Almonds: रोज खाल मूठभर भिजवलेले बदाम तर राहाल Fit and Fine

  55

मुंबई: सुक्या मेव्यांबद्दल जेव्हा बोलले जाते तेव्हा बदामाला(almonds) सर्वाधिक पसंती मिळते. नट्समध्ये बदामला सर्वाधिक हेल्दी म्हटले जाते. खासकरून बदाम जर रात्रभर भिजत ठेवून सकाळी खाल्ल्यास त्याचे आरोग्यस अधिक फायदे होतात.

पोषकतत्वांनी भरपूर असलेल्या बदामाचे सेवन दररोज केल्यास केवळ हृदयच नव्हे तर मेंदूचे आरोग्यही सुधारते. जाणून घेऊया भिजवलेल्या बदामाचे फायदे

बदामामध्ये हाय सॅच्युरेटेड फॅट्स भरपूर असतात याच कारणामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवत हृदयाचे आरोग्य चांगले राखते. बदामामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन आणि कॅल्शियसोबतच फायबर आणि मॅग्नेशियम असते. याशिवाय बदामामध्ये व्हिटामिन ई, ओमेगा ३ फॅटी अॅसिड, व्हिटामिन बी, नियासिन, रायबोफ्लेविन इत्यादी घटक आढळतात.

जर बदाम रात्रभर भिजवून सकाळी सोलून खाल्ल्यास याचे पोषणतत्व दुपटीने वाढते. यामुळे आरोग्यास डबल फायदे मिळतात.

भिजवलेले बदाम हृदय निरोगी राखण्याचे काम करतात. यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते तसेच भिजवलेले बदाम चांगले पचतात. यामुळे पोट साफ होते आणि मेटाबॉलिज्म बूस्ट होण्यास मदत मिळते. याच्या सेवनाने पोटाच्या समस्या जसे गॅस, अपचन, ब्लोटिंगच्या समस्या तसेच पोटदुखीपासून सुटका मिळते.
Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी