मनोज जरांगे हा शरद पवारांचाच माणूस!

बारसकरांनंतर संगीता वानखेडे यांनी केले मनोज जरांगेंवर गंभीर आरोप


पुणे : अजय महाराज बारसकर (Ajay Maharaj Baraskar) यांच्यापाठोपाठ आणखी एका मराठा आंदोलक महिला आणि स्त्री शक्ती संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष संगीता वानखेडे (Sangeeta Wankhede) यांनी देखिल मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संगीता वानखेडे या पुण्यातील चाकणमधील आहेत.


मनोज जरांगे यांनी महाराष्ट्राला वेडं बनवले. तिथे दंगल घडली का घडवली, याचा सरकारने शोध लावावा. मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे राष्ट्रवादी पवार गटाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचा हात आहे, असे गंभीर आरोप संगीता वानखेडे यांनी केले आहेत. संगीता वानखेडे या मनोज जरांगे यांच्यासोबत मराठा आंदोलनात (Maratha reservation) कार्यरत होत्या. मात्र त्यांनी आता जरांगे यांच्या आंदोलनातून फारकत घेतल्यानंतर, जरांगेंवर घणाघाती टीका केली.


मनोज जरांगे कोण हे मीडियाला सुद्धा माहिती नव्हते. मनोज जरांगे भोळा भाबडा माणूस, मूळ भाषा शैलीत बोलणारा माणूस, म्हणून मी आधी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. मनोज जरांगे यांची बाजू घेऊन छगन भुजबळ यांना मी ट्रोल केले होते तेव्हा ते लोक मला गलिच्छ भाषेत बोलत होते. परंतू दीड महिन्यापासून मी मनोज जरांगे यांचा विरोध करतेय, विषाची बाटली घेऊन मी सोशल मीडियावर बसतेय. मनोज जरांगे कोणालाही विश्वासात घेत नव्हते, फक्त एक फोन ज्यांचा येत होता त्यांना विश्वासात घेत होते. तो फोन शरद पवार यांचाच होता, असा गंभीर आरोपही संगीता वानखेडे यांनी केला.



मनोज जरांगे हे शरद पवार यांचा माणूस आहेत. शरद पवार हे मनोज जरांगे यांना फोन करत होते. पण मराठ्यांना आरक्षण मिळत होते म्हणून अनेक गोष्टींकडे मी कानाडोळा केला. पुण्यात मनोज जरांगे यांचे बॅनर ज्यांनी लावले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते. टोपी घालून मनोज जरांगेंसोबत आम्ही आख्खं पुणे फिरलो. शरद पवार जसे सांगतात तसेच मनोज जरांगे करतात. आरक्षणाचे मारेकरी शरद पवार आहेत, असे देखिल संगीता वानखेडे म्हणाल्या.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा