जळगांव : रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे दोन गटात झालेल्या दगडफेकीत दोन जण जखमी झाले आहेत. गावामध्ये तणावपूर्ण वातावरण असून घटनास्थळी पोलीस पोहचले आहेत. परिस्थिती नियंत्रणात असुन तहसीलदार बंडू कापसे यांनी शांतता ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे दोन समाजामध्ये वाद निर्माण झाला. या वादातून दगडफेक झाली. या दगडफेकीत दोन जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच भुसावळ यावल रावेर या ठिकाणावरून पोलीस कुमक तातडीने ऐनपुर गावी मागवण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेडी यांनी निंभोरा पोलीस स्टेशनला भेट दिली व तेथील परिस्थिती संपूर्ण माहिती घेतली. गावागावात आणि दोन समाजामध्ये वाद निर्माण झाल्या त्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.
तहसीलदार बंडू कापसे, नायब तहसीलदार संजय तायडे व इतर महसूल अधिकारी त्या ठिकाणी पोहचले आणि तहसीलदारांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…
पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…