परिक्षेत प्रश्न विचारला आणि दिल्लीच्या विद्यापीठातील प्राध्यापकाचे थेट निलंबन! काय आहे प्रकरण?

नवी दिल्ली: दिल्लीतील महाविद्यालयं आणि शाळांबाबत नेहमीच काहीतरी विषय चर्चेत असतो. अशाच प्रकारे दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. या विद्यापीठाच्या एका सत्र परिक्षेत विचारल्या गेलेल्या प्रश्नावरून विद्यापीठात गोंधळ निर्माण झाला आहे. ज्याचा परिणाम थेट प्राध्यापकाच्या नोकरीवर झाला असून अंतिम निकषापर्यंत प्राध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे.


जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील बीए (ऑनर्स) सोशल वर्क या पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षेत एक प्रश्न विचारण्यात आला होता आणि याच प्रश्नावरून वाद सुरू झाला आहे. याची दखल विद्यापीठाने घेत मोठी कारवाई केली असून अंतर्गत चौकशी समिती स्थापन केली आहे. तसेच समिती स्थापन करताच संबंधित पेपर तयार करणाऱ्या प्राध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सत्र परीक्षेत भारतात मुस्लिम नागरिकांविषयी उल्लेख असलेला एक प्रश्न विचारण्यात आला होता. ज्या प्रश्नाविरोधात विद्यापीठ प्रशासनाला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्याने विद्यापीठाने पोलिसांना या प्रकरणात एफआयआर नोंदवण्यास सांगितले.




विद्यापीठाने याबाबत माहिती देताना सांगितले की, विद्यापीठ प्रशासनाने प्राध्यापक वीरेंद्र बालाजी शहारे यांच्या निष्काळजीपणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही चौकशी समिती या प्रकरणाची तपास पूर्ण करून निष्कर्ष देईपर्यंत प्राध्यापक वीरेंद्र बालाजी शहारे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जामिया विद्यापीठाच्या कुलगुरूंनी कायद्याच्या कलम ३७(१) अंतर्गत ही कारवाई केली आहे.


नेमका काय प्रश्न विचारण्यात आला होता?
बीए (ऑनर्स) सोशल वर्क प्रोग्रामसाठी 'भारतातील सामाजिक समस्या' या विषयाची सत्र १ ची प्रश्नपत्रिका प्राध्यापक वीरेंद्र बालाजी शहारे यांनी तयार केली होती. ज्यात 'भारतात मुस्लिम अल्पसंख्याकांवरील अत्याचारांवर योग्य उदाहरण देऊन चर्चा करा', असा प्रश्न विचारण्यात आला होता. ज्यावरून वाद निर्माण झाला आहे.


Comments
Add Comment

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी

Supreme Court : 'त्या' प्रकरणात आसारामला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; अंतरिम जामीनावर तत्काळ सुनावणीस नकार

Supreme Court : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का

Assam Rain : ईशान्य भारतात पावसाचा कहर! आसाममध्ये महापूराने रेल्वे पूल वाहून गेला; २२ हजार नागरिक बेघर, १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला

- ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान

NEET Case : नीटप्रकरणी १० आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू