Poems and riddles : लखलखते उत्तर

कविता : एकनाथ आव्हाड


उठा मुला थांबून तुला
नाही चालणार
हातपाय गाळून
यश कसे रे मिळणार?

ठेचाळून पडला जरी
जो येतो वाटेवर
त्याच्यासाठी नव्या वाटा
होतात हजर...!

ध्यानात ठेव संकटात
नाही रडून चालत
धाडसाच्या मागे
यश येत असे धावत

या जगी नाही बरं
काहीच अशक्य
वाळवटी नंदनवन
फुलवणेसुद्धा शक्य

माणसाने आकाश
बघ घेतले कवेत
सागराचा तळही कसा
गाठला दमात

केल्याने होत आहे
याचे राहू दे रे भान
यश हे चिकाटीला
चिकटलेले जाण

श्रमाची बांधून पूजा
कर प्रयत्न सत्वर
निराशेच्या काळोखाला
दे लखलखते उत्तर!


काव्यकोडी : एकनाथ आव्हाड


१) शेतातून येतो
कारखान्यात जातो
साखर, गुळाचे
रूप नवे घेतो

उन्हाळ्यात रस याचा
लागतो भारी
काविळीवर सांगा बरं
कोण गुणकारी?

२) चौकोनी आकार
पांढराशुभ्र रंग
यांच्याकडे येते बघा
मुंग्यांची रांग

कडू बोलणे त्यांचे
कधीच नसते
चहात, मिठाईत
कोण लपून बसते?

३) दोन पंख, एक शेपटी
पाण्यात त्याचे घर
अंग असते खवल्यांचे
रंगीत नक्षी त्यावर

सुळकन पोहताना
दिसे किती छान
कुणामुळे पाणी
होत नाही घाण?

उत्तर -
१) ऊस
२) साखर 
३) मासा

Comments
Add Comment

विकतची किर्ती नको

गोष्ट लहान, मोठा अर्थ-शिल्पा अष्टमकर आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला प्रसिद्धी, मान-सन्मान आणि किर्ती हवी

उंदराचे बीळ!

कथा-रमेश तांबे एका गावात एक उंदीर अगदी मजेत राहात होता. त्याच्या कुटुंबात चार-पाच जण होते. पण गावात स्वच्छतेच्या

समुद्रात मोती कसे बनतात ?

विज्ञानकथा-प्रा. देवबा पाटील सुहलीला गेलेल्या मुलांच्या ज्ञानाच्या गप्पा मस्त चालू होत्या. “सागरी प्रवाह कसे

असा ऋतू

गड-किल्ले हे माझे अत्यंत आवडीचे ठिकाण. शाळेत असताना पहिल्यांदा पहिला गड पाहिला तो ‘रायगड’ तोही सहलीच्या

एकेकाचे स्वभाव

गोष्ट लहान, मोठा अर्थ-शिल्पा अष्टमकर मानुष्य हा सामाजिक प्राणी आहे. समाजात वावरताना आपल्याला विविध स्वभावाची

समुद्र कसे निर्माण झाले?

विज्ञानकथा-प्रा. देवबा पाटील शिवम व त्याचे सवंगडी सहलीला गेले असताना दुपारचे जेवण झाल्यावर विश्रांती घेत बसले