NCP MLA disqualification : निवडणूक आयोगाने दिलेल्या राष्ट्रवादीच्या निकालाबाबत काय म्हणाले राहुल नार्वेकर?

१४ फेब्रुवारीला राहुल नार्वेकर करणार सुनावणी


मुंबई : निवडणूक आयोगाने (Election Commission of India) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निकाल लावत मूळ पक्ष व घड्याळाचं चिन्ह अजित पवारांना (Ajit Pawar) बहाल केलं. त्यामुळे शरद पवारांना (Sharad Pawar) प्रचंड मोठा धक्का बसला. यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) या प्रकरणी निकाल लावणार आहेत. ते सुद्धा अजितदादांच्या बाजूनेच निकाल लावतील, अशा चर्चा होत असताना राहुल नार्वेकर यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रप्रकरणी (NCP MLA disqualification case) मेरिटनुसारच निकाल दिला जाईल. निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाचा कुठलाही संबंध या निकालाशी जोडला जाणार नाही, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. राष्ट्रवादी पक्षाबाबत विधान भावनाकडून किंवा निवडणूक आयोगाकडून कोणतीही कागदपत्रे मागवण्यात आलेली नाहीत, असं राहुल नार्वेकर म्हणाले.



१४ फेब्रुवारी रोजी होणार सुनावणी


राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकर १४ फेब्रुवारी रोजी निकाल देणार आहेत. गेल्या महिन्यात राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला होता. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे अथवा एकनाथ शिंदे यांच्या कोणत्याही आमदारांना अपात्र ठरवलं नव्हतं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी ते काय निकाल देतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


Comments
Add Comment

जयंत पाटील, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षावर

मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक अनपेक्षित बातमी समोर आली असून, शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे

'होय मीच माझ्या पत्नीचा खून केलाय'....; सायको पती मृतदेहासोबत थेट पोलीस ठाण्यात

समृध्दी महामार्गावर पत्नीची हत्या करून आरोपी पती पोहचला थेट पोलीस ठाण्यात वाशिम : समृद्धी महामार्गावर ( Samruddhi Mahamarg)

Dashavatar : दशावतार कलाकार सर्वेक्षणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष नोंदणी मोहीम

- जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात विशेष कक्ष मुंबई : महाराष्ट्राच्या समृद्ध

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड घटनेनुसारच!

- प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे; सच्चिदानंद सिंह यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार मुंबई : राष्ट्रवादी

Farmer Loan Waiver : ऐतिहासिक कर्जमाफीबद्दल 15 जुलैला मुख्यमंत्री फडणवीसांचा शेतकऱ्यांकडून जाहीर सत्कार

मुंबई : राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ देणारी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' लागू

Vadhvan Port News : पॅरिसच्या धर्तीवर वाढवण बंदराजवळ उभारणार आंतरराष्ट्रीय कृषी बाजार

- मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; राज्यातील शेतमाल निर्यातीला मोठी चालना मिळणार मुंबई : पालघर जिल्ह्यात विकसित होत