India vs England: टीम इंडियाने ९२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा केली अशी कामगिरी

राजकोट: भारताने इंग्लंडविरुद्धच्या राजकोट कसोटीत ४३४ धावांनी विजय मिळवला. सामन्यात भारताने इंग्लंडला विजयासाठी ५५७ धावांचे आव्हान दिले होते. याचा पाठलाग करताना बेन स्टोक्सचा संघ चौथ्या दिवशी १२२ धावांवर ऑलआऊट झाला. कसोटी इतिहासात इतक्या मोठ्या धावसंख्येने जिंकण्याची ही भारताची पहिली वेळ आहे. याआधी त्यांनी डिसेंबर २०२१मध्ये न्यूझीलंडला वानखेडे कसोटी सामन्यात ३७२ धावांनी हरवले होते.


पाहिले असता भारतीय संघाने पहिल्यांदा कसोटीच्या इतिहासात ४००हून अधिक धावांनी विजय मिळवला आहे. भारतीय संघ १९३२ पासून कसोटी सामने खेळत आहे. मात्र इतका मोठा विजय याआधी कधीच मिळाला नव्हता. ९२ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर भारतीय संघाने हा विजय मिळवला.


भारताने आतापर्यंत ५७७ कसोटी सामने खेळले आहे त्यातील १७६ सामन्यात विजय मिळवला तर १७८मध्ये पराभवाचा सामना करावा लागला. तर २२२ सामने अनिर्णीत राहिले. भारताचा एक सामना बरोबरीत सुटला.



भारताचा धावांनी मोठा विजय


४३४ विरुद्ध इंग्लंड राजकोट २०२४
३७२ विरुद्ध न्यूझीलंड मुंबई २०२१
३३७ विरुद्ध दक्षिण आफ्रिका दिल्ली २०१५
३२१ विरुद्ध न्यूझीलंड इंदौर २०१६
३२० विरुद्ध ऑस्ट्रेलिया मोहाली २००८



इंग्लंडचा धावसंख्येने मोठा पराभव


५६२ विरुद्ध ऑस्ट्रेलिया द ओव्हल १९३४
४३४ विरुद्ध भारत राजकोट २०२४
४२५ विरुद्ध वेस्ट इंडिज मँचेस्टर १९७६
४०९ विरुद्ध ऑस्ट्रेलिया लॉर्ड्स १९४८

Comments
Add Comment

अर्जुन आणि सानियाला दिल्या अमित शाह यांनी खास पत्रातून शुभेच्छा

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारताचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या कुटुंबाला विशेष

FIFA 2026 : फिफा २०२६ च्या विश्वचषकातून इराण बाहेर; फिफाने ठोठावला इराणला दंड

- या भ्रष्ट राजवटीने आमच्या नेत्याची हत्या केली, आम्ही कोणत्याही परिस्थितीत विश्वचषकात सहभागी होऊ शकत

IPL 2026 : आयपीएल२०२६ पर्वाचे वेळापत्रक जाहीर; आरसीबी आणि एसआरएचमध्ये होणार सलामीची लढत

मुंबई : आयपीएल २०२६ च्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) १९

अर्जुन पुरस्काराचे मानकरी जलतरणपटू वीरधवल खाडे सरकारी नोकरीत

मुंबई : राज्याचे नाव क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर नेणारे नामवंत जलतरणपटू आणि माजी तहसीलदार वीरधवल खाडे

BCCI कडून विश्वविजेत्या टीम इंडियाला १३१ कोटींचं बक्षिस , परंतु प्रत्यक्षात एवढे पैसे मिळणार

मुंबई: टी२० विश्वचषक २०२६ मधील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघावर बीसीसीआयकडून बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला

T20 World Cup 2026 : आयसीसी 'टीम ऑफ द टूर्नामेंट'मध्ये चार भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश

आयसीसीने टी-२० साठी सर्वोत्तम संघ निवडला असून या संघात चार भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे. संजू