परिक्षेत प्रश्न विचारला आणि दिल्लीच्या विद्यापीठातील प्राध्यापकाचे थेट निलंबन! काय आहे प्रकरण?

नवी दिल्ली: दिल्लीतील महाविद्यालयं आणि शाळांबाबत नेहमीच काहीतरी विषय चर्चेत असतो. अशाच प्रकारे दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. या विद्यापीठाच्या एका सत्र परिक्षेत विचारल्या गेलेल्या प्रश्नावरून विद्यापीठात गोंधळ निर्माण झाला आहे. ज्याचा परिणाम थेट प्राध्यापकाच्या नोकरीवर झाला असून अंतिम निकषापर्यंत प्राध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे.


जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील बीए (ऑनर्स) सोशल वर्क या पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षेत एक प्रश्न विचारण्यात आला होता आणि याच प्रश्नावरून वाद सुरू झाला आहे. याची दखल विद्यापीठाने घेत मोठी कारवाई केली असून अंतर्गत चौकशी समिती स्थापन केली आहे. तसेच समिती स्थापन करताच संबंधित पेपर तयार करणाऱ्या प्राध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सत्र परीक्षेत भारतात मुस्लिम नागरिकांविषयी उल्लेख असलेला एक प्रश्न विचारण्यात आला होता. ज्या प्रश्नाविरोधात विद्यापीठ प्रशासनाला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्याने विद्यापीठाने पोलिसांना या प्रकरणात एफआयआर नोंदवण्यास सांगितले.




विद्यापीठाने याबाबत माहिती देताना सांगितले की, विद्यापीठ प्रशासनाने प्राध्यापक वीरेंद्र बालाजी शहारे यांच्या निष्काळजीपणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही चौकशी समिती या प्रकरणाची तपास पूर्ण करून निष्कर्ष देईपर्यंत प्राध्यापक वीरेंद्र बालाजी शहारे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जामिया विद्यापीठाच्या कुलगुरूंनी कायद्याच्या कलम ३७(१) अंतर्गत ही कारवाई केली आहे.


नेमका काय प्रश्न विचारण्यात आला होता?
बीए (ऑनर्स) सोशल वर्क प्रोग्रामसाठी 'भारतातील सामाजिक समस्या' या विषयाची सत्र १ ची प्रश्नपत्रिका प्राध्यापक वीरेंद्र बालाजी शहारे यांनी तयार केली होती. ज्यात 'भारतात मुस्लिम अल्पसंख्याकांवरील अत्याचारांवर योग्य उदाहरण देऊन चर्चा करा', असा प्रश्न विचारण्यात आला होता. ज्यावरून वाद निर्माण झाला आहे.


Comments
Add Comment

POK Violence : पाकव्याप्त काश्मीरमध्ये तणावाचा भडका; भीषण हिंसाचार, आंदोलने आणि नेमकी परिस्थिती काय?

Mumbai : पाकव्याप्त काश्मीर (PoK) सध्या एका भीषण अशांततेच्या काळातून जात आहे. रावळकोटसह अनेक महत्त्वाच्या भागांमध्ये

मोदी युगाचा नवा अध्याय; नरेंद्र मोदी ठरले भारताचे सर्वाधिक काळ सलग कार्यरत पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय राजकारणात आणखी एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. 10 जून रोजी सलग

Uri Blast : ‘उरीमधील भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद; गस्तीदरम्यान नियंत्रण रेषेजवळ घडली दुर्दैवी घटना

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये (Uri Blast) नियंत्रण रेषेजवळ झालेल्या भीषण स्फोटात भारतीय लष्कराचे दोन

PM Narendra Modi 'X' Post : 'जनसेवा हाच खरा धर्म'!; ऐतिहासिक विक्रमानंतर पंतप्रधान मोदींचं ट्वीट चर्चेत

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी भारतीय राजकारणाच्या इतिहासात आणखी एक सुवर्णपान जोडले आहे.

PM Narendra Modi : भाजपाने नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक काळ सलग पंतप्रधानपद भूषविल्याबद्दल दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ सलग पदावर राहिलेले निवडून आलेले

Gold Rate Today : सराफा बाजारात मोठी उलथापालथ! सोने 4,300 रुपयांनी तर चांदी 10 हजारांनी घसरली; खरेदीदारांना मोठा दिलासा

सोन्या-चांदीच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत असतानाच आज सराफा