Ravichandran Ashwinने ५०० विकेट घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन

मुंबई: राजकोटमध्ये भारताचा ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विनने इतिहास रचला. रवी अश्विनने कसोटी सामन्यात ५०० विकेट घेण्याची किमया साधली आहे. कसोटी फॉरमॅटमध्ये ५०० विकेट घेणारा तो दुसरा गोलंदाज बनला आहे. त्याच्या या यशाबद्दल रवीचंद्रन अश्विनला सचिन तेंडुलकरसह क्रिकेट जगतातील प्रसिद्ध व्यक्तींनी अभिनंदन केले. आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.


भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, रवी अश्विनने ५०० विकेट घेण्याचे जे काही यश मिळाले त्यासाठी अभिनंदन! रवी अश्विनचा प्रवास आणि त्याचे यश हे त्याचे कौशल्य आणि दृढतेचे प्रमाण आहे. आगामी दिवसांत तो आणखी किर्तीमान होईल. माझ्याकडून त्याला शुभेच्छा. सोशल मीडियावर मोदींचे हे ट्वीट वेगाने व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडियावर रवी अश्विन सातत्याने ट्रेंड करत आहे.


 


जॅक क्राऊलीला बाद करत अश्विनने रचला इतिहास


रवी अश्विनने इंग्लंडचा सलामीवीर जॅक क्राऊलीला बाद करत कसोटी सामन्यांमध्ये ५०० विकेटचा आकडा मिळवला. रवी अश्विनच्या आधी माजी क्रिकेटर अनिल कुंबळेने कसोटी सामन्यात ५०० विकेट घेण्याची किमया साधली होती. रवी अश्विन कसोटी सामन्यांमध्ये ५०० विकेट घेणारा जगातील ९वा गोलंदाज आहे. आतापर्यंत अश्विनने ९८ कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले. यात त्याने ५०० बळी मिळवले.

Comments
Add Comment

वर्ल्ड कप फायनलसाठी अभिषेक ‘आऊट’, रिंकू सिंग ‘इन’?

मुंबई (प्रतिनिधी) : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी अभिषेक शर्माने केलेली हवा फुसकी निघाली. वर्ल्ड कप स्पर्धेच्या ७

टी-२० वर्ल्डकप कुणीही जिंकला तरी शेवटी इतिहासच घडणार!

मुंबई (प्रतिनिधी) : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. या

भारत-न्यूझीलंड महामुकाबल्यासाठी ऑनलाइन बुकींगला गर्दी

मुंबई (प्रतिनिधी) : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करत

All England Open : लक्ष्य सेनची दमदार आगेकूच, उपांत्यपूर्व फेरीत धडक

ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय शटलर लक्ष्य सेनची शानदार कामगिरी सुरूच आहे. पहिल्या फेरीत माजी जागतिक

रविवारी मोदी स्टेडियमवर भारत - न्यूझीलंड फायनल रंगणार, सेमी फायनलमध्ये भारताचा विजय

मुंबई : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चौकार-षटकारांचा पाऊस पडला. भारताच्या २५३ धावांना इंग्लंडकडूनही सडेतोड

संजू सॅमसनचे शतक हुकले, भारताने दिली १९ षटकार, १८ चौकारांची मेजवानी

मुंबई : मोठ्या आणि महत्त्वाच्या सामन्यात कसे खेळावे, हे संजू सॅमसनने पुन्हा एकदा दाखवून दिले. ट्वेंटी-२० वर्ल्ड