EDकडून केजरीवाल यांना ६व्यांदा समन्स, १९ फेब्रुवारीला चौकशीस हजर राहण्याचे आदेश

नवी दिल्ली: अंमलबजावणी संचलनालयाने(ED) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(arvind kejriwal) यांना सहाव्यांदा समन्स जारी करताना १९ फेब्रुवारीला चौकशीसाठी सादर होण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीस्थित ईडीच्या प्रमुख कार्यालयात सादर होण्यास सांगितले आहे. याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री यांना आतापर्यंत पाच वेळा समन्स बजावण्यात आले आहेत. मात्र एकदाही ते तपासात सामील झालेले नाहीत.


याआधी २ फेब्रुवारीला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ईडीसमोर पाचव्या समन्सनंतरही चौकशीसाठी सामोरे गेलेले नाहीत. यानंतर ईडीने समन्स न पाळल्याबद्दल त्यांच्याविरोधात आणखी एक केस दाखल केली आहेत.


आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी ईडीचे हे समन्स अवैध आणि राजकीय प्रेरणेने असल्याचे सांगितले होते. ईडीचा उद्देश केवळ निवडणुकीचा प्रचार कऱण्यापासून रोखणे हा होता असा आरोप केला आहे.


दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना ईडीने पहिल्यांदा २ नोव्हेंबर २०२३ला समन्स जारी केले होते. मात्र राजकीय हेतूने असल्याचे सांगत त्यानी दुर्लक्ष केले होते. ईडीसमोर सादर होण्याऐवजी मध्य प्रदेशात सिंगरौलीमध्ये सभा घेतली होती. यानंतर ईडीने नोटीस जारी करत २१ डिसेंबर २०२३ला चौकशीसाठी बोलावले होते. त्यावेळेस पंजाबच्या होशियापूरमध्ये ते एखाद्या कार्यक्रमात होते त्यावेळीही ते सादर होऊ शकले नाहीत.


त्यानंतर ३ जानेवारी, १७ जानेवारी आणि ३१ जानेवारीला ईडीने त्यांना समन्स बजावले होते. मात्र ते सादर झाले नाहीत.


 
Comments
Add Comment

सरन्यायाधीशांवरील हल्ल्याने प्रत्येक भारतीय नाराज, पंतप्रधानांनी केले ट्वीट

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावरील हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही नाराजी

आयएनएस 'अँड्रॉथ' भारतीय नौदलात दाखल, किनारी भागात शत्रूंचा सामना करण्यास सक्षम

भारतीय नौदल किनारी भागात शत्रूंचा सामना करण्यास सक्षम असेल नवी दिल्ली : भारतीय नौदलाने सोमवारी विशाखापट्टणम

माउंट एव्हरेस्टला हिमवादळाचा तडाखा; १००० गिर्यारोहक अडकले, बचावकार्य सुरू

नेपाळ : जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टला हिमवादळाचा तडाखा बसला आहे. तिबेटमधील माउंट

Bihar Election 2025 : बुरखा परिधान केलेल्या महिलांना मतदान करता येणार का ?

बिहार : बिहारमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन मतदानाच्या तारखा

केरळच्या सुप्रसिद्ध मंदिरात सोन्याची चोरी, SIT चौकशीचा न्यायालयाचा आदेश

तिरुवनंतपुरम : सबरीमाला मंदिर पर्यटनाच्या दृष्टीने केरळसाठी फार महत्त्वाचे आहे. सोन्याचा गाभारा आणि इतर

ट्रॅफिक का थांबले? पहा आणि कमेंट करुन सांगा... ब्रिजवरून ट्रेन गेली, आणि खालील रस्त्यावरचा 'तो' क्षण; व्हिडिओ व्हायरल

मुंबई: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, जे कधी आश्चर्यचकित करतात, तर कधी हसून पोट दुखवतात. असाच