तुमची मुले सतत जंक फूड खातायत का? य़ा टिप्सने कमी करा ही सवय

मुंबई: सध्याची धावपळीची जीवनशैलीमुळे अनेक आजार आपल्याला घेरत आहेत. खराब खाण्यापिण्याचा परिणाम मुलांपासून ते मोठ्यांवरही होत आहे. मोठे असो वा लहान मूल सर्वांनाच जंक फूड खायला आवडते. मात्र हे चवीला चांगले लागणारे जंक फूड आरोग्यासाठी नुकसानदायक आहे.


तुमच्याही मुलांना जंकफूड खाण्याची सवय आहे तर त्यापासून सुटका कशी मिळवाल यासाठी आम्ही तुम्हाला टिप्स देत आहोत. त्यासाठी तुम्हाला या टिप्स फॉलो कराव्या लागतील.



मुलांच्या खाण्यापिण्यात करा बदल


मुलांच्या खाण्यापिण्यात अचानक बदल करणे थोडे कठीण असते. अशातच मुलांमध्ये हळू हळू हेल्दी फूड खाण्याची सवय लावा. यामुळे योग्य प्रमाणात पोषकतत्वे त्यांना मिळतील.



मुलांच्या आवडीचे हेल्दी फूड


जर तुमच्या मुलाला हेल्दी फूड जसे भाजी खाणे आवडत नाही तर त्यात मसाले मिसळा. दही अथवा सॉससोबत त्याला खाण्यास द्या.



वेळेवर करा सुरूवात


मुलांच्या खाण्यापिण्यात खास बदल करा. सोबतच मुलाला जर समजावून समजत असेल तर त्याला सांगा की हिरव्या भाज्या खाल्ल्याने काय फायदे होतात.



डाएटमध्ये प्रोटीनचा करा समावेश


मुलांच्या खाण्यापिण्यात प्रोटीनचा अधिकाधिक समावेश करा. यामुळे एक्स्टा कॅलरीज वाचतील. सोबतच त्यांची जंक फूड खाण्याची इच्छा शांत होईल. दूध, अंडी, मासे, चिकन आणि धान्ये अधिकाधिक खा.



खाण्याची वेळ ठरवा


जेवणाची वेळ ठरवा. आठवड्याच्या हिशेबाने मेन्यू बनवा. यामुळे मुलांना दररोज वेगवेगळे पदार्थ खाण्यास मिळतील. त्यांना प्रोटीन तसेच पनीर खायला द्या.

Comments
Add Comment

उत्तम आरोग्यासाठी पोटाकडे लक्ष द्या..

पोटाचे आरोग्य उत्तम असेल तर आपलं पूर्ण शरीर निरोगी राहतं. पोटाचं आरोग्य सांभाळण्यासाठी आतड्याचे स्वच्छ राहणे,

Hair Care: केस गळती थांबवण्यासाठी 'या' ५ बियांचे सेवन करा, नैसर्गिकरित्या केस वाढतील

मुंबई : आजकाल बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे केस गळण्याची समस्या खूप वाढली आहे. अशा परिस्थितीत, केसांचे

योगाचे प्रकार

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके मागील लेखात पातंजल-योगाव्यतिरिक्त योगाच्या इतर प्रकारांपैकी हठयोगाविषयी माहिती

Health: सकाळी, दुपारी की रात्री? ड्रायफ्रुट्स खाण्याची योग्य वेळ कोणती, घ्या जाणून...

मुंबई: सुका मेवा (Dry fruits) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु तो कोणत्या वेळी खावा, हे जाणून घेणे महत्त्वाचे

उष्ण पदार्थांचे अति सेवन : उच्च रक्तदाब आणि त्वचेच्या समस्यांचे प्रमुख कारण !

मुंबई : आयुर्वेद हा भारतीय प्राचीन आरोग्यशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये शरीराच्या संतुलनावर विशेष

साथींच्या आजारापासून मुलांना दूर ठेवा

विनायक बेटावदकर गणपती उत्सवापूर्वी सुमारे पंधरा दिवस, गणपती उत्सवात कल्याण शहर, ग्रामीण भागाचे हवामान साधारण