अजिंक्य रहाणे सातत्याने होतोय फ्लॉप, टीम इंडियामध्ये कमबॅकचे स्वप्न अपूर्ण राहणे निश्चित

मुंबई: स्टार फलंदाज अजिंक्य रहाणेसाठी(ajinkya rahane) टीम इंडियामध्ये परतण्याचे सर्व मार्ग पूर्णपणे बंद होताना दिसत आहेत. रणजी ट्रॉफीमध्ये अजिंक्य रहाणे फलंदाजीत चांगली कामगिरी करत नाही आहे. छत्तीसगडविरुद्ध खेळवल्या जात असलेल्या सामन्यात अजिंक्य रहाणे केवळ १ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.


रणजी ट्रॉफीमध्ये या हंगामात खेळलेल्या ६ डावांमध्ये रहाणेला केवळ ३४ धावा करता आल्या. टीम इंडियात परतण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अजिंक्य रहाणेवर आता मुंबई संघातूनही ड्रॉप होण्याची टांगती तलवार आहे.


रणजी ट्रॉफीच्या या हंगामात अजिंक्य रहाणेला नशीबाची अजिबात साथ मिळत नाही आहे. रहाणे फॉर्मशिवाय फिटनेसबाबतही झगडत आहे. दुखापतग्रस्त होण्याच्या कारणामुळे रहाणे दोन सामन्यात खेळू शकला नाही. याशिवाय रहाणेच्या ६ डावांमध्ये सर्वाधिक धावसंख्या १६ इतकी होती. दोनदा रहाणेला खाते खोलण्यात यशस्वीही ठरला नाही.


इतर तीन डावांत रहाणेने ८,९ आणि एक धाव केली. इतक्या खराब परफॉर्मन्सनंतर रहाणेसाठी टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्याची कोणतीही शक्यता उऱलेली नाही. अजिंक्य रहाणेने नुकतेच भावूक होत म्हटले होते की त्याला टीम इंडियासाठी १०० कसोटी सामने खेळायचे आहेत. मात्र आता अजिंक्य रहाणेचे हे स्वप्न स्वप्नच राहील असे वाटते. रहाणेने आतापर्यंत भारतासाठी ८५ कसोटी सामने खेळले आहेत.


गेल्या वर्षी रहाणेला टीम इंडियामध्ये कमबॅकची संधी मिळाली होती. रहाणेने डब्लूटीसी फायनलच्या दोन डावांत फलंदाजीने कमाल केली होती. मात्र रहाणेची बॅट वेस्ट इंडिज दौऱ्यावर अयशस्वी ठरली. यानंतर रहाणेला टीम इंडियाच्या बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

Comments
Add Comment

अर्जुन आणि सानियाला दिल्या अमित शाह यांनी खास पत्रातून शुभेच्छा

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारताचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या कुटुंबाला विशेष

FIFA 2026 : फिफा २०२६ च्या विश्वचषकातून इराण बाहेर; फिफाने ठोठावला इराणला दंड

- या भ्रष्ट राजवटीने आमच्या नेत्याची हत्या केली, आम्ही कोणत्याही परिस्थितीत विश्वचषकात सहभागी होऊ शकत

IPL 2026 : आयपीएल२०२६ पर्वाचे वेळापत्रक जाहीर; आरसीबी आणि एसआरएचमध्ये होणार सलामीची लढत

मुंबई : आयपीएल २०२६ च्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) १९

अर्जुन पुरस्काराचे मानकरी जलतरणपटू वीरधवल खाडे सरकारी नोकरीत

मुंबई : राज्याचे नाव क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर नेणारे नामवंत जलतरणपटू आणि माजी तहसीलदार वीरधवल खाडे

BCCI कडून विश्वविजेत्या टीम इंडियाला १३१ कोटींचं बक्षिस , परंतु प्रत्यक्षात एवढे पैसे मिळणार

मुंबई: टी२० विश्वचषक २०२६ मधील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघावर बीसीसीआयकडून बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला

T20 World Cup 2026 : आयसीसी 'टीम ऑफ द टूर्नामेंट'मध्ये चार भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश

आयसीसीने टी-२० साठी सर्वोत्तम संघ निवडला असून या संघात चार भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे. संजू