Healthy Tips: तुम्ही रात्री उशिरा जेवण करता का? तर वेळीच व्हा सावध

  84

मुंबई: आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत रात्री उशिरापर्यंत जागणे आणि उशिरा जेवणे ही सामान्य गोष्ट झाली आहे. मात्र तुम्हाला ही सवय अनेक आजारांची शिकार बनवू शकते.


रात्री उशिरा जेवणाची सवय तुम्हाला अनेक आजार देऊ शकते. आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत.



लठ्ठपणा


रात्रीच्या वेळेस आपले शरीर कमी कार्यरत असते. यावेळेस जेवलेले जेवण फार हळूहळू पचते. यामुळे कॅलरीज अधिक जमा होऊ लागतात. रात्री उशिरा जेवण केल्याने शरीरात फॅटचा स्तर वाढू शकतो यामुळे वजन वाढले आणि लठ्ठपणाचा धोका वाढतो.



टाईप २ डायबिटीज


शरीरासाठी रात्रीची वेळ आरामाची असते. यावेळेस शरीराची चयापचय क्रिया धीमी होते. रात्री उशिरा जेवण केल्याने इन्सुलिनचे स्त्राव व्यवस्थित होते नाही आणि यामुळे ब्लड शुगर लेव्हल असंतुलित होते.



हृदयरोग


रात्री उशिरा जेवण केल्याने शरीरात चरबीचा स्तर वाढतो. यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो. यावेळेस जेवण पचण्याची क्षमता कमी होते. यामुळे चरबी वाढते.



अॅसिडिटी आणि जळजळ


रात्री उशिरा जेवल्याने पोटात अॅसिडचा स्तर वाढतो. यामुळे अॅसिडिटी आणि छातीत जळजळ होऊ शकते.

Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी