Hemant Godse car Accident : नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या गाडीचा दिल्लीत भीषण अपघात

सुदैवाने मोठी दुखापत नाही


नवी दिल्ली : नाशिकचे (Nashik) खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आज ते नवी दिल्लीमध्ये (New delhi) गेले असता त्यांच्या गाडीला भीषण अपघात (Car accident) झाला आहे. राजधानी दिल्लीतील (Delhi) बी डी मार्गावर हा अपघात झाला. या अपघातात हेमंत गोडसे थोडक्यात बचावले आहेत मात्र, त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झालं आहे.


हेमंत गोडसे दिल्लीत येत होते, ते इनोव्हा MH 15 FC 9909 या गाडीने प्रवास करत होते. त्यावेळी त्यांच्या गाडीला पाठीमागून आर्टिका डीएल 7CW 2202 या गाडीने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की त्यांच्या कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. हेमंत गोडसे यांना मोठी दुखापत झालेली नाही. गोडसे यांच्याशिवाय त्यांच्यासोबत असणारे सहकारीही सुरक्षित आहेत.


राज्यासह देशभरात आज शिवजयंतीचा उत्साह आहे. राजधानी दिल्लीतही शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं आहे. नाशिकचं ढोल पथक या शिवजयंती सोहळ्याला दरवर्षी उपस्थित असतं. महाराष्ट्र सदनात या ढोलपथकाचं वादन असतं. याच कार्यक्रमाला हेमंत गोडसे जात असावेत असा अंदाज वर्तवला जात आहे.



कोण आहेत हेमंत गोडसे?


हेमंत गोडसे हे शिवसेना शिंदे गटातील नाशिकचे खासदार आहेत. हेमंत गोडसे यांच्या राजकारणाची सुरुवात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून झाली. २००९ च्या निवडणुकीतही त्यांनी मनसेकडून खासदारकीची निवडणूक लढवली होती. त्यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. २०१४ आणि २०१९ साली खासदार हेमंत गोडसे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवत मोठा विजय मिळवला होता.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला