Prathmesh Parab Engagement: 'व्हॅलेंटाईन डे'चा मुहूर्त साधत दगडूने उरकला साखरपुडा

  176

१४ फेब्रुवारी प्रथमेश-क्षितिजासाठी खास


मुंबई : मराठी कलाविश्वात (Marathi Industry) सध्या लगीनसराई सुरु आहे. अनेक तरुण कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. त्यातच सर्वांचा लाडका दगडू म्हणजेच प्रथमेश परब (Prathmesh Parab) यानेही काही दिवसांपूर्वीच लग्न करत असल्याची घोषणा केली. आपल्या केळवणाचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते आणि चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. त्याच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले.


यानंतर आता त्याच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल होत आहेत. 'व्हॅलेंटाईन डे'चा (Valentine Day) मुहूर्त साधत प्रथमेशने क्षितिजा घोसाळकरसोबत (Kshitija Ghosalkar) साखरपुडा उरकला आहे. दोघांचा साखरपुडा काल थाटामाटात पार पडला असून या सोहळ्यातील काही खास फोटो प्रथमेशने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. “आमचा व्हॅलेंटाईन डे असा साजरा झाला…इथून पुढे आयुष्यभराची साथ राहील” असं कॅप्शन प्रथमेशने या फोटोंना दिलं आहे. यामध्ये प्रथमेशने पांढऱ्या रंगाची शेरवानी, तर क्षितिजाने जांभळ्या रंगाची सुंदर अशी पैठणी साडी नेसली आहे. चाहत्यांकडून या जोडप्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





१४ फेब्रुवारी प्रथमेश-क्षितिजासाठी खास


प्रथमेश-क्षितिजाची पहिली ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती. पुढे हळुहळू त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. प्रथमेशने पहिल्यांदा १४ फेब्रुवारी २०२० रोजी व्हेलेंटाईन डेची फोटोशूट सीरिज पाहून क्षितिजाला मेसेज केला होता. पुढे, बरोबर एक वर्षाने म्हणजेच १४ फेब्रुवारी २०२१ रोजी त्यांनी रिलेशनशिपला सुरुवात केली. त्यानंतर १४ फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रथमेश-क्षितिजाने सोशल मीडियावर प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांच्या रिलेशनशिपला ३ वर्षे पूर्ण होणार असल्याने या खास दिवशी साखरपुडा करण्याचा निर्णय प्रथमेशने जानेवारी महिन्यात घेतला होता.


प्रथमेश आणि क्षितिजाच्या लग्नाची तारीखदेखील जाहीर झाली आहे. पुढच्या दहा दिवसांनी म्हणजे २४ फेब्रुवारीला ते लग्नबंधनात अडकणार आहेत.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.