Rituraj Singh Died : प्रसिद्ध अभिनेते ऋतुराज सिंह यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

छोट्या पडद्यावरील होता लोकप्रिय चेहरा


मुंबई : टीव्ही मालिका व चित्रपटांमध्ये (TV serials and films) आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे ऋतुराज सिंह (Rituraj Singh) यांचं मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने (Heart attack) निधन झालं. ते ५९ वर्षांचे होते. मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील त्यांच्या राहत्या घरीच मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.


ऋतुराज यांचा जवळचा मित्र अमित बहल याने त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ऋतुराजच्या अचानक निधनाने धक्का बसला असल्याचे त्याने म्हटले. ते काही काळापासून स्वादुपिंडाशी संबंधित समस्यांनी त्रस्त होते. स्वादुपिंडाच्या उपचारासाठी त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर घरी परतल्यानंतर त्यांना हृदयविकाराच्या काही समस्या निर्माण झाल्या आणि त्यांचे निधन झाले असल्याचे अमित बहल याने सांगितले.



अनेक टीव्ही मालिका व चित्रपटांमध्ये केले होते काम


ऋतुराज यांनी ९० च्या दशकात झी टीव्हीवर 'तोल मोल के बोल' हा रिॲलिटी गेम शो होस्ट करून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. १९९३ मध्ये झी टीव्हीवर त्याचा प्रसारित झालेला टीव्ही शो 'बनेगी अपनी बात'ही खूप गाजला. ‘ज्योती’, ‘हिटलर दीदी’, ‘शपथ’, ‘वॉरियर हाय’, ‘आहट’, 'लाडो 2' , ‘अदालत’, ‘दिया और बाती’ अशा अनेक शोमध्ये त्यांनी काम केलं होतं. ते रुपाली गांगुलीसह लोकप्रिय हिंदी मालिका ‘अनुपमा’मध्ये देखील झळकले होते.


याशिवाय त्यांनी ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’, ‘सत्यमेव जयते २’, ‘थुनिवू’, ‘जर्सी’, ‘हम तूम और घोस्ट’ या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. जानेवारीत प्रदर्शित झालेल्या रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलीस फोर्स’मध्ये ऋतुराज यांनी रफीक ही भूमिका साकारली होती. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. सोशल मीडियावर अनेक चाहते त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

Comments
Add Comment

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच