दिशाहिन यूपीए सरकारमध्ये सोनिया गांधींचे सुपर ‘पीएम’चे काम

Share

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत कॉंग्रेस कारभारावर चौफेर हल्ला

नवी दिल्ली : यूपीए सरकारची राजवट दिशाहीन आणि नेतृत्वहीन होती. त्यावेळी सोनिया गांधी ‘सुपर पीएम’ म्हणून काम करत होत्या. नेतृत्व ही महत्त्वाची बाब आहे. दिशाहीन, नेतृत्वहीन नेतृत्व हे यूपीएच्या गलथान कारभाराचे केंद्रस्थान होते. सोनिया गांधी या राष्ट्रीय सल्लागार समितीच्या अध्यक्षा म्हणून सुपर पंतप्रधान होत्या. त्यांच्यावरच सगळ्या गोष्टींचे निर्णय अवलंबून असल्याचे सांगत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत काँग्रेस आणि यूपीए काळातील सरकारवर चौफेर हल्ला चढवला.

लोकसभेत श्वेतपत्रिकेवरील चर्चेला उत्तर देताना निर्मला सीतारामन यांनी २००४ ते २०१४ या काळात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए आणि त्यानंतरच्या भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार यांच्यातील अर्थव्यवस्थेची तुलना करुन दाखवली आणि काँग्रेसवर हल्ला चढवला.

निर्मला सीतारामन यांनी २०१३ मधील एका घटनेबाबत काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला. मनमोहन सिंग सरकारमध्ये राहुल गांधींनी फाडलेल्या प्रस्तावित अध्यादेशाचा आणि राहुल गांधींनी तो अध्यादेश कसा फाडला याचा संदर्भ अर्थमंत्र्यांनी दिला. त्यावर बोलताना सीतारामन यांनी राहुल गांधींचा उल्लेख ‘अहंकारी’ असा केला आणि त्यांची ही कृती त्यांच्याच पंतप्रधानांचा अपमान करणारी असल्याचे म्हटले.

निर्मला सीतारामन म्हणाल्या की, अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी १० वर्षे प्रयत्न केल्यानंतर आज आपण ‘फ्रेजाइल ५’ मधून पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलो आहोत. लवकरच तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. आधीच्या सरकारच्या कारकिर्दीत गैरव्यवस्थापन आणि नेतृत्वातील त्रुटींमुळे अडचणी आल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

1 hour ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

2 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

2 hours ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

2 hours ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

2 hours ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

2 hours ago