Rajendra Patani Passed away : भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं दीर्घ आजारामुळे निधन

  265

वयाच्या ५९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


देवेंद्र फडणवीस यांनी केली श्रध्दांजली अर्पण


मुंबई : भाजपा आमदार राजेंद्र पाटणी (BJP MLA Rajendra Patni) यांचं दीर्घ आजाराने आज मुंबईत निधन झालं. वयाच्या ५९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. राजेंद्र पाटणी हे कारंजा विधानसभा (Karanja Vidhan Sabha) मतदारसंघाचे नेतृत्व करत होते. गेल्या दोन-तीन वर्षांपासून ते आजारी होते. मुंबईमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली.


राजेंद्र पाटणी यांना कोरोना काळात दोन वेळा कोरोना झाला होता. त्याच दरम्यान ते किडनी विकाराने त्रस्त होते. त्यांच्या दोनही किडण्या फेल झाल्या होत्या. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ते आजाराने त्रस्त होते. त्यानंतर त्यांना त्वचेचा कँसर झाल्याचं निदान झालं. गेल्या काही महिन्यांपासून ते रिलायन्स हॉस्पिटल मुंबई इथे उपचार घेत होते. आज सकाळी त्यांचं ९ च्या सुमारास निधन झालं. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अमित शहा (Amit Shah) यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने कुटुंबियांसह भाजपला मोठा धक्का बसला आहे.


आजच शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांचं निधन झालं. त्यापाठोपाठ राजेंद्र पाटणी यांच्या निधनाचं वृत्त आल्याने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. राजेंद्र पाटणी हे सुद्धा एकेकाळचे शिवसैनिक होते. त्यांनी २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. सध्या त्यांची भाजपमध्ये सेंकड टर्म होती.



राजेंद्र पाटणी यांची कारकीर्द कशी होती?


राजेंद्र सुखानंद पाटणी हे १९९७ ते २००३ पर्यंत विधानपरिषदेचे शिवसेनेकडून आमदार होते. २००४ ते २००९ पर्यंत ते वाशीमच्या कारंजा मतदारसंघात विधानसभेमध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र २००९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत २०११ मध्ये त्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र २०१४च्या निवडणुकीत भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले. त्यावेळी भाजपाकडून कारंजा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळाली आणि ते निवडून आले. त्यानंतर भाजपकडून त्यांना जिल्हाध्यक्षपद दिले गेले. २०१९ मध्ये ते पुन्हा कारंजा मतदारसंघात भाजप आमदार म्हणून निवडून आले.



देवेंद्र फडणवीस यांनी केली श्रध्दांजली अर्पण


देवेंद्र फडणवीस यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट लिहित म्हटले आहे, "अत्यंत दुःखद बातमी: विधानसभेतील माझे सहकारी राजेंद्र पाटणीजी यांचे आज निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. ते या संकटातून बाहेर पडतील, अशी आम्हा सर्वांना आशा होती. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली. ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपाने गमावला आहे. पश्चिम विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे, म्हणून ते सतत आग्रही असायचे. त्यांचे निधन ही माझी वैयक्तिक हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबीयांना मिळावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ॐ शांती"




Comments
Add Comment

बीडीडी चाळ वासियांना मिळालेली घरे; मुंबईकरांच्या घराच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीडीडी चाळ ५५६ पुनर्वसन सदनिका चावी वितरण समारंभ मुंबई : मुंबईकरांच्या हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती

महिलांची जोखीम ओळखण्याची क्षमता समाजसुरक्षेसाठी महत्त्वाची — ॲड. राहुल नार्वेकर

सणासुदीच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता समित्यांनी सज्ज राहावे —  नीलम गोऱ्हे मुंबई : विधानपरिषद

लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार

मुंबईच्या विकासाला नवे पंख: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण मुंबई : काही

डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डबेवाल्यांना दिलासा

मुंबई : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला डबेवाला समाजासाठी ऐतिहासिक घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विघटनवादी शक्तींना दूर सारून विद्यार्थ्यांनी एकात्मतेसह अखंडतेचा ध्यास धरावा – मंगलप्रभात लोढा

मुंबई : भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या फाळणीच्या दाहकतेचा निषेध करत राज्यातल्या हजारो आयटीआयमध्ये विभाजन

टीटीएफ २०२५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचा सहभाग महाराष्ट्राचे दालन ठरले ‘सर्वोत्कृष्ट’

मुंबई : वांद्रे येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे  ‘ट्रॅव्हल ट्रेड फेअर २०२५’  (टीटीएफ) या पर्यटनाशी निगडीत