U19 WC 2024: ६ महिन्यांच्या आत दुसऱ्यांदा वर्ल्डकप फायनलमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया आमनेसामने

मुंबई: अंडर १९ वर्ल्डकपच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला १ विकेटनी हरवले. शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजयी संघर्षाने खेळताना पाकिस्तानला चीत केले. सोबतच भारतासोबत फायनल खेळण्यासाठी आपले स्थान पक्के केले.


आता ११ फेब्रुवारीला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्डकपचा फायनल सामना रंगणार आहे. ६ महिन्यांच्या आत हे दुसऱ्यांदा घडतेय जेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलिया आयसीसीच्या स्पर्धेच्या फायनलमध्ये भिडत आहे.


गेल्या वेळेस पुरुष वर्ल्डकप २०२३मध्ये दोन्ही संघादरम्यान फायनलचा सामना रंगला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने बाजी मारली होती. त्या पराभवाचा बदला घेण्याची संधी अंडर १९ संघाकडे आहे.



गेल्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय


वर्ल्डकप २०२३च्या फायनलमध्ये भारताचा वरिष्ठ पुरुष गट आणि ऑस्ट्रेलियाचा वरिष्ठ पुरुष गट यांच्यात सामना खेळवण्यात आला होता. दोन्ही संघादरम्यान हा सामना १९ नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झाला होता. या साम्यात भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी केली होती. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करत ५० षटकांत २४० धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान ट्रेविस हेडच्या शानदार शतकाच्या जोरावर ४ विकेट गमावत पूर्ण केले होते.


आता ११ फेब्रुवारीला भारत आणि ऑस्ट्रेलिया पुन्हा वर्ल्डकपमध्ये आमनेसामने येत आहेत. दोन्ही संघ अंडर १९ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये आहेत. भारतीय संघाने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे भारतीय संघ फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवत २०२३च्या वर्ल्डकपचा बदला घेण्याचा प्रयत्न करेल.

Comments
Add Comment

जोश हेझलवूडची एमसीजीवर 'ड्रीम स्पेल'!

मेलबर्न: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याने शुक्रवार, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी मेलबर्न क्रिकेट

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ अंतिम सामन्यासाठी पंचांची घोषणा

नवी मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विश्वचषक २०२५ च्या अंतिम

महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास गावस्कर करणार हे विशेष काम

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दिमाखात दाखल झाला आहे. भारतीय महिला संघ आता

मेलबर्नमध्ये भारताचा पराभव: ऑस्ट्रेलियाची १-० ने आघाडी!

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने

भारताची फलंदाजी कोलमडली, अभिषेक शर्माचे लढाऊ अर्धशतक व्यर्थ: टी-२० सामन्यात पुन्हा निराशाजनक कामगिरी

मेलबर्न : वनडे मालिकेत पराभवाचा धक्का बसल्यानंतर टी-२० मालिकेत पुनरागमनाची स्वप्नं पाहणाऱ्या भारतीय संघाला

सामन्याच्या अंतिम क्षणी केवळ बायबलच्या त्या ओळी म्हटल्या, विजयानंतर भावूक झाली जेमिमा

नवी मुंबई : ऑस्ट्रेलियाला महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात धूळ चारल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सच्या डोळ्यात