पोलिसांचा नाचगाण्याला पाठींबा, किर्तनाला विरोध

मीरा रोडला शिवजयंती उत्सवातील किर्तन पोलिसांनी केले बंद


भाईंदर : मीरा भाईंदर शहराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक परिसरात मराठी एकीकरण समितीच्या वतीने साजरा होत असलेल्या शिवजन्मोत्सवात सुरू असलेले किर्तन रात्री दहा वाजल्यामुळे पोलिसांनी बंद करण्यास लावले.


मराठी एकीकरण समितीच्या वतीने मीरा रोडच्या काशिमीरा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ शिवजन्मोत्सव सोमवारी साजरा करण्यात आला. सकाळी ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून स्मारकास पुष्पहार अर्पण करण्याचा तर संध्याकाळी शिव जन्मोत्सव, शिव चरित्र चर्चा, व्याख्याने, ऐतिहासिक व्यक्तींची वेशभूषा स्पर्धा, रांगोळी, रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आणि कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


पण रात्रौ ठीक १० वाजता पोलीस आले आणि वेळ संपली आहे, असे सांगून किर्तन बंद करण्यास सांगितले. आयोजक व कार्यकर्त्यांनी फक्त पाच मिनिटात किर्तन पूर्ण होईल, असे सांगितले. परंतु काशीमीरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक बेलोसे यांनी काही एक न ऐकता, कायदा मोडू नये, असे सांगून किर्तन बंद करण्यास लावले.


पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेबाबत मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन केले. रात्री १२ पर्यंत मीरा भाईंदर शहरात चालणारे इतर नाच गाण्यांच्या कार्यक्रमात सुद्धा अशीच तत्परता दाखवा, अशी विनंती केली आहे. गोवर्धन देशमुख यांनी पोलीस महासंचालक आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत तक्रार नोंदवली आहे.

Comments
Add Comment

गॅस सिलिंडरच्या मागणीत २० ते २२ लाखांनी वाढ

नवी दिल्ली : गॅस तुटवड्यामुळे केवळ व्यावसायिकच नव्हे, तर त्यावर अवलंबून असणारे शेकडो कामगार आणि स्थानिक

मासिक पाळी रजा अनिवार्य करण्यास नकार, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मासिक पाळी रजा अनिवार्य करण्याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळून लावली आहे.

राज्यातील अनधिकृत मोबाईल टॉवर्सचे लवकर सर्वेक्षण

मुंबई : केंद्र शासनाचे धोरण आणि राज्याची गरज यांचा मेळ घालून भविष्यात महाराष्ट्राची स्वतंत्र 'टॉवर पॉलिसी' कशी

‘एआय’, डिजिटल सुविधा आणि विविध योजनांमुळे महाराष्ट्रातील शेती अधिक सक्षम होणार : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

शेतकऱ्यांच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, नैसर्गिक शेती, अन्नप्रक्रिया उद्योग आणि पायाभूत सुविधांवर

अनाथ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संदर्भातील अडचणी दूर करू

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांना राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शुल्काचा भार हलका करणार, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

मुंबई : राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जाची