NCP MLA disqualification : निवडणूक आयोगाने दिलेल्या राष्ट्रवादीच्या निकालाबाबत काय म्हणाले राहुल नार्वेकर?

१४ फेब्रुवारीला राहुल नार्वेकर करणार सुनावणी


मुंबई : निवडणूक आयोगाने (Election Commission of India) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निकाल लावत मूळ पक्ष व घड्याळाचं चिन्ह अजित पवारांना (Ajit Pawar) बहाल केलं. त्यामुळे शरद पवारांना (Sharad Pawar) प्रचंड मोठा धक्का बसला. यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) या प्रकरणी निकाल लावणार आहेत. ते सुद्धा अजितदादांच्या बाजूनेच निकाल लावतील, अशा चर्चा होत असताना राहुल नार्वेकर यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रप्रकरणी (NCP MLA disqualification case) मेरिटनुसारच निकाल दिला जाईल. निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाचा कुठलाही संबंध या निकालाशी जोडला जाणार नाही, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. राष्ट्रवादी पक्षाबाबत विधान भावनाकडून किंवा निवडणूक आयोगाकडून कोणतीही कागदपत्रे मागवण्यात आलेली नाहीत, असं राहुल नार्वेकर म्हणाले.



१४ फेब्रुवारी रोजी होणार सुनावणी


राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकर १४ फेब्रुवारी रोजी निकाल देणार आहेत. गेल्या महिन्यात राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला होता. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे अथवा एकनाथ शिंदे यांच्या कोणत्याही आमदारांना अपात्र ठरवलं नव्हतं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी ते काय निकाल देतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


Comments
Add Comment

Buldhana News : हृदयद्रावक! लेकीचं कन्यादान करतानाच बापाने सोडले प्राण; बुलढाण्यात लग्नमंडपातच हळहळ

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील वरदडी गावात एका मंगलमय प्रसंगाचे रूपांतर क्षणातच एका

Pune News : पुण्यात खळबळ! 'त्या' ६ तासांचं गूढ काय? १०० सीसीटीव्ही तपासूनही पुण्यातील बॉम्ब प्रकरणाचा सूत्रधार मोकाटच!

पुणे : पुण्याच्या हडपसर भागातील एका नामांकित रुग्णालयात आयईडी (IED) स्फोटक सदृश्य वस्तू सापडल्याने संपूर्ण शहरात

Oath-Taking Ceremony Vidhanparishad : विधानपरिषदेच्या १० नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी संपन्न

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले नऊ आणि पोटनिवडणुकीत विजयी

State gov issues regulations for fuel saving :वरिष्ठ अधिकाऱ्यांना आठवड्यातून एक दिवस बस-मेट्रोने प्रवास, इंधन बचतीसाठी राज्य सरकारकडून नियमावली

मुंबई : पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे उद्भवलेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने

HSRP : १ जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP ) बसविणे अनिवार्य..

वाहनधारकांनी वेळेत अपॉइंटमेंट घेऊन HSRP बसवून घ्यावी; नियमभंग केल्यास १ हजार रुपयांचा दंड मुंबई : राज्यातील वाहन

Jalgaon : सुखी संसाराचे अवघे २० दिवस ! उष्माघाताने नवविवाहितेचा मृत्यू

Jalgaon : संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट तीव्र आहे. वाढत्या उष्णतेमुळे अनेक ठिकाणी उष्माघातामुळे अनेकांना जीव