Manoj Jarange Patil : ज्या मागणीसाठी उठाव नव्हता ती मागणी मान्य केली!

मनोज जरांगे अजूनही असमाधानीच! उद्या ठरवणार पुढील आंदोलनाची दिशा


जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर राज्य सरकारने (Maharashtra Government) आज विशेष अधिवेशन बोलावलं होतं. यामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग असा प्रवर्ग निर्माण करत मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देऊ केलं आहे. आज विधीमंडळात पास झालेल्या विधेयकानुसार मराठ्यांना नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये १० टक्के आरक्षण मिळणार आहे. पण आम्ही ही मागणी केलीच नसून सगेसोयऱ्यांच्या बाबतीत निर्णय व्हावा, असं मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी म्हटलं आहे. सरकारच्या निर्णयाबाबत जरांगे अजूनही असमाधानीच असून ते उद्या पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत.


सरकारने मराठा आरक्षणासंबंधीचा जीआर पास केल्यानंतर काही दिवसांतच म्हणजे १० फेब्रुवारीला जरांगेंनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. यानंतर सरकारने तात्काळ हालचाली करत विशेष अधिवेशन बोलावत आज अखेर मराठ्यांना आरक्षण देऊ केलं आहे. शिवाय हे आरक्षण कोर्टात टिकणारं असेल, अशी हमीही दिली आहे. मात्र, जरांगेंचं या निर्णयाने समाधान झालेलं नाही.


सगेसोयऱ्यांच्या बाबतीत निर्णय न झाल्याचं कारण देत जरांगेंनी उपचार घेणं थांबवलं आहे. त्यांची मुख्य मागणी ही स्वतंत्र आरक्षणाची नसून सगेसोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याची आहे, असं ते म्हणाले. सरकारच्या या निर्णयाविरोधात त्यांनी उद्या आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची बैठक बोलावली आहे. मराठ्यांनी मोठ्या संख्येने बैठकीसाठी यावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.



जरांगे नेमकं काय म्हणाले?


मनोज जरांगे म्हणाले की, आज मंजूर झालेला कायदा गोरगरीब मराठ्यांमुळे मंजूर झाला आहे. आम्ही या आरक्षणाची मागणी केलेलीच नाही. तरीही दिलेलं आरक्षण कोर्टात टिकलं नाही तर मराठ्यांच्या उद्रेकाला सरकारला सामोरं जावं लागेल. सगेसोयऱ्याच्या बाबतीत आज निर्णय घ्यायला पाहिजे होता. ज्या मागणीसाठी उठावच नव्हता ती मागणी मान्य केली आहे. ज्यांना आजच्या आरक्षणाची गरज होती त्यांच्यासाठी सरकारने निर्णय घेतला. त्यांना गोरगरीब मराठ्यांची गरज नाही, असंच यातून दिसून येत आहे, असं जरांगे म्हणाले.


Comments
Add Comment

Bus Accident : चालक ठरला देवदूत! २०० फूट खोल दरीच्या उंबरठ्यावर बस! चालकाच्या प्रसंगावधानामुळे ४५ प्रवाशांचे प्राण वाचले

सिंधुदुर्ग : गोवा-पणजीहून वेंगुर्ल्याकडे येणाऱ्या कदंबा वाहतूक महामंडळाच्या बसचा आजगाव-वाघबीळ येथील धोकादायक

Maharashtra Monsoon Update : महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे सावट! आज १९ जिल्ह्यांना यलो, तर ४ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; मुसळधार सरींचा इशारा

मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून, राज्यातील अनेक भागांवर काळे ढग दाटून आले आहेत. मंगळवारी

Ganpati Special Train: गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेची मोठी घोषणा; 246 विशेष गाड्या धावणार, मुंबई-कोकण प्रवास होणार सुलभ

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या भाविक आणि प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने मोठा दिलासा दिला

Revenue Department : नोंदणी व मुद्रांक विभागात 160 अधिकाऱ्यांना पदोन्नती; महसूल विभागाचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील नोंदणी व मुद्रांक विभागाच्या प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा

Devendra Fadnavis : गारगाई धरण प्रकल्पाच्या कामांना गती द्यावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईसाठी प्रकल्प ठरणार महत्वपूर्ण ठरणार मुंबई, दि. २७ : पालघर जिल्ह्यातील देवळी परिसरात होत असलेल्या गारगाई

Maharashtra Revenue Department : महसूल विभागाच्या अभियानात ३,४३६ महिलांना शेतकरी दर्जा; ६ दिवसांत ४.३५ लाख नागरिकांना योजनांचा लाभ

मुंबई: महसूल विभागाच्या 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' अभियानाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत