EDकडून केजरीवाल यांना ६व्यांदा समन्स, १९ फेब्रुवारीला चौकशीस हजर राहण्याचे आदेश

  77

नवी दिल्ली: अंमलबजावणी संचलनालयाने(ED) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(arvind kejriwal) यांना सहाव्यांदा समन्स जारी करताना १९ फेब्रुवारीला चौकशीसाठी सादर होण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीस्थित ईडीच्या प्रमुख कार्यालयात सादर होण्यास सांगितले आहे. याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री यांना आतापर्यंत पाच वेळा समन्स बजावण्यात आले आहेत. मात्र एकदाही ते तपासात सामील झालेले नाहीत.


याआधी २ फेब्रुवारीला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ईडीसमोर पाचव्या समन्सनंतरही चौकशीसाठी सामोरे गेलेले नाहीत. यानंतर ईडीने समन्स न पाळल्याबद्दल त्यांच्याविरोधात आणखी एक केस दाखल केली आहेत.


आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी ईडीचे हे समन्स अवैध आणि राजकीय प्रेरणेने असल्याचे सांगितले होते. ईडीचा उद्देश केवळ निवडणुकीचा प्रचार कऱण्यापासून रोखणे हा होता असा आरोप केला आहे.


दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना ईडीने पहिल्यांदा २ नोव्हेंबर २०२३ला समन्स जारी केले होते. मात्र राजकीय हेतूने असल्याचे सांगत त्यानी दुर्लक्ष केले होते. ईडीसमोर सादर होण्याऐवजी मध्य प्रदेशात सिंगरौलीमध्ये सभा घेतली होती. यानंतर ईडीने नोटीस जारी करत २१ डिसेंबर २०२३ला चौकशीसाठी बोलावले होते. त्यावेळेस पंजाबच्या होशियापूरमध्ये ते एखाद्या कार्यक्रमात होते त्यावेळीही ते सादर होऊ शकले नाहीत.


त्यानंतर ३ जानेवारी, १७ जानेवारी आणि ३१ जानेवारीला ईडीने त्यांना समन्स बजावले होते. मात्र ते सादर झाले नाहीत.


 
Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )