अजिंक्य रहाणे सातत्याने होतोय फ्लॉप, टीम इंडियामध्ये कमबॅकचे स्वप्न अपूर्ण राहणे निश्चित

मुंबई: स्टार फलंदाज अजिंक्य रहाणेसाठी(ajinkya rahane) टीम इंडियामध्ये परतण्याचे सर्व मार्ग पूर्णपणे बंद होताना दिसत आहेत. रणजी ट्रॉफीमध्ये अजिंक्य रहाणे फलंदाजीत चांगली कामगिरी करत नाही आहे. छत्तीसगडविरुद्ध खेळवल्या जात असलेल्या सामन्यात अजिंक्य रहाणे केवळ १ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.


रणजी ट्रॉफीमध्ये या हंगामात खेळलेल्या ६ डावांमध्ये रहाणेला केवळ ३४ धावा करता आल्या. टीम इंडियात परतण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अजिंक्य रहाणेवर आता मुंबई संघातूनही ड्रॉप होण्याची टांगती तलवार आहे.


रणजी ट्रॉफीच्या या हंगामात अजिंक्य रहाणेला नशीबाची अजिबात साथ मिळत नाही आहे. रहाणे फॉर्मशिवाय फिटनेसबाबतही झगडत आहे. दुखापतग्रस्त होण्याच्या कारणामुळे रहाणे दोन सामन्यात खेळू शकला नाही. याशिवाय रहाणेच्या ६ डावांमध्ये सर्वाधिक धावसंख्या १६ इतकी होती. दोनदा रहाणेला खाते खोलण्यात यशस्वीही ठरला नाही.


इतर तीन डावांत रहाणेने ८,९ आणि एक धाव केली. इतक्या खराब परफॉर्मन्सनंतर रहाणेसाठी टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्याची कोणतीही शक्यता उऱलेली नाही. अजिंक्य रहाणेने नुकतेच भावूक होत म्हटले होते की त्याला टीम इंडियासाठी १०० कसोटी सामने खेळायचे आहेत. मात्र आता अजिंक्य रहाणेचे हे स्वप्न स्वप्नच राहील असे वाटते. रहाणेने आतापर्यंत भारतासाठी ८५ कसोटी सामने खेळले आहेत.


गेल्या वर्षी रहाणेला टीम इंडियामध्ये कमबॅकची संधी मिळाली होती. रहाणेने डब्लूटीसी फायनलच्या दोन डावांत फलंदाजीने कमाल केली होती. मात्र रहाणेची बॅट वेस्ट इंडिज दौऱ्यावर अयशस्वी ठरली. यानंतर रहाणेला टीम इंडियाच्या बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

Comments
Add Comment

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए