Ravichandran Ashwinने ५०० विकेट घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन

Share

मुंबई: राजकोटमध्ये भारताचा ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विनने इतिहास रचला. रवी अश्विनने कसोटी सामन्यात ५०० विकेट घेण्याची किमया साधली आहे. कसोटी फॉरमॅटमध्ये ५०० विकेट घेणारा तो दुसरा गोलंदाज बनला आहे. त्याच्या या यशाबद्दल रवीचंद्रन अश्विनला सचिन तेंडुलकरसह क्रिकेट जगतातील प्रसिद्ध व्यक्तींनी अभिनंदन केले. आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, रवी अश्विनने ५०० विकेट घेण्याचे जे काही यश मिळाले त्यासाठी अभिनंदन! रवी अश्विनचा प्रवास आणि त्याचे यश हे त्याचे कौशल्य आणि दृढतेचे प्रमाण आहे. आगामी दिवसांत तो आणखी किर्तीमान होईल. माझ्याकडून त्याला शुभेच्छा. सोशल मीडियावर मोदींचे हे ट्वीट वेगाने व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडियावर रवी अश्विन सातत्याने ट्रेंड करत आहे.

 

जॅक क्राऊलीला बाद करत अश्विनने रचला इतिहास

रवी अश्विनने इंग्लंडचा सलामीवीर जॅक क्राऊलीला बाद करत कसोटी सामन्यांमध्ये ५०० विकेटचा आकडा मिळवला. रवी अश्विनच्या आधी माजी क्रिकेटर अनिल कुंबळेने कसोटी सामन्यात ५०० विकेट घेण्याची किमया साधली होती. रवी अश्विन कसोटी सामन्यांमध्ये ५०० विकेट घेणारा जगातील ९वा गोलंदाज आहे. आतापर्यंत अश्विनने ९८ कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले. यात त्याने ५०० बळी मिळवले.

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

2 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

2 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

3 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

4 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

5 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

5 hours ago