अटल सेतूवरून धावणार एनएमएमटीची बस

Share

प्रवाशांसाठी नेरूळ ते मंत्रालयदरम्यान होणार बससेवा उपलब्ध

मुंबई : अटल सेतूवरून प्रवास करणे हे सर्वसामान्यांचे स्वप्न आहे. अटल सेतूवरुन प्रवास करण्यासाठी स्वमालकीच्या वाहनातून प्रवास करा अथवा खासगी वाहनातून प्रवास करा, त्याकरता टोल भरण्यासाठी स्वत:च्या खिशाला झळ सोसावी लागणार आहे. परंतु आता सर्वसामान्यांना अटल सेतूवरून दररोज प्रवास करणे शक्य होणार आहे. तेही अवघ्या ९० रुपयांमध्ये. नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाची बससेवा ही नेरूळ ते मंत्रालय सुरु होत आहे. ही बससेवा अटल सेतूवरुन चालविण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच अटल सेतूवरुन प्रवास करण्याचे सर्वसामान्यांचे स्वप्न साकार होणार आहे.

एनएमएमटी उपक्रमाने नेरूळ ते मंत्रालय व्हाया अटल पुल अशा प्रकारे सार्वजनिक वाहतुकीतून मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर प्रवास करता येणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाकडून याबाबत घोषणा करण्यात आली आहे. १२ जानेवारी २०२४ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील सर्वात लांब सागरी सेतू मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर या पुल प्रवाशांसाठी खुला करण्यात आला.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर फक्त खासगी वाहनांनाच प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. मात्र, लवकरच नवी मुंबई महापालिका परिवहन विभागाकडून बससेवेचा प्रारंभ होणार आहे. अटल सेतूवर बसेस किंवा बेस्ट वाहतुक सुरू व्हावी याची गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतीक्षा आहे. एनएमएमटी अटल सेतुवर धावणार हे वृत्त येताच नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या सेवेसाठी बस क्रमांक ११५ प्रवाशांना खारकोपर बेल्ट आणि उल्वे या मार्गावरुन नेरुळ ते मंत्रालयापर्यंत असेल. त्यामुळे सर्वसामान्य नवी मुंबईकरांना देशातील सर्वात मोठ्या सागरी पुलावरून प्रवास करणे शक्य होणार आहे.

५२ किमीच्या प्रवासासाठी ९० रुपये होणार खर्च

एनएमएमटीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बस क्रमांक ११५ वातानुकूलित असून खारकोपर ते मंत्रालयपर्यंत आहे. मात्र, प्रवाशांच्या मागणीनुसार ही बससेवा आता नेरुळहून सुरू होईल आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमार्गे मुंबईत पोहोचेल. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नगर प्रशासनाने नेरूळ ते मंत्रालय या ५२ किमीच्या प्रवासासाठी सध्याचे भाडे ९० ठेवण्यात आले आहे. सध्या या मार्गावरून सकाळी २ आणि सायंकाळी २ अशा चार वातानुकूलित इलेक्ट्रिक बस फेऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Recent Posts

कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चार मराठी चित्रपट प्रदर्शित होणार

मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…

32 minutes ago

Summer Food Alert : उन्हाळ्यात शरीराची उष्णता वाढवणारे ‘हे’ पदार्थ टाळा

मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…

41 minutes ago

Health Tips: कडक उन्हामुळे चक्कर येत असेल तर हे पेय प्या!

तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…

49 minutes ago

प्रसिद्ध डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी महिलेला पोलीस कोठडी

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…

1 hour ago

Central Railway News : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; बदलापुरातील फलाट क्रमांक १ कायमस्वरूपी बंद!

बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…

2 hours ago

संग्राम थोपटे २२ एप्रिल रोजी भाजपात प्रवेश करणार, काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी

पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…

2 hours ago