PM Modi: प्रत्येक श्वास म्हणतोय भारत-यूएई मैत्री जिंदाबाद- पंतप्रधान मोदी

अबूधाबी: पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm narendra modi) यांनी मंगळवारी संयुक्त अरब अमिरातमध्ये भारतीय वंशाच्या लोकांना संबोधित करताना म्हटले की भारताला त्यांच्यावर गर्व आहे. ही वेळ दोन्ही देशांदरम्यानच्या मित्रतेचा जयकार आहे. अबूधाबीच्या जायद स्पोर्ट्स स्टेडियममध्ये मोदी मोदी असा नारा सुरू असताना पंतप्रधान मोदींनी अहलन मोदी कार्यक्रमात सामील झालेल्या भारतीय वंशाच्या लोकांना अभिवादन करत नमस्कार म्हटले.


भारतीय समुदायाच्या या कार्यक्रमाने ते मंत्रमुग्ध झाले. पंतप्रधान मोदी म्हणाले, तुम्ही येथे इतक्या मोठ्या संख्येने येत इतिहास रचला. तुम्ही यूएईच्या विविध भागातून आणि भारताच्या विविध राज्यांतून जरी आले असलात तरी सर्वांची मने जोडलेली आहेत.


ही वेळ भारत आणि यूएईच्या मित्रतेच्या जयजयाकाराची आहे. या ऐतिहासिक स्टेडियममध्ये प्रत्येकाच्या मनात एकच भावना आहे भारत-यूएईची मित्रता जिंदाबाद.आजच्या या आठवणी माझ्यासोबत नेहमी राहतील कारण येथे मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना भेटण्यासाठी आलो आहे. मी १४० कोटीहून अधिक भारतीयांकडून, तुमच्या बहीण-भावांकडून हा संदेश घेऊन आलो आहे की भारताला तुमच्यावर गर्व आहे.


यावेळी पंतप्रधान मोदींनी २०१५मधील आपल्या पहिल्या यूएई दौऱ्याच्या आठवणी ताज्या केल्या. ते म्हणाले, तेव्हा आम्ही केंद्र सरकारमध्ये नवे होते. तीन दशकांमधील एखाद्या भारतीय पंतप्रधानांचा हा पहिला दौरा होता. तेव्हा पासून गेल्या दहा वर्षात यूएईचा माझा सातवा दौरा आहे.



काय म्हणाले पंतप्रधान मोदी


पंतप्रधान मोदी म्हणाले भारताला २०४७ पर्यंत विकसित भारत बनवणार ही माझी गॅरंटी आहे. ते म्हणाले लवकरच यूएईमध्ये यूपीआय सुरू होणार आहे. आज २१व्या शतकाच्या तिसऱ्या दशकात भारत आणि यूएईचे हे नाते अभूतपूर्व उंचीवर पोहोचले आहे. आम्ही एकमेकांच्या प्रगतीमध्ये साथीदार आहोत. आज यूएई भारताचा तिसरा मोठा ट्रेड पार्टनर आहे.

Comments
Add Comment

जयपूर SMS हॉस्पिटलच्या ICU मध्ये भीषण आग, ६ रुग्णांचा मृत्यू

जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूर येथील सवाई मानसिंह (SMS) हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरच्या न्यूरो आयसीयू (ICU)

दार्जिलिंगमध्ये भूस्खलनाने हाहाकार; २३ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उत्तर बंगालच्या दौऱ्यावर

दार्जिलिंग: पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेशात मुसळधार पावसामुळे झालेल्या भीषण

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन