भुवनेश्वर : ओडिशामधून (Odisha) एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. एक महिला आगीत भाजल्याने तिचा श्वासोच्छवास काही काळासाठी बंद पडला होता. ती मृत झाल्याचे समजून तिच्या नातेवाईकांनी तिला स्मशानभूमीत नेले. मात्र, चिता (pyre) जाळणार इतक्यात त्या महिलेने डोळे उघडले आणि उपस्थित सर्वजण आश्चर्यचकित झाले. गंजममधील बेरहामपूरमध्ये घडलेल्या या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
गुड्स शेड रोड परिसरात राहणाऱ्या महिलेच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या घराला १ फेब्रुवारीला आग लागली. त्यात महिला ५० टक्के भाजली. तिला तातडीने एमकेजीसी वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथल्या डॉक्टरांनी महिलेला दुसऱ्या रुग्णालयात रेफर केलं. पण उपचारांसाठी पुरेसे पैसे नसल्यानं महिलेचा पती तिला घरी घेऊन आला.
महिलेला घरी आणण्यात आलं तेव्हा तिची मृत्यूशी झुंज सुरू होती. सोमवारी तिने डोळे उघडले नाहीत. महिला श्वास घेत नसल्याचं नातेवाईकांच्या लक्षात आलं. त्यामुळे तिचा मृत्यू झाला असावा असा कुटुंबाचा समज झाला. कुटुंबियांनी शेजाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर डॉक्टरांचा सल्ला न घेता, मृत्यू प्रमाणपत्र न घेता कुटुंबियांनी महिलेचा मृतदेह बिजीपूर स्मशानभूमीत नेला.
अंत्यविधींची तयारी सुरू करण्यात आली. चिता रचण्यात आली. त्यावर पार्थिव ठेवण्यात आलं. तितक्यात महिलेनं अचानक डोळे उघडले. त्यामुळे सगळेच चकित झाले. उपस्थितांनी महिलेला साद घातली. तिने प्रतिसाद दिला. त्यामुळे तिथे हजर असलेल्या सगळ्यांना चमत्कार पाहायला मिळाला. घटनेची माहिती स्थानिक नगरसेवकाला देण्यात आली. महिलेला शववाहिकेतून स्मशानभूमीत आणण्यात आलं होतं. त्याच वाहनातून तिला पुन्हा घरी नेण्यात आलं. यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशियाची राजधानी मॉस्को येथे पोहोचले आहेत. राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन…
मुसळधार पावसाचा पालघरमध्ये पहिला बळी पालघर : मुंबई, ठाण्यासह उपनगरीय भागात काल रात्रभर जोरदार पाऊस…
मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील पोयसर नदीवर बसवण्यात आलेल्या सक्शन पंपाचे पाईप फुटल्याने आज कांदिवलीत मोठ्या…
मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करा : एकनाथ शिंदे अजित पवार यांनीही…
हार्बर रेल्वे तसेच मेल एक्स्प्रेस रद्द झाल्याने अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी बससेवा मुंबई : मुंबईत काल…
मुसळधार पावसामुळे घडली दुर्दैवी घटना मुंबई : मुंबईसह ठाणे आणि उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊन…