U19 World Cup 2024: सलग ६ सामने जिंकत फायनलमध्ये पोहोचली टीम इंडिया, असा होता प्रवास

मुंबई: भारतीय संघ अंडर १९ वर्ल्डकप २०२४मध्ये फायनलमध्ये पोहोचला आहे. टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला २ विकेटनी हरवले. या पद्धतीने भारत सलग पाचव्यांदा अंडर १९ वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. उदय सहारणच्या नेृत्वात भारतीय संघाने बांगलादेशविरुद्ध आपले अभियान सुरू केले होते. पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशला ८४ धावांनी हरवले होते. बांगलादेशविरुद्ध सुरू झालेला विजयाचा प्रवास हा सुरूच होत.



या स्पर्धेत असा राहिला भारताचा प्रवास


बांगलादेशनंतर भारताने आपल्या दुसऱ्या सामन्यात आयर्लंडला हरवले. त्यांनी आयर्लंडच्या संघाला २०१ धावांनी हरवले. यानंतर टीम इंडियासमोर अमेरिकेचे आव्हान होते. मात्र अमेरिकेचा संघ उदय सहारणच्या नेतृत्वातील संघासमोर टिकू शकला नाही. भारतीय संघाने चौथ्या सामन्यात न्यूझीलंडला हरवले. भारताविरुद्ध न्यूझीलंडला २१४ धावांनी पराभव सहन करावा लागला. न्यूझीलंडनंतर त्यांनी नेपाळला हरवले.



सेमीफायनलमध्ये आफ्रिकेला हरवत गाठली फायनल


भारतीय संघाने सेमीफायनलच्या सामन्यात आफ्रिकेला दोन विकेट राखून हरवले. आफ्रिकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ बाद २४४ धावा केल्या होत्या. त्यानंतर टीम इंडियाने हे आव्हान २ विकेट आणि ७ बॉल राखत पूर्ण केले.

Comments
Add Comment

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतही जसप्रीत बुमराहच अव्वल

दुबई (वृत्तसंस्था): आयसीसीने बुधवारी त्यांची ताजी क्रमवारी जाहीर केली. भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि कुलदीप

महिला क्रिकेट विश्वचषक : भारतीय संघाला विजयी हॅट्ट्रिकची संधी

विशाखापट्टणम: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने

IND vs AUS : फक्त १० धावा करताच रोहित शर्मा रचणार इतिहास

पर्थ/मेलबर्न: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय (ODI)

Asia Cup 2025 : बक्षीस मिळालेली कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकत नाही, जाणून घ्या कारण !

मुंबई : आशिया कप २०२५ मध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याने चमकदार कामगिरी करत "प्लेअर ऑफ द टूर्नामेंट"चा किताब

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात

पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून