भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या घरातून महागड्या फोनची चोरी, किंमत तब्बल...

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीच्या(sourav ganguly) मोबाईल फोनची चोरी झाली आहे. गांगुलीने याची तक्रार ठाकूरपूर पोलीस ठाण्यात केली आहे. अनेक रिपोर्टमध्ये सांगितले की चोरी झालेल्या फोनची किंमत तब्बल १.६ लाख इतकी आहे. कोलकातामधील गांगुलीच्या घरातून हा फोन चोरीला गेला आहे.


आयपीएल फ्रेंचायझी दिल्ली कॅपिटल्सचे क्रिकेट डायरेक्टर गांगुली यांचा फोन गायब झाल्याने ते खूप चिंतित आहेत. कारण त्या मोबाईलमध्ये अनेक महत्त्वाच्या माहिती आहेत. यामुळे त्यांचा भीती सतावत आहे. प्रिन्स ऑफ कोलकाता सौरव गांगुलीने पोलिसांकडून तातडीने कारवाई करण्यात यावी अशी विनंती केली आहे.



पोलीस करणार तपास


सौरव गांगुलीच्या घरात सध्या रंगकाम चालू आहे. गांगुलीच्या घरात काम करणाऱ्या कामगारांकडे ही चौकशी होण्याची शक्यता आहे. गांगुलीने शनिवारी ठाकूरपूर पोलीस ठाण्याचे ठाणे प्रभारी यांना पत्र लिहित सांगितले की मोबाईल फोन त्यांच्या घरातून चोरी झाला आहे.



आयपीएलमध्ये दिसणार गांगुली


बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यावेळेस दिल्ली कॅपिटल्ससोबत आहेत. गांगुलीसहित दिल्ली कॅपिटल्सच्या नजरा ऋषभ पंतवर टिकून आहेत. तो या हंगामात उपलब्ध असेल की नाही याबाबत सस्पेंस कायम आहे.
Comments
Add Comment

Ranji Trophy: १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी बिहार रणजी संघाचा उपकर्णधार

साकिबुल गनीकडे नेतृत्वाची धुरा मुंबई : १५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफी २०२५-२६ हंगामासाठी बिहार

कुलदीप यादवने दिल्लीमध्ये केले नको ते शतक, बनवला हा खराब रेकॉर्ड

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाचा चायनामन फिरकी

भारताला शेवटच्या दिवशी जिंकण्यासाठी हव्या ५८ धावा

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये कसोटी सामना सुरू आहे. या

भारताला जिंकण्यासाठी हव्या १२१ धावा

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये कसोटी सामना सुरू आहे. या

IND vs WI:चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात, भारताला विकेटची प्रतीक्षा

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळाला

वर्ल्डकपमध्ये दोन पराभव, टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचू शकेल का? जाणून घ्या समीकरण

मुंबई: महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाच्या हातून पराभवास सामोरे जावे लागले. या