Udhhav Thackeray : उद्धव ठाकरे मोदीजींसमोर आत्मसमर्पण करणार!

अपक्ष आमदार रवी राणा यांचा दावा


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Elections) भाजपाचा (BJP) प्रभाव वाढवण्यासाठी भाजपा तगडी रणनिती आखत आहे. विरोधी पक्षांमधील (Opposition Parties) अनेक बडेबडे नेते भाजपने आपल्या साथीला घेतले आहेत. त्यामुळे निवडणुका तोंडावर आलेल्या असताना महाविकास आघाडीला (MVA) मोठे धक्के पचवावे लागत आहेत. उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) व शरद पवार (Sharad Pawar) हे मविआचे दोन प्रमुख नेते महाराष्ट्रात विरोधी आघाडीचं नेतृत्व करत आहेत. मात्र आता उद्धव ठाकरे देखील भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केला आहे. नवी दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे तसेच संजय राऊतांवरही (Sanjay Raut) टीकास्त्र उपसलं.


आमदार रवी राणा म्हणाले, उद्धव ठाकरे हे सध्या प्रचंड बैचेन आहेत. त्यांना कधी एकदा मोदीजींचं दर्शन घेतो आणि माफी मागतो, असं झालं आहे. मी मोदीजींसमोर कधी आत्मसमर्पण करतो, अशी त्यांची अवस्था झाली आहे. उद्धव ठाकरे हे सध्या काही लोकांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांचं नेतृत्त्व स्वीकारुन पंतप्रधान मोदींना पाठिंबा देतील. ते लवकरच काँग्रेस आणि शरद पवार गटाची साथ सोडतील, असा दावा रवी राणा यांनी केला.



मातोश्रीवर सध्या चिंतन सुरु


एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन एनडीए आघाडीत आले. अजित पवारही मोदींसोबत आले. उद्धव ठाकरे यांना अहंकारामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विसर पडला होता. परंतु, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही, हे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे मातोश्रीवर सध्या चिंतन सुरु आहे, असा दावा रवी राणा यांनी केला.



संजय राऊत म्हणजे राज्यावरचं विघ्न


यावेळेस रवी राणा यांनी संजय राऊतांवरही टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, संजय राऊत हे राज्यावरचं विघ्न आहेत. संजय राऊत हे दिल्लीत आहेत, पण महाराष्ट्र सदनात शिवजयंतीला ते आले नाहीत. त्यांचा शिवाजी महाराजांबद्दलचा आदर हा बेगडी आहे, अशी टीका रवी राणा यांनी केली.

Comments
Add Comment

25 वर्षांच्या संसारात मिठाचा खडा , 7 लेकरांची आईने चारित्र्याच्या संशयाने जीव गमावला ; काय घडलं ?

Bihar Crime : बिहारमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. २५ वर्षाच्या संसारात मिठाचा खडा पडला. 25 वर्षांपूर्वी ज्या

Konkan Hapus' Fills Delhi : दिल्लीत 'कोकण हापूस'चा सुगंध! निवासी आयुक्त आर. विमला यांच्या हस्ते आंबा महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन

नवी दिल्ली : दिल्लीच्या बाजारपेठेत अनेक प्रकारचे आंबे उपलब्ध असतात, मात्र तो आंबा अस्सल देवगड किंवा

Srilanka Cricket News : क्रिकेटविश्व हादरलं! 2 खेळाडूंनी हॉटेलच्या बाथरूममध्ये लपून काढले महिला डॉक्टरचे अश्लील व्हिडीओ

क्रीडा विश्वाला हादरवून सोडणारी आणि अत्यंत संतापजनक अशी एक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. दोन क्रिकेटपटूंनी एका

Jabalpur Cruise: जबलपूर क्रूझ दुर्घटनेत 9 जणांचा करुण अंत, माय-लेकाचा 'तो' क्षण काळीज पिळवटून टाकणारा; नेमकं काय घडलं ?

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील जबलपूर इथलं लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या बर्गी धरणावर गुरुवारी रात्री एका

LPG Gas Price Hike : महागाईचा भडका! तब्बल ९९३ रुपयांनी महागला गॅस सिलेंडर; जाणून घ्या एका सिलेंडरसाठी किती रुपये मोजावे लागणार?

मुंबई : मे महिन्याच्या सुरुवातीलाच तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांना मोठा धक्का दिला आहे. १९ किलोच्या व्यावसायिक

Madhya Pradesh Narmada cruise accident : बरगी धरणात क्रूझ बुडाले, ४ जणांचा मृत्यू,१०-१५ बेपत्ता

मध्यप्रदेशच्या जबलपूर येथील बरगी धरण परिसरात अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यांमुळे एक मोठा अपघात घडला.