मनोज जरांगे हा शरद पवारांचाच माणूस!

बारसकरांनंतर संगीता वानखेडे यांनी केले मनोज जरांगेंवर गंभीर आरोप


पुणे : अजय महाराज बारसकर (Ajay Maharaj Baraskar) यांच्यापाठोपाठ आणखी एका मराठा आंदोलक महिला आणि स्त्री शक्ती संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष संगीता वानखेडे (Sangeeta Wankhede) यांनी देखिल मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संगीता वानखेडे या पुण्यातील चाकणमधील आहेत.


मनोज जरांगे यांनी महाराष्ट्राला वेडं बनवले. तिथे दंगल घडली का घडवली, याचा सरकारने शोध लावावा. मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे राष्ट्रवादी पवार गटाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचा हात आहे, असे गंभीर आरोप संगीता वानखेडे यांनी केले आहेत. संगीता वानखेडे या मनोज जरांगे यांच्यासोबत मराठा आंदोलनात (Maratha reservation) कार्यरत होत्या. मात्र त्यांनी आता जरांगे यांच्या आंदोलनातून फारकत घेतल्यानंतर, जरांगेंवर घणाघाती टीका केली.


मनोज जरांगे कोण हे मीडियाला सुद्धा माहिती नव्हते. मनोज जरांगे भोळा भाबडा माणूस, मूळ भाषा शैलीत बोलणारा माणूस, म्हणून मी आधी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. मनोज जरांगे यांची बाजू घेऊन छगन भुजबळ यांना मी ट्रोल केले होते तेव्हा ते लोक मला गलिच्छ भाषेत बोलत होते. परंतू दीड महिन्यापासून मी मनोज जरांगे यांचा विरोध करतेय, विषाची बाटली घेऊन मी सोशल मीडियावर बसतेय. मनोज जरांगे कोणालाही विश्वासात घेत नव्हते, फक्त एक फोन ज्यांचा येत होता त्यांना विश्वासात घेत होते. तो फोन शरद पवार यांचाच होता, असा गंभीर आरोपही संगीता वानखेडे यांनी केला.



मनोज जरांगे हे शरद पवार यांचा माणूस आहेत. शरद पवार हे मनोज जरांगे यांना फोन करत होते. पण मराठ्यांना आरक्षण मिळत होते म्हणून अनेक गोष्टींकडे मी कानाडोळा केला. पुण्यात मनोज जरांगे यांचे बॅनर ज्यांनी लावले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते. टोपी घालून मनोज जरांगेंसोबत आम्ही आख्खं पुणे फिरलो. शरद पवार जसे सांगतात तसेच मनोज जरांगे करतात. आरक्षणाचे मारेकरी शरद पवार आहेत, असे देखिल संगीता वानखेडे म्हणाल्या.

Comments
Add Comment

वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठे संकट टळले! नागपूरहून उड्डाण केलेल्या विमानाला धडकला पक्षी...

नागपूर: नागपूरहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानावरील मोठे संकट टळले. विमानाने उड्डाण करताच

राज्यातील बांगलादेशी घुसखोरांना दणका! राज्य सरकारचे मोठे पाऊल, रेशनकार्ड पडताळणीचे आदेश

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी वाढत चालली आहे. याकरता राज्यभरात

‘एमयुएचएस’ च्‍या कुलगुरूपदी डॉ. अजय चंदनवाले

नाशिक : राज्‍य शासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांची नियुक्‍ती ‘महाराष्‍ट्र

“मोदी मिशन हे पुस्तक पुढच्या पिढीला प्रेरणा देणारं”, 'मोदीज् मिशन' मधील काही भाग पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना

मुंबई :“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘मोदीज् मिशन’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे आणि संग्रहित

मुंबईनजिक बांधणार देशातील सर्वाधिक लांबीची भिंत! पण यामागचे कारण काय?

मुंबई : पालघर जिल्ह्यात बांधले जाणारे वाढवण बंदर हा केंद्र सरकारचा एक खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. या बंदरात

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा