मनोज जरांगे हा शरद पवारांचाच माणूस!

बारसकरांनंतर संगीता वानखेडे यांनी केले मनोज जरांगेंवर गंभीर आरोप


पुणे : अजय महाराज बारसकर (Ajay Maharaj Baraskar) यांच्यापाठोपाठ आणखी एका मराठा आंदोलक महिला आणि स्त्री शक्ती संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष संगीता वानखेडे (Sangeeta Wankhede) यांनी देखिल मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संगीता वानखेडे या पुण्यातील चाकणमधील आहेत.


मनोज जरांगे यांनी महाराष्ट्राला वेडं बनवले. तिथे दंगल घडली का घडवली, याचा सरकारने शोध लावावा. मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे राष्ट्रवादी पवार गटाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचा हात आहे, असे गंभीर आरोप संगीता वानखेडे यांनी केले आहेत. संगीता वानखेडे या मनोज जरांगे यांच्यासोबत मराठा आंदोलनात (Maratha reservation) कार्यरत होत्या. मात्र त्यांनी आता जरांगे यांच्या आंदोलनातून फारकत घेतल्यानंतर, जरांगेंवर घणाघाती टीका केली.


मनोज जरांगे कोण हे मीडियाला सुद्धा माहिती नव्हते. मनोज जरांगे भोळा भाबडा माणूस, मूळ भाषा शैलीत बोलणारा माणूस, म्हणून मी आधी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. मनोज जरांगे यांची बाजू घेऊन छगन भुजबळ यांना मी ट्रोल केले होते तेव्हा ते लोक मला गलिच्छ भाषेत बोलत होते. परंतू दीड महिन्यापासून मी मनोज जरांगे यांचा विरोध करतेय, विषाची बाटली घेऊन मी सोशल मीडियावर बसतेय. मनोज जरांगे कोणालाही विश्वासात घेत नव्हते, फक्त एक फोन ज्यांचा येत होता त्यांना विश्वासात घेत होते. तो फोन शरद पवार यांचाच होता, असा गंभीर आरोपही संगीता वानखेडे यांनी केला.



मनोज जरांगे हे शरद पवार यांचा माणूस आहेत. शरद पवार हे मनोज जरांगे यांना फोन करत होते. पण मराठ्यांना आरक्षण मिळत होते म्हणून अनेक गोष्टींकडे मी कानाडोळा केला. पुण्यात मनोज जरांगे यांचे बॅनर ज्यांनी लावले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते. टोपी घालून मनोज जरांगेंसोबत आम्ही आख्खं पुणे फिरलो. शरद पवार जसे सांगतात तसेच मनोज जरांगे करतात. आरक्षणाचे मारेकरी शरद पवार आहेत, असे देखिल संगीता वानखेडे म्हणाल्या.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये