IND vs ENG: रांची कसोटीआधी टीम इंडियासाठी खुशखबर, टीम इंडियात या सुपरस्टार खेळाडूचे पुनरागमन

मुंबई: भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात व्यस्त आहे. येथे इंग्लंडने हैदराबाद कसोटीत विजय मिळवला होता. त्यानंतर भारतीय संघाने विशाखापट्टणम आणि राजकोट कसोटीत विजय मिळवला. आता दोन्ही संघादरम्यानचा चौथा कसोटी सामना २३ फेब्रुवारीपासून रांचीमध्ये खेळवला जाणार आहे. रांची कसोटीआधी भारतीय संघासाठी चांगली बातमी समोर येत आहे.



राहुल दुखापतीतून सावरला


स्टार फलंदाज केएल राहुलचे या चौथ्या सामन्यात पुनरागमन होऊ शकते. राहुलला क्वाड्रिसेप्समध्ये दुखापत झाली होती. यातून तो सावरला आहे. राहुल आपल्या उजव्या क्वाड्रिसेप्सच्या दुखापतीमुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत खेळू शकला नव्हता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुलने गेल्या आठवड्यात ९० टक्के फिटनेस मिळवला होता.


यातच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला चौथ्या कसोटीत आराम दिला जाऊ शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय संघ मंगळवारी रांचीसाठी रवाना होईल. या कसोटीत बुमराहला आराम मिळण्याची शक्यता आहे. राहुल फिटनेस मिळवण्याच्या जवळ आहे आणि त्याचा संघात समावेश होईल याची शक्यता आहे.


मालिकेतील पहिल्या सामन्यात केएल राहुलने जबरदस्त फलंदाजी केली होती. मात्र दुखापतीमुळे त्याला पुढील दोन कसोटी सामने खेळता आले नव्हते. बुमराहबाबत बोलायचे झाल्यास पाच सामन्यांच्या या मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंतच्या तीन सामन्यात १७ विकेट घेतले आहे. भारत सध्या या मालिकेत २-१ अशा आघाडीवर आहे.



भारताचे पुढील कसोटी सामने


चौथा कसोटी सामना - २३-२७ फेब्रुवारी, रांची
पाचवा कसोटी सामना, ७-११ मार्च, धर्मशाला

Comments
Add Comment

अर्जुन आणि सानियाला दिल्या अमित शाह यांनी खास पत्रातून शुभेच्छा

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारताचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या कुटुंबाला विशेष

FIFA 2026 : फिफा २०२६ च्या विश्वचषकातून इराण बाहेर; फिफाने ठोठावला इराणला दंड

- या भ्रष्ट राजवटीने आमच्या नेत्याची हत्या केली, आम्ही कोणत्याही परिस्थितीत विश्वचषकात सहभागी होऊ शकत

IPL 2026 : आयपीएल२०२६ पर्वाचे वेळापत्रक जाहीर; आरसीबी आणि एसआरएचमध्ये होणार सलामीची लढत

मुंबई : आयपीएल २०२६ च्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) १९

अर्जुन पुरस्काराचे मानकरी जलतरणपटू वीरधवल खाडे सरकारी नोकरीत

मुंबई : राज्याचे नाव क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर नेणारे नामवंत जलतरणपटू आणि माजी तहसीलदार वीरधवल खाडे

BCCI कडून विश्वविजेत्या टीम इंडियाला १३१ कोटींचं बक्षिस , परंतु प्रत्यक्षात एवढे पैसे मिळणार

मुंबई: टी२० विश्वचषक २०२६ मधील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघावर बीसीसीआयकडून बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला

T20 World Cup 2026 : आयसीसी 'टीम ऑफ द टूर्नामेंट'मध्ये चार भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश

आयसीसीने टी-२० साठी सर्वोत्तम संघ निवडला असून या संघात चार भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे. संजू