Onion Export Ban Lift : अखेर सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठवली

मुदत संपण्यापूर्वीच का घेतला हा निर्णय?


नवी दिल्ली : केंद्र सरकारने (Central government) कांदा उत्पादक शेतकऱ्यांबाबत (Onion Farmers) मोठा निर्णय घेत अखेर कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली (Onion Export Ban Lift) आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Minister Amit Shah) यांच्या उपस्थितीत झालेल्या केंद्रीय मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, सरकारने जरी कांदा निर्यातीला परवानगी दिली असली तरी त्यावर मर्यादा ठेवण्यात आली आहे. ३ लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास समितीने परवानगी दिली आहे.


डिसेंबर महिन्यात कांद्याच्या किमती वेगाने वाढल्या होत्या. कांदा १०० रुपये किलो विकला जात होता. कांद्याचे कमी उत्पादन आणि भरमसाठ वाढलेल्या किंमतींमुळे केंद्र सरकारने डिसेंबर महिन्यात ८ तारखेला कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. ही निर्यात बंदी ३१ मार्च २०२४ पर्यंत होती. परंतु ही बंदी अंतिम मुदत संपण्यापूर्वीच हटवण्यात आली आहे. गुजरात आणि महाराष्ट्रातील कांद्याचा साठा पाहता सरकारने ही कांद्यावरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे.


यापूर्वी देखील केंद्र सरकार कांद्याच्या निर्यातीवरील बंदी हटवण्याची शक्यता असल्याचे सांगतले जात होते. कांदा उत्पादक भागातील कांदा आणि इतर भाज्यांचे भाव कोसळणे हे त्याचे प्रमुख कारण होते. आता केंद्रीय मंत्र्यांच्या समितीने बंदी उठवण्याचा निर्णय घेतला असून ३ लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला मान्यता दिली आहे. यासोबतच बांगलादेशमध्ये ५० हजार टन कांदा निर्यातीलाही मान्यता देण्यात आली आहे.


Comments
Add Comment

Minister Adv. Akash Fundkar : राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ  प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा

कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचे निर्देश मुंबई: राज्यातील प्रत्येक कामगाराला त्याच्या हक्काच्या आरोग्य

Minister Chandrakant Patil : विद्यापीठांत आदिवासी संशोधनाला गती; आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी वाढणार

मुंबई : राज्यातील आदिवासीबहुल क्षेत्रातील विद्यापीठांमध्ये आदिवासी अध्ययन, संशोधन आणि विद्यार्थ्यांच्या

Minister Chhagan Bhujbal : राज्यात इंधनाचा तुटवडा नाही, पण काटकसर गरजेची! - मंत्री छगन भुजबळ

मुंबई : "महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल किंवा स्वयंपाकाच्या गॅसचा कोणताही तुटवडा नाही. गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी

Chandrashekhar Bawankule : नवनीत राणांचा ‘बॉम्ब’ आणि बावनकुळेंची मिश्कील प्रतिक्रिया; म्हणाले, "नशिबात असेल तर...

अमरावती : अमरावतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नुकत्याच झालेल्या भाषणानंतर राज्याचे मंत्री आणि

Unauthorized bike taxi apps : अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश

कंपनी मालकांवर FIR दाखल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राईम विभागाला पत्र मुंबई :

Nashik Heatwave : उन्हाचा तडाखा वाढला… जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिकसाठी ‘यलो अलर्ट’

Nashik Heatwave : राज्यात एप्रिलच्या अखेरीपासून वाढू लागलेला उन्हाचा तडाखा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आणखी तीव्र