India vs England: टीम इंडियाने ९२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा केली अशी कामगिरी

राजकोट: भारताने इंग्लंडविरुद्धच्या राजकोट कसोटीत ४३४ धावांनी विजय मिळवला. सामन्यात भारताने इंग्लंडला विजयासाठी ५५७ धावांचे आव्हान दिले होते. याचा पाठलाग करताना बेन स्टोक्सचा संघ चौथ्या दिवशी १२२ धावांवर ऑलआऊट झाला. कसोटी इतिहासात इतक्या मोठ्या धावसंख्येने जिंकण्याची ही भारताची पहिली वेळ आहे. याआधी त्यांनी डिसेंबर २०२१मध्ये न्यूझीलंडला वानखेडे कसोटी सामन्यात ३७२ धावांनी हरवले होते.


पाहिले असता भारतीय संघाने पहिल्यांदा कसोटीच्या इतिहासात ४००हून अधिक धावांनी विजय मिळवला आहे. भारतीय संघ १९३२ पासून कसोटी सामने खेळत आहे. मात्र इतका मोठा विजय याआधी कधीच मिळाला नव्हता. ९२ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर भारतीय संघाने हा विजय मिळवला.


भारताने आतापर्यंत ५७७ कसोटी सामने खेळले आहे त्यातील १७६ सामन्यात विजय मिळवला तर १७८मध्ये पराभवाचा सामना करावा लागला. तर २२२ सामने अनिर्णीत राहिले. भारताचा एक सामना बरोबरीत सुटला.



भारताचा धावांनी मोठा विजय


४३४ विरुद्ध इंग्लंड राजकोट २०२४
३७२ विरुद्ध न्यूझीलंड मुंबई २०२१
३३७ विरुद्ध दक्षिण आफ्रिका दिल्ली २०१५
३२१ विरुद्ध न्यूझीलंड इंदौर २०१६
३२० विरुद्ध ऑस्ट्रेलिया मोहाली २००८



इंग्लंडचा धावसंख्येने मोठा पराभव


५६२ विरुद्ध ऑस्ट्रेलिया द ओव्हल १९३४
४३४ विरुद्ध भारत राजकोट २०२४
४२५ विरुद्ध वेस्ट इंडिज मँचेस्टर १९७६
४०९ विरुद्ध ऑस्ट्रेलिया लॉर्ड्स १९४८

Comments
Add Comment

आश्चर्यकारक! एकदिवसीय सामन्याची तिकीटं आठ मिनिटांत फूल, विराट अन् रोहितची क्रेझ

मुंबई: भारतातील क्रिकेट विश्व सध्या चर्चेत आहे. केवळ पुरुष नाही तर भारतीय महिला संघाचेसुद्धा सर्वत्र कौतुक सुरू

नववर्षाच्या सुरुवातीला भारतीय महिला संघाने घेतले बाबा महाकाल दर्शन

२०२५ च्या अखेरीस धमाका करणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या स्टार खेळाडूंनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला बाबा

India Cricket 2026 Schedule : ठरलं! २०२६ मध्ये टीम इंडियाला श्वास घ्यायलाही वेळ नाही! वर्ल्ड कपसह रोमांचक मालिकांचा गच्च कार्यक्रम, पाहा टीम इंडियाचे संपूर्ण शेड्युल!

मुंबई : क्रिकेट विश्वासाठी २०२५ हे वर्ष ऐतिहासिक ठरले. भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले, तर विराट

आयसीसी क्रमवारीत भारतीय महिलांचा डंका

शफाली, रेणुकाची झेप; दीप्तीचा 'नंबर १' कायम नवी दिल्ली: आयसीसीच्या ताज्या महिला टी-२० क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी

विराटसाठी २८ हजार धावांचा टप्पा हाकेच्या अंतरावर

सचिन-संगकाराच्या क्लबमध्ये एन्ट्रीसाठी २५ धावांची गरज मुंबई : भारतीय क्रिकेटचा 'किंग' विराट कोहली पुन्हा एकदा

भारताचे मिशन ‘क्लीन स्वीप’ यशस्वी

हरमनप्रीतच्या ६८ धावा; मालिका ५-० ने खिशात तिरुवनंतपुरम : भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२०