जडेजाने सरफराजची मागितली माफी, रनआऊटसाठी चूकही केली मान्य

मुंबई: भारत(india vs england) आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये गुरूवारपासून खेळवला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी खेळ संपेपर्यंत भारताने ५ विकेट गमावत ३२६ धावा केल्या. या दरम्यान २ शतके आणि एक अर्धशतक ठोकले गेले.

कर्णधार रोहित शर्माने १३१ धावांची शतकी खेळी केली तर रवींद्र जडेजा १०० धावांवर नाबाद आहे. जडेजा आता दुसऱ्या दिवशीही मैदानात उतरणार. तर सरफराज खानने आपल्या पदार्पणाच्या कसोटीत ६६ चेंडूत ६२ धावांची खेळी केली. यात त्याने १ षटकार आणि ९ चौकार लगावले.

मात्र सर्फराजला शतक ठोकता आले नाही आणि तो रनआऊट झाला. जडेजा ९९ धावांवर खेळत होता. त्याने शॉट लगावत एका धावेसाठी हाक दिली. मात्र फिल्डरच्या हातात बॉल जाताना पाहून त्याने धाव घेण्यास नकार दिला. तोपर्यंत सर्फराज खूप पुढे आला होता आणि तो रनआऊट झाला.



यासाठी आता जडेजाने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत सर्फराजची माफीही मागितली. जड्डू म्हणाला ही त्याचीच चूक होती. जडेजाने माफी मागताना लिहिले, सर्फराजसाठी खूप वाईट वाटत आहे.तो माझा चुकीचा कॉल होता. सर्फराज खूप चांगला खेळला.

सर्फराज रनआऊट झाल्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये रोहितही भडकला होता. त्याने आपल्या टोपी काढून जमिनीवर आपटली.
Comments
Add Comment

INDvsSL : गॉल कसोटी, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला; जाणून घ्या भारताने किती केल्या धावा ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे सुरू आहे. या सामन्यातील

WTC : बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवलं; WTC गुणतालिकेत मोठा बदल

डार्विन : बांगलादेशने रविवारी डार्विनच्या मरारा स्टेडियममध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. यजमान

Ind vs SL Test Match : पावसाचा खेळ सुरूच; गॉल कसोटीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल क्रिकेट

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला