नवी दिल्ली: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार(nitish kumar) यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm narendra modi) यांची भेट घेतली. या भेटीनंतर कुमार म्हणाले की ते आता भाजपची साथ सोडणार नाही. मोदींसोबतच्या आपल्या बैठकीनंतर कुमार यांनी गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. असे मानले जात आहे की या भेटीमध्ये संबंधित सरकार आणि राजकीय मुद्द्यांवर चर्चा केली.
गेल्या महिन्यात विरोधी पक्षाची इंडिया गठबंधनची साथ सोडत ते एनडीएमध्ये सामील झाले. त्यानंतर भाजपसोबत मिळून बिहारमध्ये सरकार बनवल्यानंतर नितीश कुमार यांची मोदींशी झालेली ही पहिली भेट होती.
नितीश यांनी या भेटीनंतर सांगितले की त्यांनी दोन वेळा सोडले आहे मात्र आता ते असे कधी करणार नाही. आता कधीच नाही. आम्ही येथेच(एनडीए)राहणार. या दरम्यान त्यांनी २०१३मध्ये भाजपशी संबंध तोडण्याआधी, १९९५पासून भाजपसोबतच्या संबंधांना उजाळा दिला.
२०१९मध्ये भाजप आणि जेडीयूनने बिहारमध्ये १७-१७ जागांवर लढवली होती निवडणूक
दोन्ही पक्षांना लोकसभा निवडणुकीआधी अनेक राजकीय मुद्द्यांना निकालात काढावे लागेल. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि जेडीयूने बिहारमध्ये १७-१७ जागांवर निवडणूक लढवली होती.