EDकडून केजरीवाल यांना ६व्यांदा समन्स, १९ फेब्रुवारीला चौकशीस हजर राहण्याचे आदेश

नवी दिल्ली: अंमलबजावणी संचलनालयाने(ED) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(arvind kejriwal) यांना सहाव्यांदा समन्स जारी करताना १९ फेब्रुवारीला चौकशीसाठी सादर होण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीस्थित ईडीच्या प्रमुख कार्यालयात सादर होण्यास सांगितले आहे. याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री यांना आतापर्यंत पाच वेळा समन्स बजावण्यात आले आहेत. मात्र एकदाही ते तपासात सामील झालेले नाहीत.


याआधी २ फेब्रुवारीला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ईडीसमोर पाचव्या समन्सनंतरही चौकशीसाठी सामोरे गेलेले नाहीत. यानंतर ईडीने समन्स न पाळल्याबद्दल त्यांच्याविरोधात आणखी एक केस दाखल केली आहेत.


आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी ईडीचे हे समन्स अवैध आणि राजकीय प्रेरणेने असल्याचे सांगितले होते. ईडीचा उद्देश केवळ निवडणुकीचा प्रचार कऱण्यापासून रोखणे हा होता असा आरोप केला आहे.


दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना ईडीने पहिल्यांदा २ नोव्हेंबर २०२३ला समन्स जारी केले होते. मात्र राजकीय हेतूने असल्याचे सांगत त्यानी दुर्लक्ष केले होते. ईडीसमोर सादर होण्याऐवजी मध्य प्रदेशात सिंगरौलीमध्ये सभा घेतली होती. यानंतर ईडीने नोटीस जारी करत २१ डिसेंबर २०२३ला चौकशीसाठी बोलावले होते. त्यावेळेस पंजाबच्या होशियापूरमध्ये ते एखाद्या कार्यक्रमात होते त्यावेळीही ते सादर होऊ शकले नाहीत.


त्यानंतर ३ जानेवारी, १७ जानेवारी आणि ३१ जानेवारीला ईडीने त्यांना समन्स बजावले होते. मात्र ते सादर झाले नाहीत.


 
Comments
Add Comment

पश्चिम आशियात तणाव वाढला; पंतप्रधान मोदींनी केली आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा

- ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ल्यांचा भारताकडून तीव्र निषेध पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर

गोव्याचे मुख्यमंत्री लेकीला भेटायला पुण्यात आले अन् रुग्णालयात अॅडमिट झाले, नेमकं झालं काय?

पुणे: गुढी पाडव्यानिमित्ताने आपल्या मुलीला भेटण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पुण्यात आले होते.

Stormy weather : वादळी हवामानाचा अनेक उड्डाणांवर परिणाम; एअरलाइनकडून प्रवाशांसाठी ट्रॅव्हल ऍडव्हायझरी जारी

नवी दिल्ली : देशातील दोन प्रमुख शहरे दिल्ली आणि बंगळुरू येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा

Iran-US-Israel War : इराण - कतार तणावाचा थेट भारताला फटका; वीज उत्पादन धोक्यात

मध्य पूर्वात भडकलेल्या युद्धाची झळ आता भारताच्या स्वयंपाकघरांपासून ते कारखान्यांपर्यंत पोहोचली आहे. इराणने

गुप्तचर विभाग RAW चे माजी प्रमुख काय म्हणाले; युद्धात आपण इराणची साथ...

नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट गडद होत चाललं आहे. इराण,

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू