India vs England: टीम इंडियाने ९२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा केली अशी कामगिरी

राजकोट: भारताने इंग्लंडविरुद्धच्या राजकोट कसोटीत ४३४ धावांनी विजय मिळवला. सामन्यात भारताने इंग्लंडला विजयासाठी ५५७ धावांचे आव्हान दिले होते. याचा पाठलाग करताना बेन स्टोक्सचा संघ चौथ्या दिवशी १२२ धावांवर ऑलआऊट झाला. कसोटी इतिहासात इतक्या मोठ्या धावसंख्येने जिंकण्याची ही भारताची पहिली वेळ आहे. याआधी त्यांनी डिसेंबर २०२१मध्ये न्यूझीलंडला वानखेडे कसोटी सामन्यात ३७२ धावांनी हरवले होते.


पाहिले असता भारतीय संघाने पहिल्यांदा कसोटीच्या इतिहासात ४००हून अधिक धावांनी विजय मिळवला आहे. भारतीय संघ १९३२ पासून कसोटी सामने खेळत आहे. मात्र इतका मोठा विजय याआधी कधीच मिळाला नव्हता. ९२ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर भारतीय संघाने हा विजय मिळवला.


भारताने आतापर्यंत ५७७ कसोटी सामने खेळले आहे त्यातील १७६ सामन्यात विजय मिळवला तर १७८मध्ये पराभवाचा सामना करावा लागला. तर २२२ सामने अनिर्णीत राहिले. भारताचा एक सामना बरोबरीत सुटला.



भारताचा धावांनी मोठा विजय


४३४ विरुद्ध इंग्लंड राजकोट २०२४
३७२ विरुद्ध न्यूझीलंड मुंबई २०२१
३३७ विरुद्ध दक्षिण आफ्रिका दिल्ली २०१५
३२१ विरुद्ध न्यूझीलंड इंदौर २०१६
३२० विरुद्ध ऑस्ट्रेलिया मोहाली २००८



इंग्लंडचा धावसंख्येने मोठा पराभव


५६२ विरुद्ध ऑस्ट्रेलिया द ओव्हल १९३४
४३४ विरुद्ध भारत राजकोट २०२४
४२५ विरुद्ध वेस्ट इंडिज मँचेस्टर १९७६
४०९ विरुद्ध ऑस्ट्रेलिया लॉर्ड्स १९४८

Comments
Add Comment

IND vs SA: वर्ल्डकपमध्ये द. आफ्रिकेने रोखला भारताचा विजयरथ, मिळवला ३ विकेटनी विजय

विशाखापट्टणम: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५मध्ये द. आफ्रिकेच्या संघाने भारतीय संघाचा विजयरथ रोखला आहे.

२३ धावा करूनही स्मृती मंधानाने रचला इतिहास, २८ वर्षे जुना रेकॉर्ड मोडला

विशाखापट्टणम: भारतीय संघाने आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५मध्ये आपला तिसरा सामना द. आफ्रिकेविरुद्ध खेळत

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतही जसप्रीत बुमराहच अव्वल

दुबई (वृत्तसंस्था): आयसीसीने बुधवारी त्यांची ताजी क्रमवारी जाहीर केली. भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि कुलदीप

महिला क्रिकेट विश्वचषक : भारतीय संघाला विजयी हॅट्ट्रिकची संधी

विशाखापट्टणम: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने

IND vs AUS : फक्त १० धावा करताच रोहित शर्मा रचणार इतिहास

पर्थ/मेलबर्न: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय (ODI)

Asia Cup 2025 : बक्षीस मिळालेली कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकत नाही, जाणून घ्या कारण !

मुंबई : आशिया कप २०२५ मध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याने चमकदार कामगिरी करत "प्लेअर ऑफ द टूर्नामेंट"चा किताब