EDकडून केजरीवाल यांना ६व्यांदा समन्स, १९ फेब्रुवारीला चौकशीस हजर राहण्याचे आदेश

नवी दिल्ली: अंमलबजावणी संचलनालयाने(ED) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(arvind kejriwal) यांना सहाव्यांदा समन्स जारी करताना १९ फेब्रुवारीला चौकशीसाठी सादर होण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीस्थित ईडीच्या प्रमुख कार्यालयात सादर होण्यास सांगितले आहे. याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री यांना आतापर्यंत पाच वेळा समन्स बजावण्यात आले आहेत. मात्र एकदाही ते तपासात सामील झालेले नाहीत.


याआधी २ फेब्रुवारीला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ईडीसमोर पाचव्या समन्सनंतरही चौकशीसाठी सामोरे गेलेले नाहीत. यानंतर ईडीने समन्स न पाळल्याबद्दल त्यांच्याविरोधात आणखी एक केस दाखल केली आहेत.


आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी ईडीचे हे समन्स अवैध आणि राजकीय प्रेरणेने असल्याचे सांगितले होते. ईडीचा उद्देश केवळ निवडणुकीचा प्रचार कऱण्यापासून रोखणे हा होता असा आरोप केला आहे.


दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना ईडीने पहिल्यांदा २ नोव्हेंबर २०२३ला समन्स जारी केले होते. मात्र राजकीय हेतूने असल्याचे सांगत त्यानी दुर्लक्ष केले होते. ईडीसमोर सादर होण्याऐवजी मध्य प्रदेशात सिंगरौलीमध्ये सभा घेतली होती. यानंतर ईडीने नोटीस जारी करत २१ डिसेंबर २०२३ला चौकशीसाठी बोलावले होते. त्यावेळेस पंजाबच्या होशियापूरमध्ये ते एखाद्या कार्यक्रमात होते त्यावेळीही ते सादर होऊ शकले नाहीत.


त्यानंतर ३ जानेवारी, १७ जानेवारी आणि ३१ जानेवारीला ईडीने त्यांना समन्स बजावले होते. मात्र ते सादर झाले नाहीत.


 
Comments
Add Comment

रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात बदल; आधार लिंक अनिवार्य

सणासुदीच्या काळात दलालांच्या गैरप्रकारांना आळा नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची कन्फर्म तिकिटे मिळवणे म्हणजे जणू

गिग वर्करचा बुधवारी देशव्यापी संप

ऑनलाइन डिलिव्हरी सेवांवर परिणाम होण्याची शक्यता नवी दिल्ली : नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी केलेल्या

नीट-जेईईत फसवणुकीला आळा बसणार

२०२६ पासून ‘चेहरेपट्टीची ओळख’ बंधनकारक नवी दिल्ली : देशातील सर्वाधिक महत्त्वाच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश

२० जानेवारीपासून नितीन नवीन भाजपचे अध्यक्ष

नवी दिल्ली : नितीन नवीन यांना भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याची घोषणा २० जानेवारी रोजी

लाल किल्ला स्फोट प्रकरणी एनआयएच्या तपासातून हाती आली धक्कादायक माहिती, २०२३ पासूनचा दहशतवाद्यांचा कट उघड

नवी दिल्ली : दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्याबाहेर झालेल्या कार स्फोटाच्या तपासात महत्वाची माहिती समोर आली

प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुले हवीतच; चंद्राबाबू नायडूंचं विधान चर्चेत

तिरुपती : तिरुपती येथे झालेल्या एका कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी