Udhhav Thackeray : उद्धव ठाकरे मोदीजींसमोर आत्मसमर्पण करणार!

  118

अपक्ष आमदार रवी राणा यांचा दावा


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Elections) भाजपाचा (BJP) प्रभाव वाढवण्यासाठी भाजपा तगडी रणनिती आखत आहे. विरोधी पक्षांमधील (Opposition Parties) अनेक बडेबडे नेते भाजपने आपल्या साथीला घेतले आहेत. त्यामुळे निवडणुका तोंडावर आलेल्या असताना महाविकास आघाडीला (MVA) मोठे धक्के पचवावे लागत आहेत. उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) व शरद पवार (Sharad Pawar) हे मविआचे दोन प्रमुख नेते महाराष्ट्रात विरोधी आघाडीचं नेतृत्व करत आहेत. मात्र आता उद्धव ठाकरे देखील भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केला आहे. नवी दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे तसेच संजय राऊतांवरही (Sanjay Raut) टीकास्त्र उपसलं.


आमदार रवी राणा म्हणाले, उद्धव ठाकरे हे सध्या प्रचंड बैचेन आहेत. त्यांना कधी एकदा मोदीजींचं दर्शन घेतो आणि माफी मागतो, असं झालं आहे. मी मोदीजींसमोर कधी आत्मसमर्पण करतो, अशी त्यांची अवस्था झाली आहे. उद्धव ठाकरे हे सध्या काही लोकांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांचं नेतृत्त्व स्वीकारुन पंतप्रधान मोदींना पाठिंबा देतील. ते लवकरच काँग्रेस आणि शरद पवार गटाची साथ सोडतील, असा दावा रवी राणा यांनी केला.



मातोश्रीवर सध्या चिंतन सुरु


एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन एनडीए आघाडीत आले. अजित पवारही मोदींसोबत आले. उद्धव ठाकरे यांना अहंकारामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विसर पडला होता. परंतु, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही, हे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे मातोश्रीवर सध्या चिंतन सुरु आहे, असा दावा रवी राणा यांनी केला.



संजय राऊत म्हणजे राज्यावरचं विघ्न


यावेळेस रवी राणा यांनी संजय राऊतांवरही टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, संजय राऊत हे राज्यावरचं विघ्न आहेत. संजय राऊत हे दिल्लीत आहेत, पण महाराष्ट्र सदनात शिवजयंतीला ते आले नाहीत. त्यांचा शिवाजी महाराजांबद्दलचा आदर हा बेगडी आहे, अशी टीका रवी राणा यांनी केली.

Comments
Add Comment

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके