Solapur university : सोलापूर विद्यापीठाचा ओंगळ कारभार; विद्यार्थ्यांना ५० गुणांच्या परिक्षेत चक्क ९९ गुण!

नेमकी काय चूक घडली?


सोलापूर : विद्यापीठात परिक्षांच्या वेळापत्रकात तसेच गुणपत्रिकेत चुका झाल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यातच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या (Solapur university) ओंगळ कारभाराची एक घटना समोर आली आहे. ५० गुणांच्या परिक्षेत विद्यार्थ्यांना चक्क ९० गुण किंवा ५० हून अधिक गुण मिळाल्याचे निकालात (Exam results) दिसत आहे. बीएससी सेमिस्टर तीनच्या (BSC Semister 3) निकालातील हा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थीही चक्रावले.


सोलापूर विद्यापीठाकडून १३ डिसेंबर २०२३ पासून २२ डिसेंबरपर्यंत बीएससी सेमिस्टर ३ च्या परीक्षा पार पडल्या. याचा निकाल समोर येताच सर्वजण चकीत झाले. काही विद्यार्थ्यांना ५० गुणांच्या परीक्षेत एका विषयाला ५० हून अधिक गुण दिले गेले. या निकालामध्ये विद्यापीठाने ४० गुणांचा लेखी पेपर तर १० गुणांची असाइनमेंट अशी एकूण ५० गुणांची परीक्षा घेतली होती.


या परीक्षेचा ५ फेब्रुवारीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, या निकालात झालेल्या चुकांमुळे विद्यार्थी गोंधळून गेले. क्लेरीकल चुकीमुळे हे घडल्याचं समोर आलं आहे. चूक लक्षात येताच विद्यार्थ्यांना गुणपत्रिका बदलून दिल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे. दरम्यान, क्लेरीकल चुकीमुळे केवळ चार विद्यार्थ्यांच्या बाबतीत असा प्रकार घडल्याची विद्यापीठ प्रशासनाने कबुली दिली आहे.

Comments
Add Comment

Jalna : कॉलेजचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू आणि चौघे जखमी

जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये एका कॉलेजच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम सुरू असताना

Ahilyanagar Crime News : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार, मुकादमाच्या मुलावर गुन्हा दाखल

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एक संतापजनक घटना घडली आहे. पाथर्डी तालुक्यातील एका गावातील

Pune News : पुणे स्थानकातून प्रवाशांची अजब हातसफाई : ५ वर्षांत ३ कोटींचे बेडशीट अन् टॉवेल लंपास; रेल्वेने ठेकेदाराकडून वसूल केली भरपाई!

पुणे : रेल्वेच्या वातानुकूलित (AC) डब्यातून प्रवास करताना प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वे

Pratap Sarnaik : गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस धावणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबई :  श्री गणरायाचे आगमन १४ सप्टेंबर रोजी होत असून, बाप्पाच्या स्वागतासाठी

Devendra Fadnavis : तिसऱ्या मुंबईसाठी ३२४ चौ.कि.मी. क्षेत्राचा 'मास्टर प्लॅन'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये 'मॅपलट्री'कडून १.१ अब्ज डॉलरची गुंतवणूक अपेक्षित मुंबई :

Nandurbar : नंदुरबार हादरलं ! अल्पवयीन मुलांसह तरुणांचे लैंगिक शोषण, दोनशेपेक्षा अधिक आक्षेपार्ह चित्रफिती

Nandurbar : नंदुरबारमध्ये एक हादरवणारा प्रकार उघडकीस आला आहे. नंदुरबारमध्ये अल्पवयीन बालकांसह काही तरुणांचे लैंगिक