परिक्षेत प्रश्न विचारला आणि दिल्लीच्या विद्यापीठातील प्राध्यापकाचे थेट निलंबन! काय आहे प्रकरण?

नवी दिल्ली: दिल्लीतील महाविद्यालयं आणि शाळांबाबत नेहमीच काहीतरी विषय चर्चेत असतो. अशाच प्रकारे दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. या विद्यापीठाच्या एका सत्र परिक्षेत विचारल्या गेलेल्या प्रश्नावरून विद्यापीठात गोंधळ निर्माण झाला आहे. ज्याचा परिणाम थेट प्राध्यापकाच्या नोकरीवर झाला असून अंतिम निकषापर्यंत प्राध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे.


जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील बीए (ऑनर्स) सोशल वर्क या पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षेत एक प्रश्न विचारण्यात आला होता आणि याच प्रश्नावरून वाद सुरू झाला आहे. याची दखल विद्यापीठाने घेत मोठी कारवाई केली असून अंतर्गत चौकशी समिती स्थापन केली आहे. तसेच समिती स्थापन करताच संबंधित पेपर तयार करणाऱ्या प्राध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सत्र परीक्षेत भारतात मुस्लिम नागरिकांविषयी उल्लेख असलेला एक प्रश्न विचारण्यात आला होता. ज्या प्रश्नाविरोधात विद्यापीठ प्रशासनाला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्याने विद्यापीठाने पोलिसांना या प्रकरणात एफआयआर नोंदवण्यास सांगितले.




विद्यापीठाने याबाबत माहिती देताना सांगितले की, विद्यापीठ प्रशासनाने प्राध्यापक वीरेंद्र बालाजी शहारे यांच्या निष्काळजीपणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही चौकशी समिती या प्रकरणाची तपास पूर्ण करून निष्कर्ष देईपर्यंत प्राध्यापक वीरेंद्र बालाजी शहारे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जामिया विद्यापीठाच्या कुलगुरूंनी कायद्याच्या कलम ३७(१) अंतर्गत ही कारवाई केली आहे.


नेमका काय प्रश्न विचारण्यात आला होता?
बीए (ऑनर्स) सोशल वर्क प्रोग्रामसाठी 'भारतातील सामाजिक समस्या' या विषयाची सत्र १ ची प्रश्नपत्रिका प्राध्यापक वीरेंद्र बालाजी शहारे यांनी तयार केली होती. ज्यात 'भारतात मुस्लिम अल्पसंख्याकांवरील अत्याचारांवर योग्य उदाहरण देऊन चर्चा करा', असा प्रश्न विचारण्यात आला होता. ज्यावरून वाद निर्माण झाला आहे.


Comments
Add Comment

Melody Trend and Parle Shares : 'Melodi' ट्रेंडची कमाल; क्षणार्धात वाढले पार्लेचे शेअर्स; पण फायदा मात्र दुसऱ्याच कंपनीचा झाला; जाणून घ्या नेमकं काय घडलं

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इटलीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर नरेंद्र मोदी यांनी

DRDO : आता यूएवीमधून डागता येणार निर्देशित क्षेपणास्त्र; डीआरडीओच्या चाचण्या पूर्ण

- आंध्र प्रदेशातील कुरनूलजवळील डीआरडीओ चाचणी क्षेत्रात ही कामगिरी साध्य नवी दिल्ली : भारत आता मानवरहित हवाई

Shocking : खेळता-खेळता गाडीत अडकली, दोन तास ऑक्सिजनसाठी धडपडली अन् गुदमरून ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

मध्य प्रदेश : आपले घर आणि घराचे अंगण हे मुलांसाठी सर्वात सुरक्षित ठिकाण असते, असा प्रत्येक पालकाचा ठाम विश्वास

Iran America War : मोबाईलमधील इंटरनेट आणि UPI सेवा ठप्प होणार ? इराणच्या खळबळजनक वक्तव्याने उडाली तारांबळ!

आजच्या काळात श्वास घेण्याइतकेच इंटरनेट (Internet) गरजेचे झाले आहे. सकाळच्या अलार्मपासून ते रात्रीच्या सोशल मीडिया (Social

Stray Dogs : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय : शाळा आणि रुग्णालयांंजवळून भटके कुत्रे हटवण्याचे आदेश कायम

नवी दिल्ली : देशात भटक्या कुत्र्यांचा वाढता प्रादुर्भाव (Stray Dogs) आणि त्यांच्या हल्ल्यांच्या वाढत्या घटना लक्षात

Uttarakhand Train Accident : ऋषिकेशमध्ये मोठा रेल्वे अपघात टळला! उज्जयनी एक्सप्रेसचे ३ डब्बे रुळावरून घसरले

ऋषिकेश : उत्तराखंडमधील ऋषिकेश (Uttarakhand Train Accident) येथे उज्जयनी एक्सप्रेसशी संबंधित धक्कादायक घटना समोर आली आहे. स्टेशन