U19 world cup: द. आफ्रिकेला हरवत भारत फायनलमध्ये

  63

बेनॉनी: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगलेल्या अंडर १९ वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला आहे. आफ्रिकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी ठेवलेल्या २४५ धावांचे आव्हान भारताने २ विकेट आणि ७ बॉल राखत पूर्ण केले.


आफ्रिकेने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ बाद २४४ धावा केल्या होत्या. आफ्रिकेची सुरूवात काही आव्हानात्मक ठरली नाही.त्यांनी ५व्या षटकांत २३ धावांवर पहिला विकेट गमावला. आफ्रिकेला पहिला झटका स्टीव्ह स्टोल्कच्या रूपात बसला. त्याने १७ बॉलमध्ये २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १४ धावा केल्या. त्यानंतर ९व्या ओव्हरमध्ये संघाने दुसरा विकेट डेविड टीगरच्या रूपात गमावला.


लवकर विकेट गमावल्याने रिचर्ड सेलेट्सवेन आणि लुआन ड्रे प्रिटोरियस यांनी मोर्चा सांभाळला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली. या भागीदारीला मुशीर खानने तोडले. प्रिटोरियस १०२ बॉलमध्ये ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७६ धावा केल्या.


प्रत्युत्तरादाखल भारताची सुरूवात धक्कादायक झाली. भारताने पहिले दोन सलामीवीर झटक्यात गमावले. आदर्श सिंग शून्यावर बाद झाला. तर अर्शीन कुलकर्णी १२ धावांवर बाद झाला. त्यानंतर मुशीर खानही ४ धावांवर बाद झाला. तीन विकेट झटपट गमावल्यानंतर उदय सहारणने ८१ धावांची खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तर सचिन धासने ९६ धावा केल्या. त्याने यावेळी ११ चौकार आणि १ षटकार ठोकले.


भारताला विजयासाठी दिलेले हे आव्हान दोन विकेट तसेच सात बॉल राखत पूर्ण केले. भारताचा आता फायनलमधील सामना ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार