पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीनंतर नितीश कुमार म्हणाले, २ वेळा भाजपची साथ सोडली मात्र...

नवी दिल्ली: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार(nitish kumar) यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm narendra modi) यांची भेट घेतली. या भेटीनंतर कुमार म्हणाले की ते आता भाजपची साथ सोडणार नाही. मोदींसोबतच्या आपल्या बैठकीनंतर कुमार यांनी गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. असे मानले जात आहे की या भेटीमध्ये संबंधित सरकार आणि राजकीय मुद्द्यांवर चर्चा केली.


गेल्या महिन्यात विरोधी पक्षाची इंडिया गठबंधनची साथ सोडत ते एनडीएमध्ये सामील झाले. त्यानंतर भाजपसोबत मिळून बिहारमध्ये सरकार बनवल्यानंतर नितीश कुमार यांची मोदींशी झालेली ही पहिली भेट होती.


 


नितीश यांनी या भेटीनंतर सांगितले की त्यांनी दोन वेळा सोडले आहे मात्र आता ते असे कधी करणार नाही. आता कधीच नाही. आम्ही येथेच(एनडीए)राहणार. या दरम्यान त्यांनी २०१३मध्ये भाजपशी संबंध तोडण्याआधी, १९९५पासून भाजपसोबतच्या संबंधांना उजाळा दिला.



२०१९मध्ये भाजप आणि जेडीयूनने बिहारमध्ये १७-१७ जागांवर लढवली होती निवडणूक


दोन्ही पक्षांना लोकसभा निवडणुकीआधी अनेक राजकीय मुद्द्यांना निकालात काढावे लागेल. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि जेडीयूने बिहारमध्ये १७-१७ जागांवर निवडणूक लढवली होती.

Comments
Add Comment

दिल्लीसह चार राज्यांत सतर्कतेचा इशारा; २६ जानेवारीआधी सुरक्षायंत्रणा अलर्ट मोडवर

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशाची राजधानी दिल्ली तसेच हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान

केरळच्या पर्यटकांवर अरुणाचलमध्ये काळाचा घाला; गोठलेल्या तलावात पडून एकाचा मृत्यू दुसऱ्याचा शोध सुरु

अरुणाचल प्रदेश : थंड हवेचा अनुभव घेण्यासाठी अरुणाचल प्रदेशात आलेल्या केरळमधील पर्यटकांच्या सहलीला दुर्दैवी

Hapur News : लग्न समारंभात राडा! हापूरमध्ये माशांच्या स्टॉलवर पाहुण्यांनी टाकला 'दरोडा, व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

हापूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हापूर जिल्ह्यात एका विवाह सोहळ्यात आनंदाच्या वातावरणाऐवजी धक्कादायक आणि

Virat Ramayana Temple : जगातील सर्वात मोठ्या शिवलिंगाची आज स्थापना! २१० टन वजन, ३३ फूट उंची; बिहारमधील 'विराट रामायण मंदिर' ठरणार आकर्षणाचे केंद्र

मोतिहारी : बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील मोतिहारी येथे आज एक सुवर्णक्षण अनुभवायला मिळणार आहे. येथील विराट

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३