तिशीच्या नंतर रोज प्या हा खास चहा, चेहऱ्याची चमक वाढवेल आणि सुरकुत्या होतील कमी

मुंबई: प्रत्येकाला असे वाटते की आपण नेहमीच तरूण आणि सुंदर दिसावे. मात्र जसजसे वय वाढत जाते तसतसे चेहऱ्याची चमक कमी कमी होत जाते. वाढत्या वयासोबतच त्वचेची चमक आणि सुंदरता कायम राहण्यासाठी बाहेरचे ब्युटी प्रॉडक्ट्स कामाला येत नाहीत. वय वाढण्यालोबतच तुम्हाला शरीर आणि त्वचेची देखभाल करण्यासाठी आपल्या डाएटवर खास लक्ष देणे गरजेचे आहे.


जर तुम्हाला दीर्घकाळ तरूण आणि सुंदर राहायचे आहे तर ३०च्या वयानंतर आपल्या खाण्यापिण्यात सुधारणा करा.तुम्हाला पोषण देणारा आहार घेणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही दिवसाची सुरूवात ग्रीन टीने करा. ग्रीनटीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन्स, अँटीऑक्सिडंट्स आणि अनेक अशी तत्वे असतात जी त्वचेला निरोगी राखण्यात मदत करतात.


ग्रीन टी चेहऱ्याच्या त्वचेसाठी अँटी एजिंगचे काम करते. यामुळे वेळेआधी येणाऱ्या सुरकुत्या, फाईन लाईन्स या समस्या दूर होतात. यामुळे त्वचेत ओलावा कायम राखला जातो. तसेच त्वचेचा पोतही सुधारतो. यामुळे पोट हेल्दी राहते आणि मुरूमांचा त्रास होत नाही.


ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे तणाव रोखणे तसेच व वाढण्याचे संकेत कमी करण्यास मदत करतात.


यामुळे शरीराची सूज कमी होण्यास मदत होते. कारण यात आवश्यक इन्फ्लामेंट्री गुण असतात.


ग्रीन टी शरीराचे विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करते. यामुळे त्वचेची इलास्टिसिटी आणि रंग सुधारतो.

यामुळे यूव्ही किरणांपासून सुरक्षा मिळते. ग्रीन टीमुळे त्वचेवर अतिरिक्त तरंग येतो.


ग्रीन टी मुरूमे रोखण्याचे काम करते. यामुळे त्वचा साफ राखण्यास मदत होते.

Comments
Add Comment

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका