून मॉरिशसला जाणारे विमान तांत्रिक दोषामुळे तब्बल पाच तास रखडल्याने व नंतर रद्द झाल्यामुळे मॉरिशसला जाणाऱ्या २०० प्रवाशांना शनिवारी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
या पाच तासांमध्ये हे सर्व प्रवासी विमानातच बसून होते. त्या दरम्यान विमानातील वातानुकुलित यंत्रणा देखील व्यवस्थित नसल्यामुळे एका ७८ वर्षीय वृद्धाला श्वसनाचा त्रास झाल्याचा दावा त्या विमानातील एका प्रवाशाने केला आहे.
मुंबईवरून मॉरिशसला जाण्यासाठी एअर मॉरिशसच्या विमानाने शनिवारी पहाटे पावणे चार वाजता प्रवाशांना विमानात बसण्यासाठी सोडले. विमानाच्या उड्डाणाची वेळ पहाटे ४.३० होती. सर्व प्रवासी विमानात आसनस्थ झाले आणि विमानाच्या उड्डाणाची वेळ टळून गेली तर विमानाने उड्डाण केले नाही.
जवळपास तासाभराने विमानात तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे उड्डाण होऊ शकत नसल्याची माहिती प्रवाशांना देण्यात आली.
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…