मुंबई: भारतीय जेवणांमध्ये बटाट्याचा(potato) वापर सर्वाधिक केला जातो. साधारण प्रत्येक भाजीमध्ये बटाटा हा असतोच. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की जर तुम्ही एक महिन्यापर्यंत बटाटा सोडला तर तुमच्या शरीरात काय बदल होतील.
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला स्ट्रिक्ट डाएट फॉलो करावे लागेल. अशातच तज्ञही तुम्हाला बटाटा खाणे सोडून देण्याचा सल्ला देतात.
बटाट्यामध्ये मोठ्या संख्येने कॅलरीज असतात. जर तुम्ही याचे सेवन करत नसाल तर शरीरात फॅट वाढणार नाही. बटाट्यामध्ये स्टार्च असते जे ब्लड शुगर वाढ होऊ शकते. डायबिटीजच्या रुग्णांनी बटाटा खाणे बंद केले तर ब्लड शुगर स्तर नियंत्रणात आणू शकतात.
बटाटा कमी खाल्ल्याने शरीरात कार्बोहायड्रेटचे प्रमाणही कमी होईल. यामुळे मेटाबॉलिक आरोग्य चांगले राहील. बटाट्याने बनवलेले प्रोसेस्ड फूड जसे बटाटा चिप्स, फ्रेंच फ्राईजमध्ये मोठ्या प्रमाणात सोडियम असते.
याच्या सेवनाने हाय बीपी आणि हृदयासंबंधी आजारांचा सामना करावा लागतो. दरम्यान, बटाट्यामध्ये व्हिटामिन सी, व्हिटामिन बी६, पोटॅशियम, फायबरसारखे पोषकतत्वेही असतात. जे शरीरासाठी गरजेची असतात.
डाएटमध्ये हे हटवण्याआधी याचा पर्याय शोधून ठेवा. याच्या जागी तुम्ही रताळे, फुलकोबी, शलगम अथवा केळ्याला डाएटमध्ये सामील करू शकता.
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…