Udhhav Thackeray : उद्धव ठाकरे मोदीजींसमोर आत्मसमर्पण करणार!

अपक्ष आमदार रवी राणा यांचा दावा


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Elections) भाजपाचा (BJP) प्रभाव वाढवण्यासाठी भाजपा तगडी रणनिती आखत आहे. विरोधी पक्षांमधील (Opposition Parties) अनेक बडेबडे नेते भाजपने आपल्या साथीला घेतले आहेत. त्यामुळे निवडणुका तोंडावर आलेल्या असताना महाविकास आघाडीला (MVA) मोठे धक्के पचवावे लागत आहेत. उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) व शरद पवार (Sharad Pawar) हे मविआचे दोन प्रमुख नेते महाराष्ट्रात विरोधी आघाडीचं नेतृत्व करत आहेत. मात्र आता उद्धव ठाकरे देखील भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केला आहे. नवी दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे तसेच संजय राऊतांवरही (Sanjay Raut) टीकास्त्र उपसलं.


आमदार रवी राणा म्हणाले, उद्धव ठाकरे हे सध्या प्रचंड बैचेन आहेत. त्यांना कधी एकदा मोदीजींचं दर्शन घेतो आणि माफी मागतो, असं झालं आहे. मी मोदीजींसमोर कधी आत्मसमर्पण करतो, अशी त्यांची अवस्था झाली आहे. उद्धव ठाकरे हे सध्या काही लोकांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांचं नेतृत्त्व स्वीकारुन पंतप्रधान मोदींना पाठिंबा देतील. ते लवकरच काँग्रेस आणि शरद पवार गटाची साथ सोडतील, असा दावा रवी राणा यांनी केला.



मातोश्रीवर सध्या चिंतन सुरु


एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन एनडीए आघाडीत आले. अजित पवारही मोदींसोबत आले. उद्धव ठाकरे यांना अहंकारामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विसर पडला होता. परंतु, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही, हे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे मातोश्रीवर सध्या चिंतन सुरु आहे, असा दावा रवी राणा यांनी केला.



संजय राऊत म्हणजे राज्यावरचं विघ्न


यावेळेस रवी राणा यांनी संजय राऊतांवरही टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, संजय राऊत हे राज्यावरचं विघ्न आहेत. संजय राऊत हे दिल्लीत आहेत, पण महाराष्ट्र सदनात शिवजयंतीला ते आले नाहीत. त्यांचा शिवाजी महाराजांबद्दलचा आदर हा बेगडी आहे, अशी टीका रवी राणा यांनी केली.

Comments
Add Comment

Sharad Pawar : विरोधकांच्या रणनीतीदरम्यान शरद पवार-सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच नीट (NEET) पेपर लीक प्रकरणावरून विरोधकांनी केंद्र

Sikkim Landslide : सिक्कीमच्या जलविद्युत प्रकल्पात भीषण दुर्घटना; बोगदा कोसळून २० जणांचा मृत्यू, ५ जण बेपत्ता

सिक्कीम : सिक्कीम (Sikkim) मधील नामची (Namchi) जिल्ह्यात एनएचपीसी (NHPC) च्या तीस्ता स्टेज-६ जलविद्युत प्रकल्पातील (Hydroelectric Project)

Char Dham Yatra : चार धाम यात्रा तात्पुरत्या स्थगितीनंतर पुन्हा सुरू

नवी दिल्ली : यात्रेच्या मार्गांचा सखोल आढावा घेतल्यानंतर, २० जुलै रोजी सुरक्षेचा उपाय म्हणून तात्पुरती स्थगित

NEW DELHI : आमच्यावर विटा आणि कुंडी फेकून मारल्या , जखमी दिल्ली पोलिसांनी दिली माहिती

नवी दिल्ली : संसदेजवळ झालेल्या हिंसाचारादरम्यान आंदोलकांनी जवळच असलेल्या एका संरचनेचा काही भाग तोडून विटा गोळा

Urea Production : युरिया उत्पादनात देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल, खासदार अशोक चव्हाणांच्या प्रश्नाला केंद्राचे उत्तर

नवी दिल्ली : शेती आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या युरिया उत्पादनाबाबत एक महत्त्वाची बातमी आहे.

Russian Missile Attack : रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ४ भारतीय खलाशांचा मृत्यू; भारताचा संताप, रशियन राजदूतांना समन्स

नवी दिल्ली : युक्रेनच्या किनारपट्टीजवळील व्यापारी मालवाहू जहाजावर झालेल्या रशियन हल्ल्यात चार भारतीय खलाशांचा