India vs England: टीम इंडियाने ९२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा केली अशी कामगिरी

राजकोट: भारताने इंग्लंडविरुद्धच्या राजकोट कसोटीत ४३४ धावांनी विजय मिळवला. सामन्यात भारताने इंग्लंडला विजयासाठी ५५७ धावांचे आव्हान दिले होते. याचा पाठलाग करताना बेन स्टोक्सचा संघ चौथ्या दिवशी १२२ धावांवर ऑलआऊट झाला. कसोटी इतिहासात इतक्या मोठ्या धावसंख्येने जिंकण्याची ही भारताची पहिली वेळ आहे. याआधी त्यांनी डिसेंबर २०२१मध्ये न्यूझीलंडला वानखेडे कसोटी सामन्यात ३७२ धावांनी हरवले होते.


पाहिले असता भारतीय संघाने पहिल्यांदा कसोटीच्या इतिहासात ४००हून अधिक धावांनी विजय मिळवला आहे. भारतीय संघ १९३२ पासून कसोटी सामने खेळत आहे. मात्र इतका मोठा विजय याआधी कधीच मिळाला नव्हता. ९२ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर भारतीय संघाने हा विजय मिळवला.


भारताने आतापर्यंत ५७७ कसोटी सामने खेळले आहे त्यातील १७६ सामन्यात विजय मिळवला तर १७८मध्ये पराभवाचा सामना करावा लागला. तर २२२ सामने अनिर्णीत राहिले. भारताचा एक सामना बरोबरीत सुटला.



भारताचा धावांनी मोठा विजय


४३४ विरुद्ध इंग्लंड राजकोट २०२४
३७२ विरुद्ध न्यूझीलंड मुंबई २०२१
३३७ विरुद्ध दक्षिण आफ्रिका दिल्ली २०१५
३२१ विरुद्ध न्यूझीलंड इंदौर २०१६
३२० विरुद्ध ऑस्ट्रेलिया मोहाली २००८



इंग्लंडचा धावसंख्येने मोठा पराभव


५६२ विरुद्ध ऑस्ट्रेलिया द ओव्हल १९३४
४३४ विरुद्ध भारत राजकोट २०२४
४२५ विरुद्ध वेस्ट इंडिज मँचेस्टर १९७६
४०९ विरुद्ध ऑस्ट्रेलिया लॉर्ड्स १९४८

Comments
Add Comment

यजमान केकेआर पराभूत, हैदराबादचा दणदणीत विजय

कोलकाता : सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये इडन गार्डनवर कोलकाता नाइट रायडर्सवर विजय मिळवला.

Nagpur : नागपूरमध्ये ‘U-17 राष्ट्रीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा

मुंबई : महाराष्ट्राच्या बॉक्सिंग इतिहासात महत्त्वपूर्ण ठरणारी सातवी, १७ वर्षांखालील (अंडर १७) ज्युनिअर

Ind vs ZIM : बीसीसीआयकडून भारतीय संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : भारतीय संघ यावर्षी जुलैमध्ये झिम्बाब्वेचा दौरा करणार असून, यजमान संघाविरुद्ध तीन सामन्यांची टी-२०

रिझवी, स्तब्सच्या शतकी भागिदारीच्या जोरावर दिल्लीने लखनऊला हरवले

नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर

नवी मुंबईत जागतिक दर्जाचे स्टेडियम उभारण्याचे नियोज - मंत्री आशिष शेलार

मुंबई : नवी मुंबईत जागतिक दर्जाचे आधुनिक स्टेडियम उभारण्यासाठी आवश्यक नियोजन तातडीने पूर्ण करून स्टेडियमसाठी

Mohammed Shami : "मी जेव्हा..."; निवृत्तीच्या चर्चांवर मोहम्मद शमीने सोडले मौन

मुंबई : टीम इंडियासोबत आयसीसी २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा मोहम्मद शमी अचानक गायब झाला. चॅम्पियन्स