PM Narendra Modi : जेव्हा लोकशाहीची चर्चा होईल तेव्हा मनमोहन सिंग यांची आठवण येईल!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे केले भरभरुन कौतुक


नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Budget Session of the Parliament) आज ७ वा दिवस आहे. आज ५६ राज्यसभा खासदारांच्या (Rajyasabha MP) निरोपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपले मत व्यक्त केले. तसेच अंतरिम अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात आली. काल पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसच्या (Congress) आजवरच्या भ्रष्टाचारावर तसेच नाकर्तेपणावर बोट ठेवत काँग्रेसला चांगलेच धारेवर धरले. दरम्यान, आज राज्यसभेत खासदारांना दिलेल्या निरोपाच्या भाषणात मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांचे भरभरुन कौतुक केले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जेव्हा लोकशाहीची चर्चा होईल तेव्हा मनमोहन सिंग यांची आठवण येईल. मनमोहन सिंग यांनी जबाबदारी काय असते हे शिकवले. ते खासदारांसाठी प्रेरणादायी उदाहरण आहेत. मनमोहन सिंग यांचे या सभागृहात महत्त्वाचे योगदान असल्याचे ते म्हणाले.


पीएम मोदी म्हणाले की, मला विशेषत: मनमोहनजींचे स्मरण ठेवायचे आहे. त्यांनी या सदनाला आणि देशाला दीर्घकाळ मार्गदर्शन केले आहे. जेव्हा सभागृहामध्ये चर्चा होईल तेव्हा त्यात मनमोहन सिंग यांची नक्कीच चर्चा होईल. मनमोहन सिंग यांनी व्हील चेअरवर बसून सभागृहात मतदान केले. त्यांनी आपले कर्तव्य बजावले. मनमोहनजींनी लोकशाहीला बळ दिले.


तसेच पीएम मोदी पुढे म्हणाले की, सद्गुणी लोकांसोबत राहून आपल्यातील गुणही वाढले आहेत. नद्यांमधील पाणी जोपर्यंत वाहत राहते तोपर्यंतच ते पिण्यायोग्य राहते. पण नदी कितीही गोड असली तरी समुद्राला भेटताच ती पिण्यास अयोग्य होते. हा संदेश प्रत्येकासाठी प्रेरणादायी असेल असे मला वाटते.

Comments
Add Comment

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे

Amaravati Capital : 'अमरावती' आता आंध्र प्रदेशची 'कायमस्वरूपी' राजधानी; केंद्राचे गॅझेट नोटिफिकेशन जारी!

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) राजधानीबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर केंद्र सरकारने

Rajnath Singh : "पाकिस्तानने बंगालकडे वाईट नजरेने पाहिलं तर..."; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या भडकाऊ वक्तव्याला जोरदार

Sabarimala Temple Case : सबरीमला मंदिर प्रवेश प्रकरणात केंद्र सरकारने मांडली स्पष्ट भूमिका; म्हणाले...

केरळमधील सबरीमला मंदिराबाबत (Sabarimala Temple Case) केंद्र सरकारने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात आपली भूमिका मांडली. केंद्र

Lashkar-e-Taiba : श्रीनगर पोलिसांची मोठी कारवाई; पोलिसांकडून लष्कर-ए-तैयबा नेटवर्कचा भंडाफोड

- दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांसह पाच जणांना अटक श्रीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी

Air India: एअर इंडियाचा प्रवास ८ एप्रिलपासून महाग होणार; जाणून घ्या किती खर्च येणार?

नवी दिल्ली: टाटा ग्रुपच्या मालकीच्या एअर इंडियाने प्रवाशांना मोठा धक्का दिला आहे. जर तुम्हीही एअर इंडियाने