चंदीगढ महापौर निवडणुकीचे समीकरण बदलले, न्यायालयाच्या सुनावणीआधीच महापौरांचा राजीनामा

चंदीगढ: चंदीगढमधील महापौर निवडणुकीत वेगळेच वळण पाहायला मिळत आहे. चंदीगढमधील महापौर निवडणुकीबाबत आरोप करत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे. दोन्ही पक्षांनी भाजपवर फसवणूक करत निवडणूक जिंकल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात सोमवारी सुनावणी होत आहे. मात्र या सुनावणीआधीच चंदीगढच्या नवनियुक्त महापौर मनोज सोनकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.


सोबतच आपचे तीन नगरसेवर नेहा मुसावट, गुरचरण काला आणि पूनम देवी यांनी पक्ष बदलल्याने चंदीगड महापौर निवडणुकीत संपूर्ण समीकरण बदलले आहे. आम आदमी पक्षाचे हे तीन नगरसेवक रविवारी भाजपमध्ये सामील झाले. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी माजी प्रदेश अध्यक्ष अरूण सूद यांच्यासोबत त्यांचे पक्षात स्वागत केले.



काय आहे समीकरण?


आपच्या तीन नगरसेवकांनी आता भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपच्या नगरसेवकांची संख्या १७ झाली आहे. त्यांच्याकडे एक खासदार मतही आहे. याशशिवाय नुकत्याच झालेल्या महापौर निवडणुकीत शिरोमणी अकाली दलाच्या एकमेव नगरसेवकानेही भाजपला समर्थन दिले होते. म्हणजेच आता भाजपकडे एकूण १९ मते झाली आहेत. संख्याबळाच्या दृष्टीने भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.


तीन नगरसेवकांनी पक्ष बदलल्याने आम आदमी पक्ष आणि काँग्रेसच्या मतांची संख्या २० वरून घटून १७ झाली आहे. यात काँग्रेसचे ७ आणि आपचे १० नगरसेवक सामील आहेत. चंदीगड नगर पालिकेत एकूण ३५ नगरसेवक आहेत. तर एका खासदाराचे मत मिळून ३६ मते टाकली डातात. यानुसार बहुमताचा आकडा १९ असतो. तर भाजपकडे आता २० मते झाली आहेत.

Comments
Add Comment

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा

मतदारयादी सुधारणा हा आयोगाचा विशेषाधिकार

केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण नवी दिल्ली : देशभरात वेळोवेळी मतदारयादी सुधारणा करणे

‘ऑपरेशन सिंदूर’वेळी काँग्रेसकडून पाकिस्तानच्या लष्कराची पाठराखण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल गुवाहाटी : काँग्रेस नेहमीच भारतविरोधी शक्तींच्या पाठीशी उभी राहते आणि

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१